वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय…. तोही पूर्णपणे मोफत.


महाराष्ट्राच्या घराघरात साजरे होणारे सण, विविध व्रतवैकल्ये आणि महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक…


सुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध जोशी यांच्या सांगीतिक प्रवासाच्या १००० व्या प्रयोगाच्या टप्प्यापर्यंतची कहाणी
ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.
ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.

या पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
आणखी एक…. हे वाचल्यानंतर अनेकांचा…. म्हणजे स्त्री पुरुषाचा पहिला प्रश्न असतो तो, तुम्ही इतके आमच्या मनातले कसे ओळखता, तुमची अफेअर्स किती झाली आणि जी एफ किती.
मी काहीच उत्तर देत नाही ….
कशाला द्यायचे..
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात

‘डॉक्टर जिवंत तर समाजही जिवंत’…. या ध्येय वाक्याने प्रेरित डॉ. कुमार ननावरे यांनी तेहतीस वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा व व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून जनतेपुढे प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
त्यांनी केलेले कामकाजाचे व घटनांचे चित्रण खरोखरच विलक्षण व हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजाचे आरोग्य सुधारावे, सामान्य गोरगरीब जनतेची सेवा माफक दरात व्हावी हीच त्यांची धडपड !
आजच्या काळात धाडसाने असे अनुभव कथन करणारे डॉक्टर विरळेच. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी राहणे व शासनाने, आरोग्य खात्याने किंवा संबंधितांनी त्यांच्याविषयी गैरसमज वा आकस न करावा ही अपेक्षा.


‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
Copyright © 2025 | Marathisrushti