(User Level: User is not logged in.)

क्रीडा-विश्व

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टिप्पणी – २ (‘I am disappointed’ – Ravi Shastri )

    बातमी : क्रिकेट कोच : ‘I am disappointed’ – Ravi Shastri
    संदर्भ : टाइम्स् ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रें

    भारतीय टीमचा क्रिकेट कोच म्हणून सिलेक्शन झालें नाहीं म्हणून रवी शास्त्री डिसअपॉइंट झाला.
    हा हन्त हन्त ! संदीप पाटीलनें तर कांहींच प्रतिक्रिया दिली नाहीं. अनिल कुंबळे कोच म्हणून सिलेक्ट झाला त्यावद्दल त्याचें अभिनंदन . कुंबळे हा कोच म्हणून इतरांपेक्षा जास्त चांगला असेल किंवा कसें, याबद्दल ही टिप्पणी नाहीं . एक तर, तो विषय क्रिकेटमधील एक्सपर्ट लोकांचा आहे ; आणि दुसरें म्हणजे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तें काळच दाखवेल . पण , इथें आपण पहाणार आहोत तें म्हणजे , हा ,
    ‘कोच सिलेक्शनचा प्रोसेस’.

    एकतर , जुन्या एस्टॅब्लिश्ड प्लेअर्सना कोचच्या जागेसाठी अॅप्लाय् करायला लावणें , हें कितपत योग्य आहे ? हा कांहीं सरकारी नोकरीसाठी किंवा म्हाडाच्या जागांसाठी करायचा अर्ज नव्हे. कोच म्हणून अॅप्लाय् करणें हें जुन्या-जाणित्या लोकांना खचितच ऑकवर्ड वाटलें असणार. तरीही त्यांनी अर्ज केलें. खरें म्हणजे, BCCI नेंच योग्य लोकांची शॉर्ट-लिस्ट करून मग त्या लोकांना प्रेझेंटेशन द्यायला बोलवायला हवें ; आणि त्या प्रझेंटेशनच्या वेळी सीनियर लोक , तसेच अॅडमिनिस्ट्रेशनमधील कांहीं लोक हजर असायला हवेत. पण BCCI मधील अॅडमिनिस्ट्रेटर्स हे ‘at an arm’s distance’ अशी पॉलिसी मानतात. म्हणजे, आपण नामानिराळें रहायचें व टीका झाल्यास, सिलेक्शन कमिटीकडे बोट दाखवायचें !

    दुसरें म्हणजे, सचिन, सौरभ व लक्ष्मण हे जरी श्रेष्ठ खेळाडू असले, आणि आजच्या टीममधील प्लेअर्सपेक्षा जरी ज्येष्ठ असले , तरी, कोच म्हणून अॅप्लाय् करणार्‍या शास्त्री, संदीप पाटील, कुंबळे यांच्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत काय, ही बाब महत्वाची आहे. त्यांच्यापुढे इंटरव्यू द्यायचा, ही तर, त्यांच्याहून सीनियर प्लेअर्ससाठी नक्कीच ह्युमिलिएटिंग वाटणारी गोष्ट आहे. त्यातून, कुठल्याही कारणानें कां असेना, (अगदी कितीही जस्टिफाइड कारण असलें, तरीही) , पण शास्त्रीच्या ‘इंडरव्हू’ला सौरव नें हजर नसणें ही शास्त्रीला अधिकच ह्युमिलिएट करणारी गोष्ट आहे, हें नक्की.

    असें इतर क्षेत्रांमध्ये होतें की ! कंपनीच्या मूळ चेअरमनचा मुलगा ( म्हणजे मालकाचा मुलगा) नंतर चेचअरमन किंवा एम्. डी. होतो, तेव्हां जुन्या सीनियर मॅनेजर्सना त्याचें ऐकावेंच लागतें, कारण तो त्यांचा बॉस झालेला असतो. आधीच्या राजाचा पुत्र राजा बनतो, तेव्हांही असेंच होतें. एक उदाहरण म्हणून आपण शिवाजी व संभाजी यांच्याकडे पाहूं या. ( त्यांचा एकेरी उल्लेख , हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे, याची नोंद घ्यावी ). शिवाजीच्या मृत्यूनंतर संभाजी राजा व्हावा किंवा नाहीं याबद्दल अष्टप्रधानांमध्ये एकमत नव्हतें. पुढे संभाजी राजा झाला. त्यानंतरही अण्णाजी दत्तो वगैरे मंत्र्यांना आणि हिरोजी फर्जंद याच्यासारख्या ज्येष्ठांना संभाजीबरोबर काम करणें पटलें नाहीं, व त्यांनी संभाजीविरुद्ध बंड करायचा प्रयत्न केला. ( हें आपण विसरतां कामा नये की, आग्याहून शिवाजी पळाला, तेव्हां त्याच्या जागी हिरोजी झोपला होता. केवठी मोठी रिस्क ही ! ). एक ज्येष्ठ लेखक (बहुधा कुरुंदकर) म्हणतात की, या सीनियर लोकांच्या वर्तनावरून, शिवाजीच्या ‘माणसें पारखण्याबद्दल’च प्रश्नचिन्ह निर्माण होतें. पण, मला तसें वाटत नाहीं, हा पिढ्यांचा फरक आहे. शिवाजीच्या काळी विश्वासानें महत्वाच्या जबाबदार्‍या अंगावर घेणार्‍यांना, संभाजीसारख्या तरुण, आणि स्वत:पेक्षा वय व अनुभवानें ज्युनियर अशा माणसाबरोबर काम करणें कठीणच गेलें असणार !

