काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव लालूंच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू न शकल्याने घरात स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती !
कशी बघतेय ती माझ्याकडे!
खरं तर मला कबुतरं अज्जिबात आवडत नाहीत. मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या building मध्ये जिथे तिथे colonies नी राहून सगळं घाण करुन ठेवलेनीत! पण आत्ता ना, एका कबुतरीने अंडं घातलंय माझ्या balconyतल्या एका कुंडीत! मला घाबरून सकाळी एकदा दूर जाऊन बसलेली, पण सतत डोळा माझ्याकडे! तेव्हा दिसलं, छोटुस्सं अंडं! आता तिला समजलंय कि तिला ती pregnant असल्याचा benefit मिळणारे. आम्ही तिला काही नाही करणार, आणि काही दिवस तिला इथेच मुक्काम ठेऊ देणार!
खरं तर मला हे बिलकूल पसंत नाहीये, पण नापसंत होऊन करतेय काय मी! असो.
आत्ता थोडासा पाय हलवला मी, तर लगेच माझ्या पुढच्या हालचालीकडे लक्ष हिचं! “उठतेय कि काय आता? येतेय कि काय इकडे? इजा तर नाही ना करणार ही माझ्या पिल्लाला?”
आई आई गं! मला आत्ता ही अग्गदी माझ्यासारखी वाटतेय! माझी पिल्लं वर्ष-सव्वा वर्षाची होईपर्यंत प्रत्येक दिसणारा माणूस, येणारा आवाज, कोणताही अन्न पदार्थ, वारा, पाऊस, खेळणं, काहीही, माझ्या बाळाला इजा तर करणार नाही ना? मग ही इजा अगदी physicalच होऊ शकेल असं नाही ना, त्यात मानसिक, बौद्धिक, भावनीक, आणी त्याही पलीकडे कित्तीतरी गोष्टी असतात! बघणारा माणूस, किंवा आसपासची वस्तू बऱ्यापैकी शुभ ईच्छेनेच तिथे प्रकट असते, पण आईची वक्र-संरक्षक (भोचक) दृष्टी काही हे मान्य किंवा सहन करू शकत नाही. तिचा protective mode कायमच On राहातो.
हाहाहा! आत्ताच पलीकडच्या एका मैदानावरून पोरांचा ओरडण्याचा आवाज आलेला, लगेच बाईसाहेब मान वर करून बघू लागल्या!
त्या वरून आठवलं, माझी पिल्लं ६ महिन्यांची असताना एका रात्री मी शेजारच्यांना, “गप्पांचा आवाज कमी करा” असं रात्री २ वाजता phone call करून सांगीतलं होतं! आज अजूनही भेटलं कि ते आम्हाला “आमचा आवाज आता येत नाही ना?” असं विचारतात, ही एक वेगळीच मजा! असो, त्यांना ही हे माहिती असेल, नाही तर कधी तरी कळेल, कि आई हि फक्त एक आईच असते.
त्यावेळेला ती तिच्या आयुष्यातले इतर roles सुद्धा पार पाडत असेल, पण तिचा पूर्ण प्राण हा तिच्या पिल्लांपाशीच घुटमळत असतो.. with protective mode always On!
रामास प्रार्थना
आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.
भारतातील रेल्वेची मुहुर्तमेढ जिथे रोवली गेली ते बोरीबंदर स्थानक म्हणजे नगर चौकातले एक महत्त्वाचे आकर्षण. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले हे स्थानक आता “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” या नावाने ओळखले जात असले तरी अजूनही अनेकांच्या तोंडत व्ही.टी. स्टेशन (व्हिक्टोरिया टर्मिनस) हेच नाव बसलेले आहे.
एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म
कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना!
एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!'सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे'
सूनबाई त्या काळातल्या होत्या.खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या.दरवर्षी हीच सूचना!
पुढे सूनबाई सासूबाई झाल्या.त्यांच्या सूनबाई घरी आल्या.कुळधर्म कुळाचार तेच होते.सासूबाईंनी छान तयार केलं होतं सूनबाईंना!त्याही सूचना द्यायच्या.'नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो!'
पुढे या सूनबाईंना पाचवारी सून आली.नोकरी करणारी.पण कुलाचार तेच होते.आणि सूचनापण तीच.सूनबाईसुद्धा ऐकायच्या.मांजरीची पोरं टोपलीखाली झाकायच्या नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी.
आता तो वाडा पडला.तिथे मोठा टॉवर झाला.मंडळी ब्लॉकमधे रहायला गेली.घरातले द्विपद होते पण चतुष्पद नाहीसे झाले.आता काय करायचं!प्रश्न पडला!तोवर पाचवारी सूनबाई सासूबाई झाल्या होत्या आणि त्यांची पंजाबीड्रेस सूनबाईपण आली होती.कुळाचाराच्या दिवशी त्या हळूच म्हणाल्या,"माझ्या सासूबाई सांगत असत,मांजरीची पोरं टोपलीखाली झाकून मग नैवेद्य दाखवायचा.आता गं?मांजरच नाही तर पोरं कुठली आणायची झाकायला.काहीतरी बाई पूर्वजांच्या पद्धती एकेक!'
पंजाबी सूनबाई हुशार!ती म्हणाली ,"आहो सासूबाई,काळजी कशाला करता?आहे ना आपली ट्रेडिशन मग करूया की आपण.तुळशीबाग कशाला आहे मग!"
सूनबाई तुळशीबागेत जाऊन चिनीमातीची मांजरं आणि छानशी डेकोरेटेड टोपली घेऊन आल्या.आणि टोपलीखाली चिनीमातीची मांजरं झाकून ट्रेडिशनली नैवेद्य दाखवायला लागल्या!
संपली गोष्ट!
आता आपण विचार करूया.वाड्यात रहाणारी मांजर,दारातली कुत्री ही घरातले सदस्य होते तेव्हा.मांजरीची पोरं नैवेद्याच्या ताटात लडबडायला येणार हे नक्की. म्हणून आधी ती टोपलीखाली झाकायची आणि मग पान देवापुढे ठेवायचं!आता हेतू लक्षात घेतलाच नाही नुसती मान डोलवली!मग पुढे त्यातला हेतू लोप पावून त्याची रूढी झाली!अशा पडतात रूढी!पूर्वजांचे हेतू नीट समजून न घेता आचरले की!
म्हणून आपण जी परंपरा जपतो तिचा हेतू,अर्थ लक्षात घेऊन भावपूर्णतेने ,आर्थपूर्णतेने आचरली की काही झुगारावं लागणार नाही इतकी छान आहे आपली संस्कृती!
माझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक “पॉलिटिका” अल्पावधीतच प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !
नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!
माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !
-मकरंद करंदीकर.
१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.
Copyright © 2025 | Marathisrushti