१९४७ मध्ये बडोदा येथे झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याविरुद्ध बडोद्यासह सर्वाधिक ५७७ धावा. हा विक्रम अनेक वर्षांपासून अबाधित होता .
आजही मोहिंदर अमरनाथ म्हटले की त्यांची फलंदाजी आठवते आणि १९८३ चा वर्ल्ड कप.
सचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
रुसी मोदी यांनी ‘ सम इंडियन क्रिकेटर्स ‘ हे पुस्तक लिहिले असून त्यात भारताच्या २३ महत्वाच्या क्रिकेटपटूंवर लिहिले आहे त्याला सर डॉन बर्डमन यांनी ‘ प्रस्तावना ‘ लिहिली असून त्याचा मराठीत अनुवाद बाळ. ज. पंडित यांनी केला असून हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले.
एका अज्ञाात लेखकाने विराट कोहलीला लिहिलेले हे खरमरीत पत्र. मराठीत असल्यामुळे कोहलीपर्यंत पोहोचणार नाही.. पण भाषांतर करुन कुणीतरी त्याच्यापर्यंत पाठवायलाच हवे. कळून दया त्याला त्याची लायकी
आज ४ एप्रिल म्हणजेच महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवस. आपल्या मुलांना बुद्धिबळ हा खेळ शिकवणे आणि त्या खेळाची गोडी मुलांमध्ये निर्माण करणे हि गरज लक्षात घेता “महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन” साजरा केला जातोय. बुद्धिबळ हा घरी बसून खेळता येण्याजोगा बैठा खेळ. बुद्धिबळाने खेळाडूंना एके जागी स्थिर व एकाग्र करण्याची ताकद जणू काही सिद्ध केली आहे. सद्य परिस्थितीमधे तीच ताकद अत्यावश्यक वाटते.
बॉब टेलर हा डर्बीशायर टीमचा यष्टीरक्षक १९६१ ते १९८४ होता. डर्बीशायरचा जॉर्ज डॉकेस हा दुखापतीमुळे जखमी झाला तेव्हा पाहिले नाव यष्टीरक्षक म्हणून बॉब टेलर याचे आले.
सामना सम्पल्यानंतर खेळपट्टी ते ड्रेसिंग रुम हा प्रवास ह्युगने जमिनिला पाय न लावता केला. सहकारी खेळाडुंनी त्याला उचलुन घेतले होते. गोडार्डने बाद केलेल्या एका फलंदाजाचा अपवाद वगळता अख्खा इंग्लिश संघ टेफिल्डने एकट्याने गारद केला होता. शेवटच्या दिवशी एका बाजुने सलग पस्तिस षटके त्याने चार तास पन्नास मिनिटांच्या खेळात टाकली होती आणी वरच्या फळितिल फलंदाजांनी चोपुनही त्याने अविरत उत्साहाने गोलंदाजी केली होती.
भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच "०७ मार्च १९८७"रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या.
अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला.
पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत असतांना 'एजाज फकी' च्या गोलंदाजीवर स्लीप मधे बॉल ढकलुन एक धाव काढली आणि समोर(नॉनस्ट्राइकरएंड वर) उभ्या असलेल्या किरण मोरेनी धावत जाउन सुनीलचं अभिनंदन केलं. एक क्षण सुनीलला समजलच नाही की आपलं शतक झालं नाही तरी हा इतका खुश का झाला आहे. पण किरणनी जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत तेव्हा मात्र सुनील आपला आनंद लपवु शकला नाही. संपूर्ण भारतात आनंदाचं उधाण आलं. कारण साऱ्या भारतीयांचं स्वप्न सुनीलनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेक ठिकाणी पेढे/मिठाई वाटुन लोकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली, जणु काही स्वत:च्याच घरात काही खास घडलं होतं. याला कारण सुनील गावस्कर - तो होताच मुळी सर्वांचा लाडका.
सुनीलच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे भारताचा क्रिकेट जगतात दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेट आणि खेळाडु याबद्दल क्रिकेट खेळणाऱ्या देशातील रसिक आदराने पाहु लागले कारण सुनीलनी आपल्या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं होतं.
अशा या महान फलंदाजाचं आपण सारे मिळून कौतुक करुया!!!
Copyright © 2025 | Marathisrushti