जुलै २००२ आणि जुलै २००३ मध्ये घडलेल्या दोन घटनांची एक आठवण.....
एप्रिल २००२ मध्ये विंडीज दौर्यात सचिन तेंडुलकरने सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याची गौरवपर भेट म्हणून फेरारी या विख्यात स्वयंचलित वाहनोद्योगाच्या कंपनीने त्याला ७५ लाख रुपये एवढ्या किमतीची फेरारी ३६० मोडेना (एंजिन मध्यभागात असणारी दोन लोक बसू शकतील अशी आरामदायी क्रीडा कार) देण्याचे ठरविले. २३ जुलै २००२ रोजी ब्रिटिश ग्रां प्रीच्या (कार ‘पळविण्याची’ स्पर्धा) उद्घाटनावेळी मायकल शूमाकरच्या हस्ते प्रतीकात्मक चावी सचिनला देण्यात आली.
४ सप्टेम्बर २००२ रोजी भारतीय संघराज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सचिनला पत्र लिहून त्याच्या विक्रमाच्या गौरवार्थ सरकार त्या गाडीवरील सीमाशुल्क माफ करेल अशी माहिती दिली. (हे शुल्क सुमारे १ कोटी १५ लाख म्हणजे गाडीच्या किमतीच्या १२५% एवढे होत होते.) प्रचलित नियमांनुसार परदेशातून बक्षीस म्हणून मिळालेल्या गाडीला सीमाशुल्क माफ होते, ‘भेट’ म्हणून मिळालेल्या गाडीला नाही.
जुलै २००३ मध्ये सीमाशुल्कमाफीची बातमी प्रसिद्ध झाली आणि मग वादप्रवादांना ऊत आला. अर्थ मंत्रालयाने नियमात बदल घडवून आणला (असे म्हटले जाते) आणि ऑगस्ट २००३ मध्ये ही ‘मोडेना’ मुंबईत दाखल झाली.
मुंबईतील एका प्रसिद्ध पक्षनेत्याने आपले मत ‘सचिनने पाच पिढ्यांना संपणार नाही एवढे कमवून ठेवले आहे, त्याला अशी मुभा देण्याची गरज नाही’ अशा शब्दांत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कृत्याचे समर्थन केले – केंद्रातील सरकार विरोधी पक्षाचे असूनही. (भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टानुसार सीमाशुल्क हा केंद्रसूचीतील विषय असल्याने तो केंद्रशासनाच्या अखत्यारीत येतो.)
दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली आणि ‘सचिन तेंडुलकर हा भारतीय नागरिक कायद्याहून मोठा नाही. त्याला अशी मुभा का देण्यात आली’ या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. सचिनने करमाफीसाठी अर्ज केला होता अशी माहितीही पुढे आली.
मग मात्र फियाट ग्रुपला जाग आली आणि ‘ज्या उदात्त उद्देशाने ही भेट देण्यात आली होती त्याला जागण्यासाठी’ फियाट ग्रुपने सीमाशुल्क भरण्याची तयारी दर्शविली. वस्तुतः हा शहाणपणा फियाटने ही ‘भेट’ भारतीय सार्वभौम शासनाचे नियम पाळून, ती कार भारतात आणून, मग ती सचिनला देऊन करावयास हवा होता.
सचिन असामान्य आहे, त्याच्यासंबंधीच्या चर्चा (आणि वादही) तसेच असामान्य असणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
१९९० च्या मध्यापर्यत एक गोष्ट आपल्या सर्वाच्याच जवळची होती किंबहुना ती प्रत्येक लहान-मोठ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली, ती म्हणजे मैदानी खेळ; या खेळांमुळे बर्याच अशी मुला-मुलीचं व्यक्तीमत्व घडलं आणि आत्मविश्वास वाढीस लागला.
मैदानावरील फलंदाजाला चुकीचा संदेश मिळाल्याने विश्वचषकाबाहेर पडलेली दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेटपटूंवर थेट हल्ला झाल्याची इतिहासातील एकमेव घटना
शाळेत असताना जॉन वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळत असे. त्यांचे कोच होते माजी क्रिकेटपटू सी. एस. आर. बॉसवेल . बॉसवेल स्वतः ३० फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळलेले होते. जॉन एड्रीच क्रिकेटमध्ये कट् , कव्हर ड्राइव्ह असे फटके मारण्यामध्ये तरबेज होते. १९५६ आणि १९५७ मध्ये ते फर्स्ट क्लास सामने कंम्बाईन्ड सर्व्हिसेस साठी खेळले. ते ‘ सरे ‘ साठी पहिला फर्स्ट क्लास सामना १९५८ च्या सेशनमध्ये खेळले. त्या वर्षी त्यांनी ५२.९१ च्या सरासरीने १,७९९ धावा केल्या.जॉन एड्रीच यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना ६ जून १९६३ रोजी इंग्लडविरुद्ध खेळला .
… प्रथमश्रेणी सामन्यांमधील ज्या शतकांच्या वेळेविषयी वाद नाही त्यांमध्ये पर्सीच्या या शतकाचा कमी वेळेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एकदा झालेली आहे.
१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी.
हरभजन सिंगनंतर कसोट्यांमध्ये त्रिक्रम करणारा एकमेव भारतीय गोलंदाज.
१९६२-६३ मध्ये टेड डेक्स्टर इंग्लंडचे कप्तान म्हणून इंग्लंडचा संघ घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये गेले तेव्हा त्यांनी ४८.१० च्या सरासरीने त्या सिरीजमध्ये ४८१ धावा केल्या. तो त्यावेळी रेकॉर्ड होता.
बाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे.
प्रसन्ना यांच्या गोलंदाजीचे विशेष असे होते की ते चेंडू ‘ लूपिंग ‘ पद्धतीने स्पिन करायचे . असेही म्हटले जाते त्यांचा चेंडू इतका फिरत येई की जर तो कानाजवळून गेला तर वेगळा विशीष्ट ‘ चेंडू फिरण्याचा ‘ आवाज येत असे.
Copyright © 2025 | Marathisrushti