वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….


अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.
ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.
ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.


विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात
प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत रंगवलेल्या गप्पा. हा संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी.
महाराष्ट्राच्या घराघरात साजरे होणारे सण, विविध व्रतवैकल्ये आणि महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक…

Copyright © 2025 | Marathisrushti