    बी.सी. सी. आय्. च्या कोच-सिलेक्शनबद्दलही, ज्येष्ठ प्लेअर्स व नवे लोक यांचा असाच विचार करणें प्राप्त आहे. गावसकर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ वगैरे मंडळी सिलेक्शन कमिटीत असती तर गोष्ड वेगळी, ती सीनियर मंडळी आहेत. पण, मग, शिर्के यांनी आजच्या सिलेक्शन कमिटीला जी ‘समज’ दिली की, ‘तुमचें काम फक्त , मुख्य कोच सिलेक्ट करणे, एवढेंच आहे ; बॅटिंगचा कोच सिलेक्ट किंवा रेकमेंड करणें, हें नाहीं’ , (संदर्भ : वृत्तपत्रीय बातमी) ; तसें ते सीनियर्सचा समावेश असलेल्या कमिटीसमोर करूं शकले असते काय ? ( ध्यानात असूं द्या की, आपण शिर्के यांच्या बोलण्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा करत नाहीं आहोत ; तर, फक्त प्रोसेसबद्दल बोलत आहोत).

    असो. आपण काय करायचें तर, रवी शास्त्रीची संयत प्रतिक्रिया, संदीप पाटीलची चुप्पी, यातून बोध एवढाच घ्यायचा की, ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीं’.

    - सुभाष स. नाईक.

  • बलविंदर सिंग संधू

    1980-81 मध्ये जेव्हा कर्सन घावरी हे मुंबईकडून सातत्याने खेळत होते परंतु ते नॅशनल साइडला गेल्यामुळे बलविंदर सिंग संधू यांची मुंबईच्या संघात वर्णी लागली.

  • फेब्रुवारी ०४ : आर्ची जॅक्सनचे पदार्पणातील शतक

    आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : “आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता.”

  • हिरा है सदा के लिये

    असं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो.

  • कांगारूंचे गर्वहरण

    सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे.

  • क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर

    नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९६१-६२ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध भारतीय नेतृत्व केले होते. त्यामध्ये भारताने दोन सामने जिंकले होते आणि बाकीचे तीन सामने बरोबरीत सुटले होते.

  • हम तेरे शहर में…

    मानवी आयुष्यालाही नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा प्रवास लक्षात ठेवून दातृत्व दाखविण्याऐवजी; क्षणिक नुकसान किंवा जीवितहानीच्या वेळी या दुनियेत सारेच घडीभराचे प्रवासी आहेत, असे ज्ञान पाजळून पुन्हा सर्वजण डोळ्यांवर कातडे ओढून बसतात, हा भाग अलहिदा. प्रस्तुत नग्मा या प्रवासातील एका मुक्कामाच्या वेळी मुसाफिराच्या मनाची झालेली ओढाताण आणि सुखदुःखे प्रत्ययकारकरीत्या चित्रित करणारा आहे

  • क्रिकेटपटू जॉन एड्रीच

    शाळेत असताना जॉन वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळत असे. त्यांचे कोच होते माजी क्रिकेटपटू सी. एस. आर. बॉसवेल . बॉसवेल स्वतः ३० फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळलेले होते. जॉन एड्रीच क्रिकेटमध्ये कट् , कव्हर ड्राइव्ह असे फटके मारण्यामध्ये तरबेज होते. १९५६ आणि १९५७ मध्ये ते फर्स्ट क्लास सामने कंम्बाईन्ड सर्व्हिसेस साठी खेळले. ते ‘ सरे ‘ साठी पहिला फर्स्ट क्लास सामना १९५८ च्या सेशनमध्ये खेळले. त्या वर्षी त्यांनी ५२.९१ च्या सरासरीने १,७९९ धावा केल्या.जॉन एड्रीच यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना ६ जून १९६३ रोजी इंग्लडविरुद्ध खेळला .

  • क्रिकेटपटू बॉब वूल्मर

    बॉब वूल्मर हे फर्स्ट क्लास क्रिकेट खूप खेळले होते.
    बॉब वूल्मर पहिला कसोटी सामना ३१ जुलै १९७५ रोजी इंग्लंविरुद्ध खेळले तेव्हा ते २७ वर्षाचे होते. आपल्या मध्यम द्रुतगतीने त्यांनी एम.सी.सी कडून खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट-ट्रिक केली होती . परंतु पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्य्यांना ड्रॉप करण्यात आले आणि त्यांना त्या सीरिजच्या शेवटच्या सामन्यात खेळवण्यात आले तो सामना ओव्हलवर होता . या सामन्यामध्ये ५ व्या क्रमांकावर खेळताना १४९ धावा काढल्या.

  • प्रसिद्ध क्रिकेटपटू कार्ल हुपर

    शेन वॉर्न देखील कार्ल हूपरला खूप मानत असे कारण त्याचे फूटवर्क जबरदस्त होते . त्यावेळी त्याचे नाव टॉप १०० क्रिकेटपटूंमध्ये घेतले जायचे. शेन वॉर्न पुढे म्हणतो की १९९५ मध्ये त्याला चेंडू टाकताना मला जाणवत होते इतर खेळाडू फलंदाजीला आले की पोझिशन घेण्यासाठी खाली बघतो परंतु कार्ल हूपर मात्र सेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे चेंडूची समोर बघूनच वाट बघत असे.