महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
उद्योगविश्वात मुंबापुरी “उद्योगनगरी” म्हणून ओळखली जाते. देशाच्या कानाकोपर्यातून येथे मोठया संस्थेने लोक रोजीरोटी कमावण्यासाठी येतात.
उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इ.स.चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात कोरोनेशन ब्रिज आहे. या ब्रिजला सवोके ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. तिस्ता नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे.
या पूलाच्या बांधकामास १९३७ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाच्या बांधकामासाठी त्या वेळी चार लक्ष रुपये खर्च आला होता.
मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते.
तिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे
मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालँड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलाँग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लँटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
अरुणाचल प्रदेशातील तेजू जिल्ह्यात पवित्र परशुराम कुंड आहे. मकर संक्रांतीला या कुंडात स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे साधुसंतांसह भावीक येथे मकर संक्रांतीला स्नानासाठी गर्दी करतात.
रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे.
गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या पेटीत ठेवलेली मूळ गणेश मूर्ती आहे. ही मूळ मूर्ती म्हणजेच 'लक्ष्मी गणेश' आहे. ती पिवळ्या संगमरवराची असून तिच्याही बाजूस ऋद्धि सिद्धी व लक्ष लाभ (पुत्र) असून ती कोरिव व अती लहान आहे. ही मूर्ती सन १७०० च्या सुमारास परशुरामांनी लंबोदरानंद स्वामीना ध्यानधारणेसाठी दिली अशी कथा आहे. परशुरामांच्या सांगण्यानुसार तिची पुजा केली जात नाही. पूजेची मोठी मूर्ती बडोद्याचे सावकार मैराळ यांच्याकडून आणली आहे. येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे.
या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे.
कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते; रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे. अलिबाग धरमतर एस. टी. नेही कनकेश्वरला जाता येते.
कनकेश्वर मंदिराची माहिती देणारा हा एक व्हिडिओ बघा...
उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रुमी दरवाजा हा नबाब आसफ उद्दोला यांनी इ.स. १७८३ साली बांधला आहे. अवध वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या या दरवाजाला तुर्किश गेटवे असेही म्हटले जाते. याची उंची ६० फूट आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti