सुभाष गुप्ते यांच्या लेगब्रेकमुळे नेहमी खेळणारा फलंदाज खऱ्या अर्थाने गोधळत असे. कारण त्याला सुभाष गुप्ते यांच्या गोलंदाजीवर अत्यंत सावध रहावे लागे. त्यांच्या पटकन वळणाऱ्या चेंडूवर आणि त्यांनी दिलेल्या उंचीवर तो फलंदाज बुचकळ्यात पडायचा आणि सुभाष गुप्ते यांचे ‘ गिऱ्हाईक ‘ व्हायचा .
२३ ते २९ जानेवारी १९७५ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला गेला. हे कसोटी क्रिकेटमधील जगातील ४८ वे मैदान ठरले.
मंकिच्या कसोटि कार्किर्दिचा सर्वात मनोरंजक भाग असा कि त्याच्या गोलन्दाजिचि सरासरि “शुन्य” एव्ढी आहे ! गोलन्दाजाचि सरासरि अर्थात एक बळि मिळव्ण्यासाठि त्याला मोजाव्या लाग्लेल्या सरासरि धावा. मंकिने त्याच्या कार्किर्दित एकहि धाव न देता एक गडि बाद केला होता !
सचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
त्याचा रेकॉर्ड बघाल तर त्याने ३९ कसोटी सामन्याच्या ६६ इनिंग्समध्ये २२.८८ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याचे एकही शतक नाही परंतु तो कप्तान म्हणून ‘ आउटस्टँडिंग ‘ होता असे म्हटले जाते.
पहिल्याच सीजनपासून वादाच्या भोवर्यात असणार्या आयपीएल क्रिकेट २०-२० ने संशयाची, वादग्रस्ताची सुई ही कलाकार, राज्यकर्ते यांच्याकडे वळवली होतीच. कारण मॅचेसच्या झगमगाटाकडे, भव्य दिव्य रुपड्याकडे आणि चियर गर्ल्सकडे पाहिल्यावर बड्या व्यक्तींचा वरदहस्त असल्याशिवाय अशा बाबी शक्यच नाहीत.
मानवी आयुष्यालाही नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा प्रवास लक्षात ठेवून दातृत्व दाखविण्याऐवजी; क्षणिक नुकसान किंवा जीवितहानीच्या वेळी या दुनियेत सारेच घडीभराचे प्रवासी आहेत, असे ज्ञान पाजळून पुन्हा सर्वजण डोळ्यांवर कातडे ओढून बसतात, हा भाग अलहिदा. प्रस्तुत नग्मा या प्रवासातील एका मुक्कामाच्या वेळी मुसाफिराच्या मनाची झालेली ओढाताण आणि सुखदुःखे प्रत्ययकारकरीत्या चित्रित करणारा आहे
जो डार्लिंग यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध सिडने येथे 14 डिसेंबर 1894 मध्ये खेळला . पहिल्या इनिंगमध्ये ते टॉम रिचर्डसन कडून त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 53 धावा केल्या हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला खरे तर इंग्लंडला फॉलो ऑन मिळालेला होता आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 586 धावा केल्या होत्या.
बार्बाडोस इथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने द.आफ्रिकेचा सात धावांनी चित्तथरारक पराभव करत २०१३ नंतर आयसीसी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिल्याने सामना शेवटच्या षटका पर्यंत लांबला. मात्र हार्दिक पांड्याच्या चलाखीने आपला संघ वरचढ ठरला. अनेक उतारचढाव आणि विजयाचा दोलक दोन्ही संघाकडे आलटून पालटून फिरत असल्याने भारतीय पाठीराख्यांचा जीव कासावीस झाला होता.
सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti