(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • ऐकावेसे वाटले म्हणून

    मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो. तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत.

  • स्वभावरेषा ….

    मानवी मनाची उकल करणे हे सोपे नसते आणि ते सुद्धा त्याला न भेटता काही शब्दांवरून , अक्षरांवरुन खरे तर ग्रॅफालॉजी हा विषय अंधश्रद्धेकडे नेणारा आहे असे काही म्हणतात. ते विज्ञान आहे का ? असेही प्रश्न विचारले जातात. मी सतत सांगत आलो आहे हा एक अभ्यास आहे आणि अभ्यास म्हटले की , परीक्षा म्हटले की यात यश अपयश येतच रहाणार कॉम्प्युटरच्या युगात अनेक माणसे हाताने लिहिणे विसरले आहेत तर डिजिटल युगात चेकवर स्वाक्षरी करावी लागत नाही सर्व व्यवहार मोबाईल द्वारे होतात, कॉम्पुटर द्वारे होतात. पत्र लिहिणे हे शहरातील माणसे विसरली आहेत. तरीपण हजारो माणसे आजही पत्र लिहितात. ते कशी आणि काय करतात ह्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. लहानपणापासून मी रेडिओ वर ' आपली आवड ' ऐकत होतो आणि कोणी कुठून कशी गाण्याची फर्माईश केली त्यांची नावे सांगतात. असे रेडिओवर अनेक कार्यक्र्म होतात ज्यामध्ये श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे देतात. त्या येणाऱ्या पत्रांबद्दल मला खूप कुतूहल होते. परंतु मी रेडिओवर क्रिकेटचे लाईव्ह अपडेट्स द्यायला लागलो तेव्हा सम्पूर्ण सामना संपेपर्यंत मला स्टुडिओ मध्ये रहावे लागते तेव्हा ' आपली आवड ' हा कार्यक्रम स्टुडिओमध्ये बसून आईकाला मिळतो समोर निवेदक म्ह्णून कधी श्रीराम केळकर , दिनेश अडावदकर किंवा सुलभा सौमित्र असतात, ते जेव्हा ती पत्रे घेऊन त्यांची नावे वाचतात ती पत्रे माझ्या बघण्यात आली आणि खरेच इतके आस्चर्य वाटले की रेडिओचा प्रभाव खूप दूरवर पसरला आहे ते, त्यांची पत्रे अगदी सुशोभित केलेली असतात , छान बॉर्डर असते वेगळ्या रंगाची , कधी त्याचे नाव आणि पत्त्याचा रबरस्टॅम्प मारलेला असतो इतका रेडिओचा प्रभाव आणि आपले नाव रेडिओवर यावे यासाठी दुर्गम भागातून पत्रे येतात, तर आपल्या शहरात अजून मराठी कार्यक्रम रेडिओवर होतात किंवा रेडिओ चालू आहे हे देखील किती अज्ञानी मराठी माणसांना माहित नाही. एके दिवशी मी असाच बसलो असताना कुठले तर हायफाय जोडपे आले होते , पत्रांचा ढीग पाहून ती बाई म्हणाली अय्या अजून पोस्टकार्डे मिळतात, मी जरा शांत शब्दात म्हणालो अहो पुणा , मुबई, डोबावली, किंवा नाशिक म्हणजे महाराष्ट नाही रेडिओची किती क्रेझ आहे बाहेर ते आपल्या शहरातील लोकांना अजून माहीत नाही. आज खऱ्या बातम्या विश्वनीय बातम्या आज रेडिओवरून दिल्या जातात हे महत्वाचे आणि त्याची दखल अनेकजण घेतात.
    तर ती पत्रे मी पहिली , त्यावरील अक्षर, अत्यंत साधे संयमित लिहिणे पाहून बघत रहावे . त्याचे अक्षर अत्यंत कोरीवपूर्ण असते, परंतु सह्या बघीतल्या तर इतक्या वेगेवेगळ्या असतात कारण कधीकधी आपला ठसा उमटवण्याच्या नादात फार ही मंडळी अत्यंत आकर्षक आणि वेगळ्या सह्या करतात खऱ्या कधीकधी त्यांच्या नसतीलही परंतु बघताना खूप मजा येते. प्रत्येकाला आपले नाव रेडिओवर यावे ही इच्छा असते अर्थात ती पत्रे मी इथे देऊ शकत नाही ते व्यवहार्य होणार नाही परंतु आज मी अशी पत्रे देत आहे ती सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वीची आहेत माझ्याच घरामधली काही मोडी लिपीतली माझ्या आजोबांची आहेत त्यावेळचे जुन्या मंडळींचे अक्षर आणि लिहिण्यातील संयम , आपुलकी लक्षात येते सलगता ल्सखात येते. . ते अक्षर वाचताना कळेल की कठीण परिस्तिथी मध्येही ही माणसे कसा मार्ग काढतात ते बघावयास मिळले , तर काही ठिकाणी उद्वेग असेल तेव्हा त्यांचेच अक्षर कसे बदलेले असते हे पण कळेल.
    त्यावेळी टाक किंवा फाऊंटन पेन असे आणि निरोप पाठवायची दोन प्रमुख साधने म्हणजे तार म्हणजे टेलिग्राम , मला आठवतंय ७० ते ८० साली रेडिओवर कार्यक्रम असेल तर तार येत असे कारण टेलिफोन काहीच लोकांकडे असत. २००० सालपर्यंत आणि पुढे परिस्तिथी खूप बदलली , ७० वर्षात काहीच झाले नाही असे नाही बरेच काही झाले , जुने गेले नवीन आले परंतु काही गोष्टी आजही महत्वाच्या आहेत त्यातील एक म्हणजे म्हणजे स्वाक्षरी आणि पत्र. आजही अनेकजण आवर्जून पत्र लिहितात. आजही पोस्टकार्डे पोस्टात मिळतात हे नवीन पिढीला सागावेसे वाटत्ते. कारण त्या लिहिण्यात आपलेपणाचा सुगंध दरवळत असतो कारण त्या अक्षरातून , शब्दातून खरा माणूस दिसतो, माझ्याकडील जी पत्रे पहा , त्यावरील मोडी लिपीतील अक्षर स्वाक्षऱ्या पहा, त्यात आपलेपणा , सलगता जाणवते , त्या वव्यक्तीच्या मनात काय आहे हे जाणवते , आपण हे सगळे मिस करत आहोत असे जाणवत नाही का...जरा आपल्या हस्ताक्षरात आपल्या मित्र मैत्रिणीला पत्र लिहून पहा आपल्याला वेगळे काही केल्याचा भास निश्चित होईल कारण मोबाईलच्या मेसेजपेक्षा किंवा चॅटिंग पेक्षा आपलेपणा आधी जाणवेल. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची मानसिक आंदोलने देखील तुम्हाला जाणवतील. हा सगळा शब्दांचा खेळ किती भारी आहे हे पण जाणवेल .
    --सतीश चाफेकर
  • स्वराज्य @ 350

    ‘स्वराज्य 350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ आणि व्याख्याते आहेत ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक.

  • इंग्लिश

    आपण आज बघतो इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. बरीचशी मंडळी परीस्थिती नसतांना मराठी माध्यमात न टाकता ते आपल्या मुलाला / मुलीला इंग्लिश माध्यमात टाकतात, पण तसे पहिले तर हे काही अतिआवश्यक नाही. मराठी माध्यमात राहून देखील इंग्लिश चे ज्ञान सुधारता / वाढवता येते. पण त्यासाठी आवश्यक असतात प्रयत्न. लगेच १-२ दिवसात इंग्लिश येत नाही त्यासाठी रोजचा सराव असणे आवश्यक आहे तर काय सराव करायचा

  • मुंबईतील दळणवळण साधनांचा रंजक मागोवा

    होडी ते मेट्रो असे मुंबईतील दळणवळणाच्या इतिहासाचे टप्पे. “बॅक टू स्क्वेअर वन” किंवा “हिस्टरी रिपिटस इटसेल्फ” असे म्हणतात ते उगीचच नाही.

  • काय चुकतं नक्की माझं

    कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट…  नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?

  • तुझ्या माझ्यातलं गूज

    प्रेम कविता

  • मरणाच्या दारातून

    नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. रेल्वे खचाखच भरलेली. पंजाबमधील शेतकरी जास्त प्रमाणात आलेले. घोषणांनी परिसर दणाणलेला. अधिवेशनाची चर्चा. नागपूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो, तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले. भूक लागलेली. हॉटेल बंद झालेले. सोबत आणलेल्या दशम्या संपलेल्या. इकडे तिकडे शोध घेतला. नवीन जागा. पर्याय काहीच नाही. त्याचवेळी जवळूनच केळी विक्रेता गाडा घेऊन निघालेला. डोक्यावर पिवळा दिवा. पिवळ्या प्रकाशात केळी पिवळीधमक दिसली. बरी वाटली. गाडीवळ गेलो. दोन डझन घेतली. पैसे दिले. केळीवाला निघून गेला. आम्ही पिवळ्या उजेडात ती खाणार होतो. सगळी केळी कच्ची निघाली. तशीच सोलली. दोन- तीन केळी खाल्ली. पोटासाठी कशीबशी. मध्यरात्र उलटली. पोट दुखायला लागले. काही केल्या थांबेना. दवाखाना कुठेच दिसेना. रात्रभर फिरत होतो. ओरडत, कण्हत रात्र काढली. मरणाच्या दारातून परत येण्याचा क्षण तो. अधिवेशन पार पडले. घोषणा दिल्या. परत आलो. पण पोटाच्या वेदनांची आठवण घेऊन. आता कुठेही केळीचा गाडा दिसला की केळी घेतो. पिकलेली आहे काय ते पाहूनच. खात्री करूनच.

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, बीड
    मो.9421442995
    (पुण्यनगरी)

  • नांदत्या घराची किंमत ….

    दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात . त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले . वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते .

    7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?" अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .

    ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती . मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .

    भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".

    एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

    निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."

    आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . त्या म्हणाल्या " नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले , अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला ...खूप छान वाटलं ग "

    या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "
    खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .

    दिवाळी निमित्ताने आजी ची आठवण झाली ..म्हणून हे सारे तुमच्याबरोबर share केले

  • उपाय

    रामास प्रार्थना