मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो. तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत.
‘स्वराज्य 350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ आणि व्याख्याते आहेत ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक.
आपण आज बघतो इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. बरीचशी मंडळी परीस्थिती नसतांना मराठी माध्यमात न टाकता ते आपल्या मुलाला / मुलीला इंग्लिश माध्यमात टाकतात, पण तसे पहिले तर हे काही अतिआवश्यक नाही. मराठी माध्यमात राहून देखील इंग्लिश चे ज्ञान सुधारता / वाढवता येते. पण त्यासाठी आवश्यक असतात प्रयत्न. लगेच १-२ दिवसात इंग्लिश येत नाही त्यासाठी रोजचा सराव असणे आवश्यक आहे तर काय सराव करायचा
होडी ते मेट्रो असे मुंबईतील दळणवळणाच्या इतिहासाचे टप्पे. “बॅक टू स्क्वेअर वन” किंवा “हिस्टरी रिपिटस इटसेल्फ” असे म्हणतात ते उगीचच नाही.
कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट… नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?
प्रेम कविता
नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. रेल्वे खचाखच भरलेली. पंजाबमधील शेतकरी जास्त प्रमाणात आलेले. घोषणांनी परिसर दणाणलेला. अधिवेशनाची चर्चा. नागपूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो, तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले. भूक लागलेली. हॉटेल बंद झालेले. सोबत आणलेल्या दशम्या संपलेल्या. इकडे तिकडे शोध घेतला. नवीन जागा. पर्याय काहीच नाही. त्याचवेळी जवळूनच केळी विक्रेता गाडा घेऊन निघालेला. डोक्यावर पिवळा दिवा. पिवळ्या प्रकाशात केळी पिवळीधमक दिसली. बरी वाटली. गाडीवळ गेलो. दोन डझन घेतली. पैसे दिले. केळीवाला निघून गेला. आम्ही पिवळ्या उजेडात ती खाणार होतो. सगळी केळी कच्ची निघाली. तशीच सोलली. दोन- तीन केळी खाल्ली. पोटासाठी कशीबशी. मध्यरात्र उलटली. पोट दुखायला लागले. काही केल्या थांबेना. दवाखाना कुठेच दिसेना. रात्रभर फिरत होतो. ओरडत, कण्हत रात्र काढली. मरणाच्या दारातून परत येण्याचा क्षण तो. अधिवेशन पार पडले. घोषणा दिल्या. परत आलो. पण पोटाच्या वेदनांची आठवण घेऊन. आता कुठेही केळीचा गाडा दिसला की केळी घेतो. पिकलेली आहे काय ते पाहूनच. खात्री करूनच.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995
(पुण्यनगरी)
दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात . त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले . वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते .
7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?" अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .
ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती . मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".
एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.
निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . त्या म्हणाल्या " नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले , अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला ...खूप छान वाटलं ग "
या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "
खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .
दिवाळी निमित्ताने आजी ची आठवण झाली ..म्हणून हे सारे तुमच्याबरोबर share केले
रामास प्रार्थना
Copyright © 2025 | Marathisrushti