(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • भयभीत झालेले ऑफिस

    1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट.

  • डोक्याचे संरक्षण कवच

    बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता.

  • टेलर मामा

    ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता.

  • जुळेवाडी तील ज्येष्ठ नागरिक

    जुन्यातील काही माणसे सर्विस मधून रिटायर झालेली दुपारी चार नंतर फिरायला आलेली मला दिसली. त्यातील काही माणसांनी मला ओळखले आणि आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावांमधून रेल्वे लाईन जाते पलीकडे बुरुंगवाडी अलीकडे जुळेवाडी व काही अंतरावर हजारवाडी. या गावातील माणसे जुळेवाडी तील प्रत्येक घरटी माणूस ट्राफिक डिपारमेंट इंजिनीरिंग डिपारमेंट. व बुरुंग वाडीतील बहुता श लोक इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर हजार वाडी येथील घरटी एक दोन माणूस टेलिफोन खात्यामध्ये काम करीत होते.

  • चंद्र वर गेला

    गावाकडची गोष्ट……….।

    …हि सृष्टी निर्माण झाल्यापासून आकाश वरच असावे असे मला वाटते. या सुट्टी बद्दल व निसर्गाबद्दल अनेक माणसे वेगवेगळे सांगतात. नक्की काय इतिहास आहे हे कुणालाच माहीत नाही निसर्गातील किंवा सृष्टीतील अनेक वस्तू झाडे वेली फळे-फुले आपण नेहमी पाहतो. काही झाडांना हिरवा रंग काही फुले रंगीबेरंगी हा जो कलर आहे. त्या पेंटर चे नाव काय हे कुणालाच माहीत नाही अर्थात मला सुद्धा परंतु जे डोळ्यासमोर दिसते याठिकाणी मात्र वास्तव वाद निर्माण होतो. अनेक लेखक कवी निसर्गाची नेहमी दोस्ती करतात कारण निसर्गाचे वातावरण लेखनास पोषक असे असते. तर काही जण म्हणतात केंद्र काळे हे ग्रह आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये चंद्र आणि सूर्याला देव मानले आहे. मी आमच्या राणा मध्ये असताना निसर्गाच्या सानिध्यात बरेच काही लेखन केले. परंतु निसर्गाची देणगी फार मोठी आहे त्याची गणता करता येत नाही कारण हे निसर्गाला लाभलेलि.

  • गुढी नी पावसाची उडी

    त्यावेळी आमचे कुटुंब रानात राहायला होते माझे बरेच दिवस रानामध्ये निसर्गाच्या सानिध्यात गेले. गावातील हवेपेक्षा रानातील हवा माझ्या मनाला अल्लाद देत होती. मनमोकळेपणाने राणा मध्ये फिरणे म्हणजे आनंदाला एक प्रकारचे उदाण येतेऐन उन्हाळ्यात राणा मध्ये अधून मधून असणारे वारे.

  • गावाकडच्या आठवणी – गावचा आड

    ग्रामीण भागामध्ये पुष्कळ लिहिण्यासारखे असते बारीक-सारीक गोष्टी या गोष्टीला अतिशय महत्त्व साहित्यामध्ये निर्माण झालेले असते. पूर्वी याच माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची फार गैरसोय होती नरसोबाच्या वाटेला. सुबराव आण्णा यांची एक विहीर व आनंदा खोत यांची एक विहीर या दोन विहिरी उन्हाळी पावसाळी पाण्याने भरलेल्या असायच्या. परंतु या गावच्या आडाला आडला सुद्धा पाणी भरपूर असायचे.

  • गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

    मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत देऊन जाते,गोत देऊन जाते, हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा अनेक म्हणी प्रत्येक वर्गाच्या भिताडावर सुरेख अक्षरांमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. वर्गातील शिक्षक मुले व मुली शिस्तीचे पालन करीत होते खाकी हाफ शर्ट पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व डोकीला पांढरीशुभ्र टोपी. काखेत अडकवलेलं शाळेचे दप्तर घेऊन मी शेतातून चिखल तुडवित शाळेला रोज जात असे. मराठी शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर याच ज्ञान मंदिरात ज्ञानाची पूजा केली जात होती. पूर्वीचे मास्तर विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवत होते एखाद्यावेळी प्रश्नाचे उत्तर नाही आले तर छडीने मारत होते.

  • गावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र

    रेल्वे मध्ये कामाला लागण्या अगोदर मी बिगारी काम दुसऱ्याच्या शेतामध्ये करीत होतो. त्यात वडील वारलेले घरामध्ये पैशाची चणचण फार भासत होती.वडीलतरी या जगातून निघून गेले घर रिकामे झाले वडिलांचा आधार नाहीसा झाला. गेली कित्येक दिवस वडील अंथरुणावर पडून होते आधार होता तो आधार नाहीसा झाल्यामुळे. अखंड घर दुःखात बुडाले होते घरात मला अजिबात करमत नव्हते. सोबत घरातील चारी भिंती मला खायला उठल्या होत्या. घरा मध्ये लाईट नाही दिव्याच्या मीन मिनित प्रकाशात मला काही सुचत नव्हते. वडील आजारी असल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत दोन मामानी केलेली मदत मला डोंगराएवढी वाटत होतं. या जगामध्ये कुठेतरी देव आहे आणि तो देव मामाच्या रूपाने आम्हाला मदत करीत आहे हे मला जाणवत होते. परंतु आम्ही लहान होतो त्यांचे डोंगराएवढे माझ्यासारख्या कमी वयाच्या मुलाला न पिलं न्या सारखे नव्हते. यांची परतफेड कशी करायची हा विचार माझ्या मनामध्ये राहून राहून येत होता. उपकाराचे ओझे कर्ज पेक्षा फार मोठे आहे हे मला जाणवत होते परंतु विलाज नाही आलेल्या दिवसाला तोंड देणे एवढेच बाकी होते. माझे वय कमी मला शेतीकामाला कोण देईल का हा विचार मी मनात करीत होतो. माझी आई शिंदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये काम करत होती मी ही शिदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये कामाला जावे असा मी मनामध्ये विचार केला. नाचार आला म्हणून विचार सोडू नये हे माझ्या आईचे वाक्य आहे मी मनाचा निर्णय केला आणि अण्णांच्या बागेमध्ये कामाला गेलो. हे काम करीत असताना मला काम करणारे सारे सौंगडी भेटले त्यामध्ये अशोक शिंदे. शिवाजी शिंदे गणपत शिंदे भीमा मामा अशी मंडळी मला भेटली. आमच्या घरची परिस्थिती पाहून या माणसानी प्रत्येक वेळी मला कामांमध्ये सांभाळून घेतले…।

  • गाडी घुंगराची

    अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. लहान मुले आणि गाडीच्या पाठीमागून धावत येणारा कुत्रा ही सारी आठवण येते. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतातून समाजात वावरणाऱ्या अनेक लोकांचे वर्णन चांगल्या पद्धतीने लिहिले आहे. पूर्वी लोक संगीतामध्ये अनेक जुनी गाणी संगीतात कंपोज करून समाजाला ऐकवली आहेत. पूर्वी कर्मणुकीची साधने अतिशय कमी प्रमाणात होती ग्रामीण भागामध्ये भजन सोंगी भजन ठराविक गावांमध्ये नाट्य संस्था. तमाशा आणि तमाशामध्ये सादर होणारे पौराणिक किंवा सामाजिक वग नाट्य. त्याकाळी भेदिक सुद्धा होते परंतु पूर्वी लोकसंगीत लिहिणारे लोककवी यांनी अनेक चांगली गाणी समाजाला ऐकवली आहेत. ती लिहिलेली गाणी पुन्हा पुन्हा कानावरून गेली म्हणजे एक प्रकारचं नवल वाटते. त्या गाण्यांमध्ये निसर्ग वर्णन बैलगाडी व बैलाचे वर्णन नात्यातील माणसांची गाणी ही राहून राहून आठवतात उदाहरणार्थ सखुबाई सखुबाईगं, तुझा नवरा बोलाव तुयागं, तंबाखू बिंबाखू खात असलं, डब्बी त्याला घावत नसंल, जा जा येत नाही म्हणून सांग. किंवा नाही खेळणार मुंबई मटका, वामनदादा कर्डक यांनी विविध विषयावर लेखन केले आहे हे प्रामुख्यात जाणवते. भिमाई रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश पडणारी कितीतरी गाणी ऐकावयास मिळतात….।