प्रभुपादांना आणि त्यांच्या अलौकिक धैर्याला सादर दंडवत प्रणाम.
भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच
मी दिले तिला कमळचे फुल
मला वाटले तीही उड़विल प्रेमधुल
हातात घेउनिया कमळ तो लाल
चटकन सुजविला तिने माझा गाल ||२||
तुम्हाला पन्नास पैसे व रुपयाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का ?
रविवारी सकाळी उठता उठताच तो तिला म्हणाला, “थोडं भराभर आवरून घेतो, एकाला भेटायला जायचंय.” त्याचा एक जवळचा, नी जूना colleague आहे, लिंगा नावाचा. त्याचे वडील वारलेले ४ दिवसांपूर्वी. आज सुट्टी आहे तर भेटता येईल. काही वर्षांपूर्वी एकदा mild attack आलेला त्यांना, त्यामुळे हे तसं अनापेक्षितच होतं! त्याचे स्वतःचे वडीलही नुकतेच घरी राहून गेलेले, त्यामुळे तोही जरा emotional झालेला.
पण तेवढ्यात तिने आठवण करून दिली, की संध्याकाळी त्याच्या दुसऱ्या एका colleagueच्या मुलाची 1st birthday पार्टी आहे! हा colleague सुद्धा जवळचाच आहे. Team मध्ये इतरांपेक्षा खरं तर त्याचं ह्याच्याशी जास्त पटतं.
अरे बापरे! म्हणजे birthday आणी death बद्दलची visit एकाच दिवशी करायची!? म्हणजे “आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत” आणी “आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोत” हे दोन्ही तेवढ्याच आत्मीयतेने दोघांना सांगायचं!?
बरेच जण मयतांच्या घरी अगदी जायचं असतं, म्हणूनच जाऊन येतात, नी birthdays सारखे सोहळे चुकवूच कसं? म्हणूनही जातात.
पण तो त्यांतला नाहीये. फारशी माणसं जोडायला बघत नाही, पण जोडलेल्यांचं प्रत्येक सुख दुःख आपलं मानतो.
Self drive करत तो निघाला तर खरा, पण मन दोन्ही प्रसंगांची तुलना थांबवत नव्हतं.. एका जन्माचा सोहळा तर एका मरणाप्रित्यर्थ शोकांतिका. दोन्ही ठळक चेहेरे जीवनाचेच, पण एक म्हणे प्रवासाची सुरुवात, तर एक संपल्याचा आभास! एकीकडे गेलेल्यांच्या विरहाने कष्टी होतील तर दुसरीकडे नावागताला घरात/कुटुंबात/समाजात सामावून घेण्यासाठीच्या प्रयत्नांत असतील! दोन्ही अतीव! दोन्ही अगतिक, दोन्ही आभास!..?
विचार संपले नाहीत, पण प्रवास संपला. तो लिंगाच्या घरी पोचला. आत फारसे कुणी नव्हते. त्याची आई, बहीण, नी भाचा, एक शेजारचे कुणीतरी.. प्रत्येक जण काही ना काही उद्योगात होता. तो लिंगाच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. कसं काय वगैरे विचारलं, तेवढ्यात रडत ओरडत लिंगाचा भाचा बाहेर आला. त्याला जेवायचं नव्हतं, आणी आई भरवल्याशिवाय सोडणार नव्हती. ते पाहून लिंगा उठला, नी त्याच्या भाच्याचं आवडतं गाणं त्याला त्याच्या खेळण्यातल्या keyboardवर वाजवून दाखवू लागला. बहिणीनेही संधी साधली, नी ती मुलाला घास भरवू लागली. हे सगळं पाहता पाहता तो काही क्षणांसाठी तिथे कशासाठी गेलेला तेच विसरून गेला!
ह्या प्रवासाची अखंडता हेच तर ह्यातलं गमक आहे! कोणी कधीही, कुठेही, कसाही असो, पुढे जात राहणे, या पेक्षा काहीही कुणाकडूनच अपेक्षित नाही! नाही का?
तो लिंगाच्या घरून निघाला, निवांत मनाने काही वेळापूर्वी ऐकलेलं गाणं गुणगुणत drive करू लागला…happy birthday to you.. happy birthday to you.. happy birthday dear baby.. happy birthday to you..
सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे.
भाजप-सेना युती टिकणार की तुटणार? भाजपही आगामी काळात ‘परिणाम’ दाखविण्यास सिद्ध!
सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पांच्या केंद्रास्थानाच्या परिसरात (कोअर झोन) पर्यटक बंदी लागू करीत वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे तमाम वन्यजीव प्रेमींना आनंद झाला. पर्यटक बंदीमुळे पर्यटकांची अनौपचारिक देखरेख संपृष्टात आल्याने वनअधिकारी निर्ढावल्यासारखे वागायला लागतील, याचा वारंवार प्रत्यय येतही आहे. बंदी असलेल्या जंगलात वनअधिकारी फिरतात की नाही हे पाहतो कोण ? वाघांच्या शिकारी झाल्यावर त्या इतरांना कळणार नाही, याची काळजी घेण्यात हा विभाग मोठा पटाईत आहे. आणि ते कळल्यास, कश्या प्रकारे नैसर्गिक मृत्यु झाला आहे हे सिद्ध करण्याची किमया हाच विभाग करू शकते. बफर झोन / कोअर झोन हा या वनविभागासाठी कम्फर्टेबल झोन ठरणार आहे.
शनिवारवाड्यातील गणेश महालात इंग्रज व पेशवे यांच्यात १७९० मध्ये ऐतिहासिक तह झाला होता. इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट आणि सवाई माधवराव पेशवे यांच्यातील या तहाचे हुबेहूब चित्र इंग्रज चित्रकार थॉमस डॅनिअल यांनी या तहानंतर १५ वर्षांनी काढले. विशेष म्हणजे थॉमस डॅनिअल या तहाच्यावेळी पेशव्यांच्या दरबारात उपस्थित नव्हते. तरी त्यांनी काढलेले हे चित्र अजरामर ठरले. याचे कारण थॉमस डॅनिअल यांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती आणि त्यांची सृजनशीलता.
विशेष म्हणजे मॅलेटने सुरुवातीला हे चित्र काढण्याची जबाबदारी जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकारावर टाकली होती. जेम्स वेल्सच्या निधनानंतर १७९५ मध्ये ती जबाबदारी थॉमस डॅनिअलच्या शिरावर आली. कॅनव्हासवर तैलरंगात काढलेले हे चित्र थॉमस डॅनिअल यांनी १८०५ मध्ये पूर्ण केले. थॉमस डॅनिअल यांनी हे चित्र इंग्लंडमध्ये काढले आणि त्यासाठी त्यांनी अनेकदा भारतात प्रवास केल्याची नोंद आहे.
हे दुर्मिळ चित्र सुमारे दोनशे वर्षे उपलब्ध झाले नव्हते. इंग्लंडमधील टेट या आधुनिक चित्र संग्रहालयात काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आल्यावर ते पुन्हा जगासमोर आले. या चित्राच्या फोटोकॉपीवरुन भारतीय संशोधकांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला. १९७७ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात 'एक दरबारचित्र आणि चरित्र' या लेखाद्वारे द. ग. गोडसे यांनी या चित्रावर प्रकाशझोत टाकला होता.
एक कलाकृती म्हणून हे चित्र अमूल्य असले तरी अभ्यासकांना त्यात अनेक विसंगती आढळल्या. शनिवारवाड्याच्या गणेश महालातील खांब सुक्ष्म कोरीव नक्षीकामाने सजवण्यात आले होते. पण थॉमस डॅनिअल यांच्या चित्रातील खांब रोमन पद्धतीचे दिसतात. महालाच्या छतावर दाखवण्यात आलेल्या गायी परदेशाती तोंडावळ्याच्या आहेत. पेशव्यांच्या दरबारात येताना जोडे बाहेर काढून येण्याचा रिवाज होता, पण या चित्रात इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट मात्र जोडे घालून बसलेला दिसतो. अशा अनेक विसंगती असल्या तरी चित्राचे महत्व कमी होत नाही.
इंग्लंडमधील “टेट” या आधुनिक चित्रसंग्रहालयातील हे चित्र पाहण्यासाठी लिंक:
श्री वसंत चिंचाळकर हे नाव ललित लेखनाच्या वाचकांना सुपरिचित आहे. निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून प्रसिद्ध होणारे त्यांचे लेखन हे चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. समाजातील स्थित्यंतरांचा त्रयस्थपणे वेध घेणारी पत्रकाराची नजर, मूल्यांच्या होत जाणार्या र्हासामुळे तळमळणारे संवेदनशील मन आणि या दोहोंची यथार्थ सांगड घालणारी बुद्धी यांचा त्रिवेणी संगम चिंचाळकरांच्या या कथांमधून वाचकाला दृष्टीस पडतो.
Copyright © 2025 | Marathisrushti