वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्राणापासून बुद्धी पर्यंत विचार करत असताना या प्रत्येक जागी जरी चैतन्याचा आविष्कार दिसत असला तरी तो प्रतिबिंब रूप आहे. ते माझे स्वरूप नाही. अशाप्रकारे निश्चिती झालेल्या त्या साधकाला आत्मतत्वाचे घ्याल अशा नकारात्मक स्वरुपात होणे उपयोगाचे नाही .
जात असता गाडी मधूनी,
दुर्घटना ती घडली,
अचानकपणे एक दुचाकी,
आम्हा पुढे धडकली ।।१।।
प्रयत्न होऊनी योग्य असे,
थोडक्यात निभावले,
वखवखलेल्या काळालाही,
निराश व्हावे लागले ।।२।।
घिरट्या घालीत काळ आला,
झडप घातली त्याने,
वेळ आली नव्हती म्हणूनी,
बचावलो नशिबाने ।।३।।
अपमान झाला होता त्याचा,
सुडाने तो पेटला,
थोड्याशाच अंतरी जावूनी,
दुजाच बळी घेतला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
त्या परमात्म्याला स्वतःच्या अंतरंगात आणि आपल्याला त्याच्या चैतन्याच्या अंशरुपात कशाप्रकारे समजून घ्यायचे? त्याचे निरूपण करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
अंतरंगी ज्या श्रीहरी तत्त्वाची साधकाला अनुभूती येते त्या तत्त्वाच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्रींनी केलेले आहे. कसे आहे हे तत्व? ते म्हणतात,
११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.
भगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात…
भारतात विविध दैवतांचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी अशा विविध दैवतांचे वर्णन हे शेवटी एकाच परब्रह्म परमात्मा चैतन्याचे वर्णन आहे हे निक्षून सांगून वास्तव सत्याला कायमच अधोरेखित करण्यात आले आहे. तीच भूमिका येथे सांगताना आचार्य म्हणतात…
आपल्या शरीरात विद्यमान असणाऱ्या चैतन्य शक्तीलाच भगवान रूपात जाणल्यानंतर, ती जाणीव अधिक व्यापक करीत विश्व चिंतन कसे करता येते? च्या स्वरूपात वैश्वरूप दर्शन कसे घेता येते? ते आचार्यश्री प्रस्तुत श्लोकात विशद करून सांगत आहेत.
प्रस्तुत स्तोत्राचा समारोप करतांना आचार्यश्रींनी पारंपरिक पद्धतीची फलश्रुती मांडलेली नाही. याच नव्हे तर कोणत्याही स्तोत्राची जी अंतिम अपेक्षा आहे, थेट तिचेच प्रतिपादन करीत आचार्य श्री स्तोत्राचे समापन करतात. त्या परमेश्वराला प्रार्थना करतात,
Copyright © 2025 | Marathisrushti