महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
बॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.
पृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.
बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला.
इच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी तवदार तळे अस्पश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला आहे.
मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरापेक्षा मोठे आहे.
अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti