वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके…
गुजरातमधील गणदेवी येथील संत जानकीआई अर्थात बायजी यांच्या चरित्रात्मक पोथीचा हा गद्य आविष्कार. सहज-सुलभ मराठीत… गोष्टीरुपाने आपल्यासमोर आणलाय प्रा. सरोज मनोहर देशमुख (अतोणेकर) यांनी.
कायस्थ मंडळी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ ! याला महत्वाचे कारण म्हणजे कायस्थ स्त्रिया पाककला निपुण असतात. कसे तरी रांधून जेवण शिजवावे हे त्यांना पटत नाही. प्रत्येक पदार्थ मोठ्या नजाकतीने तयार करून पेश करणार पण तरीही पारंपरिक कायस्थी पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच तयार होणार. माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी, मावशी, असेल. काकी इत्यादींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले. प्रत्येक कायस्थ पुरुषांचा हाच अनुभव. आधुनिक तरुणींना मौखिक परंपरेने शिकवले जाणारे हे पदार्थ माहित असतीलच असे नाही. त्यांना अनुभवसिध्द मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच खास, चविष्ट तरीही पौष्टिक अशा कायस्थ पदार्थांच्या पाकक्रिया मी प्रसिद्ध करायचे ठरवले. तसेच परंपरागत सणवार कायस्थ मंडळी कशा तऱ्हेने करतात याचेही संकलन करायचे ठरवले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खाद्य संस्कृती आपणासमोर सादर आहे या पुस्तकाच्या माध्यमातून….


Kalyan vrushtistav

‘डॉक्टर जिवंत तर समाजही जिवंत’…. या ध्येय वाक्याने प्रेरित डॉ. कुमार ननावरे यांनी तेहतीस वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा व व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून जनतेपुढे प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
त्यांनी केलेले कामकाजाचे व घटनांचे चित्रण खरोखरच विलक्षण व हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजाचे आरोग्य सुधारावे, सामान्य गोरगरीब जनतेची सेवा माफक दरात व्हावी हीच त्यांची धडपड !
आजच्या काळात धाडसाने असे अनुभव कथन करणारे डॉक्टर विरळेच. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी राहणे व शासनाने, आरोग्य खात्याने किंवा संबंधितांनी त्यांच्याविषयी गैरसमज वा आकस न करावा ही अपेक्षा.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.
या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti