हरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे.
इ.स. पू. ३१०२ मध्ये येथे कौरव- पांडवांचे ऐतिहासिक युध्द झाल्याच्या नोंदी प्राचीन हिंदू धर्म ग्रंथात आहेत.
कौरवांचे वंशज राजा कुरु यांनी हे शहर वसविले. येथेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले होते.
युध्दप्रसंगाच्या शिल्पांसाठी हे शहर प्रसिध्द आहे.