(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तंत्रविश्व – भाग ८ : उत्पन्नाचा पर्यायी स्रोत – शेअर मार्केट

    2020 आणि 2021 ही दोन वर्षे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरतील अशी वर्षे असणार आहेत.कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध क्षेत्रातील अभूतपूर्व बदलाचे परिणाम अजून काही महिने तरी जाणतील असे चित्र आहे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना याचे परिणाम फारसे जाणवले नाहीत ,परंतु मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेअर मार्केट करू पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.कुणी आर्थिक गरजेपोटी तर कोणी केवळ मित्र करतो म्हणून तर काही जण केवळ trend आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा अभ्यास अभावी फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते.

    कोणतीही गोष्ट शिकण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्या पद्धतीने ती गोष्ट समजून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याने ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, गरज असते योग्य मार्गदर्शन घेण्याची! येथे योग्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे कारण केवळ दोन-चार युट्यूब व्हिडिओ पाहून किंवा एक दोन लेख वाचून तुम्ही लगेच ट्रेडिंग करायला लागलात तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी शेअर मार्केट विषयी परिपूर्ण माहिती घेऊन त्याच्यातील धोके जाणून घेऊन या मार्गाचा अवलंब केल्यास इच्छित उत्पन्न मिळवता येते, अन्यथा अतिआत्मविश्वास विनाशाकडे घेऊन जातो.

    तुम्हीदेखील शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पुढील काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    1. बेसिक गोष्टी शिकणे

    मित्रांनो कोणत्याही गोष्टी 2 लेवल मध्ये शिकायच्या असतात, पहिली बेसिक लेवल असते तर दुसरी आडव्हान्स किंवा एक्सपर्ट लेवल असते.त्यांना आपण टप्पे देखील म्हणू शकतो. या गोष्टी शेअर मार्केट बाबतीत देखील लागू होतात. शेअर मार्केट मध्ये प्रवेश करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला शेअर मार्केट विषयी प्राथमिक माहिती घेणे अतिशय आवश्यक ठरते, ही बेसिक लेव्हल पूर्ण केल्यानंतरच तुम्ही आत्मविश्वासपूर्वक ट्रेडिंग करू शकता. बेसिक लेवल एकदा क्लियर झाल्यानंतर आणि तुम्ही ट्रेडिंग करून आल्यानंतर आपोआपच तुम्ही ऍडव्हान्स लेवल देखील पूर्ण कराल.

    बेसिक गोष्टींमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक ओळख, शेअर मार्केट विषयी सर्व संकल्पना, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती, प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे, तांत्रिक बाबी यांसारख्या गोष्टी तपशीलवार समजून घेणे गरजेचे असते.

    शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी विविध स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पुस्तके, ऑनलाईन कोर्स, यूट्यूब व्हिडिओ, विविध लेख, वेबसाईट अशा संमिश्र स्रोतांचा वापर बेसिक शिकण्यासाठी करणे योग्य ठरते.त्यामुळे माहितीची सत्यता देखील तपासता येते आणि शिकलेल्या संकल्पना अधिक पक्क्या होतील.

    2.पेपर ट्रेडिंग अथवा सिम्युलेटर ॲपचा वापर

    मित्रानो शेअर मार्केट विषयी बेसिक गोष्टी शिकल्यानंतर त्याची प्रात्यक्षिके देखील करणे गरजेचे असते,अशा वेळी प्रत्यक्ष अकाउंट काढून लगेच ट्रेडिंग करणे कदाचित नुकसानकारक ठरू शकते अशावेळी काही दिवस पेपर ट्रेडिंग करणे योग्य ठरते. म्हणजे सध्या आपण ट्रेडिंग करत आहोत असे गृहीत धरून इच्छुक शेअरची खरेदी आणि योग्य वेळी विक्री प्रत्यक्षात न करता केवळ पेपरवर करणे आणि त्याद्वारे नफ्या तोट्याचा हिशोब करणे यास पेपर ट्रेडिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने थोडे दिवस प्रॅक्टीस करणे गरजेचे असते.

    सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सिम्युलेटर ॲप देखील आलेले आहेत त्याचा वापर करुन तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग केल्यासारखे सर्व गोष्टी करू शकता. ज्यामध्ये प्रत्यक्षात आपले पैसे इन्व्हेस्ट केलेले नसतात. उदाहरणार्थ मनी कंट्रोल ॲप.

    पेपर ट्रेडिंग किंवा सिम्युलेटर ॲप्स वापरण्याचा सराव केल्यामुळे दोन फायदे होतात, एक म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले नसल्यामुळे ट्रेडिंग मध्ये तुमचे नुकसान झाले तरी प्रत्यक्षात एक रुपया देखील जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला कशा पद्धतीने फायदा तोटा होऊ शकेल याचा एक अंदाज तुम्हाला येतो म्हणजे जो अनुभव तुम्ही काही पैसे घालवल्यानंतर मिळवला असता तो पूर्णपणे मोफत मिळवू शकता.

    अशा पद्धतीने ट्रेडिंग करण्याचा काही महिने सराव केल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी ठरवता येतील कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करावे हे ठरवता येईल. त्यासाठी या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

    3.गुंतवणूक करावयाची रक्कम

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही बेसिक गोष्टी शिकून घेतल्या, काही महीने प्रात्यक्षिक देखील केले त्यानंतर मुख्य तिसरा टप्पा प्रत्यक्षात गुंतवणूक करण्याचा येतो. अशा वेळी दोन प्रश्न निर्माण होतात.

    -शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी?

    -गुंतवणूक कशी असावी?

    साधारणपणे शेअर मार्केट विषयी गोष्टी शिकताना तुम्ही या गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे असते.कारण प्रत्यक्षात ट्रेडिंग करण्यास सुरुवात करताना वरील प्रश्न निर्माण होतात.शेअर मार्केटमध्ये किती रक्कम गुंतवावी याची काही मर्यादा नसते ते तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते आणि व्यक्तीपरत्वे ते बदलते. तुमचा दैनंदिन खर्च भागवून ,भविष्यकालीन येणाऱ्या समस्यांचा आणि गरजांचा विचार करून थोडीबहुत बँकेत शिल्लक रक्कम ठेवून उरलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना किंवा कर्ज काढून कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. उत्पन्नाचा एक पर्यायी स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे.

    शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी याच्या नंतर अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो ही गुंतवणूक कशी असावी ?आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्वरित, मध्यम व दीर्घकालीन असे परतावा देणारे तीनही पर्याय येथे उपलब्ध असतात. तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार यातील योग्य पर्यायाची निवड करणे गरजेचे असते.

    4.अपेक्षा कमी आणि संयम जास्त असणे गरजेचे

    गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपैकी सर्वोत्कृष्ट पर्याय शेअर मार्केट असला तरी याद्वारे प्रत्येक व्यक्तीला मिळणारा परतावा मात्र वेगळा असतो, कारण प्रत्येकाचे ज्ञान, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एक्सपर्ट लेवल यामध्ये फरक असतो.

    त्यामुळे सुरुवातीला अपेक्षा कमी ठेवणे आणि थोडाफार संयम ठेवणे गरजेचे असते.

    तुमच्या परिचित एखाद्या व्यक्तीस तुमच्या एवढीच गुंतवणूक करून कदाचित तुमच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील किंवा मिळतील, अशावेळी तुम्ही संयमी राहणे गरजेचे आहे. त्याच्याशी तुमची तुलना न करता आपण ठरवलेली एक निर्धारित रक्कम कशी मिळवता येईल हे पाहणे गरजेचे असते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाहणे गरजेचे असते.

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे चार टप्पे समजून घेतले तर गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच जास्त रिटर्न शेअर मार्केटद्वारे मिळतील.त्याकरिता सुरुवातीला संयम ठेवून आणि अपेक्षा कमी ठेवून तुम्ही काम केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल.

    -- विजयकुमार काशिनाथ पाटील

      August 18, 2021


  • कांगारूंचे गर्वहरण

    सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे.

      June 25, 2024


  • जागतिक डॉक्टर दिन

    आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो.
    सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      March 31, 2017


  • डिझेल व पेट्रोलमधील फरक

    डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.

      February 27, 2023


  • नाशिकचा ४२ फुटी चतुर्मुखी गणपती

    देश-विदेशात लाखोंच्या संख्येने गणपतीची मंदिरे आहेत. प्राचीन गणपती मंदिरांची संख्याही खूप मोठी आहे. नव्यानेही अनेक ठिकाणी गणेश मंदिरे निर्माण होत आहेत.

      January 25, 2024


  • मेक बिलीव्ह – बरंच भ्रामक, किंचित खरं !

    चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्यावर दिसणारे सगळे खरे आणि म्हणून भावनांना अपील करणारे असते या वयातून मी गेलोय.

      May 16, 2022


  • कापसापासून सुतापर्यंत

    अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

      November 10, 2023


  • अध्यात्मिक संकल्पनांची विज्ञानीय स्पष्टीकरणे

    अध्यात्मिक संकल्पनांची विज्ञानीय स्पष्टीकरणे

    पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्‍यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.

      March 12, 2012


  • ऑक्टोबर ०४ – ‘रंगीत’ बेसिल आणि बूम बूम १००

    पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्‍या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.

      September 28, 2010


  • मराठी माणसाचं दुर्दैव आणि इंग्रज राजवट

    इ.स. १८०० पर्यंत भारतावर ब्रिटिशांचे राज्य आले होते - महाराष्ट्रावर ब्रिटिशांचे राज्य यायला १८१८ पर्यंत उशीर झाला तो पेशवाई राज्यातील नाना फडणवीस सारख्या कार्यक्षम लोकांमुळे. १८१८ मध्ये ब्रिटिशांचे राज्य आले तरीही लोकांच्या मनात छत्रपती आणि त्यांचे पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते. ब्रिटिशांना सतत त्याची धास्ती होती. यासाठी ब्रिटिशांनी जी योजना बनवली तिचे दर्शन त्यांच्या १८५० नंतरच्या कारवायांमध्ये दिसते. या योजनेचे ३ मुख्य भाग दिसतात -

    १) हिंदू लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडणे. हिंदू संस्कृती / इतिहास / व्यवस्था यांच्याबद्दल द्वेष पसरवणे. हिंदू धर्माला जाणीवपूर्वक ब्राह्मणी धर्म (Brahminical Religion) असे नाव देणे - अस्पृश्यतेसारख्या मुख्यत: इस्लामी शासनकाळात सुरू झालेल्या (उदा. मुस्लिम व्हायला नकार देणाऱ्या लढाऊ जमातीला गावकुसाबाहेर ढकलणे, त्या जातीचे रक्षणाचे काम काढून घेऊन चामड्याचे काम देणे, अशाच कारणासाठी मूळ ब्राह्मण असलेल्या एका जमातीला मैलासफाईचे काम करायला भाग पाडणे इ.) प्रथेसाठी हिंदूधर्माला दोषी ठरवणे. ब्रिटिशांशी निष्ठा असलेल्या लोकांना शिक्षण, प्रोत्साहन देऊन त्यांना हिंदूधर्म आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करायला - द्वेष पसरवायच्या कामाला लावणे. पेशवाईचा संबंध वर्णव्यवस्था आणि अन्याय यांच्याशी जोडून “ब्रिटिशांनी यातून आपली मुक्तता केली” असा समज लोकांच्या मनात बसवणे.

    २) ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे - हिंदू धर्मापासून वरील प्रकारे बाजूला पडलेल्या, द्वेष करू लागलेल्या लोकांना ख्रिस्ती करणे, ज्यामुळे लोकांच्या मनात ब्रिटिशांबद्दल परकेपणाची भावना राहणार नाही. अहमदनगर जिल्हा हा या प्रयोगासाठी सर्वप्रथम निवडला गेला. - तिथे सिंथिया फेरार या मिशनरी महिलेमार्फत विशेषत: महार या जातीला ख्रिस्तीकरणासाठी लक्ष्य बनवले गेले. वर उल्लेख केलेल्या एका ब्रिटिशनिष्ठ समाजसुधारकाने या महिलेला मदत केल्याचे उल्लेख त्यांच्या लेखनात येतात.

    ३) ब्रिटिशांशी निष्ठावान रहाणे कसे फायद्याचे हे लोकांना दाखवत रहाणे – भारतीय संस्कृतीला नावे ठेवणाऱ्या, जातींमध्ये फाटाफूट / द्वेष पसरवणाऱ्या लोकांचे सत्कार, त्यांना किताब / पदव्या देणे, सरकारी कामांचे ठेके / कंत्राटे देणे. एक मोठे उदाहरण म्हणजे कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ, १८१८ साली पुणे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर छत्रपती प्रतापसिंह यांना सुरक्षित साताऱ्याला पोचवण्यासाठी पेशव्यांचे सैन्य चाकणकडून सासवड घाटमार्गे साताऱ्याला जाताना ब्रिटिशांच्या मद्रासी सैनिकांची एक तुकडी त्या मार्गाने शिरूरहून पुण्याला जात होती. मराठी सैन्य मोठे असल्यामुळे या तुकडीने कोरेगाव भीमा या गावात घुसून आडोश्याने या सैन्यावर गोळीबार केला. हा गोळीबार मराठा सैन्यापैकी थोड्या लोकांनी अंगावर घेऊन दिवसभरात पूर्ण सैन्य सासवड घाटाच्या दिशेने निघून गेले. यात ब्रिटिशांच्या मद्रास रेजिमेंटचे काही सैनिक आणि काही मराठी सैनिक मारले गेले. या चकमकीला जवळजवळ ३३ वर्षे होऊन गेल्यावर ब्रिटीशांनी विजयस्तंभ उभारला. त्यांवर स्पष्ट लिहिले आहे – (ब्रिटिश) “सरकारशी निष्ठा बाळगणाऱ्या लोकांचे बहुत काळपर्यंत नाव व्हावे म्हणून हा स्तंभ उभारला आहे”. पुढे यालाच “शोषितांचे अन्यायी संस्कृतीशी झालेले युद्ध” असे धडधडीत खोटे रूप देऊन लोकांना दरवर्षी ०१ जानेवारीला या स्तम्भापाशी जाऊन ब्रिटिशांचा विजय साजरा करायला प्रोत्साहन दिले गेले. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांपासून मराठी सैन्यात सर्वजातींचे सैनिक लढत असत हा इतिहास आहे – तो इथे लपवला गेला. महाराष्ट्रातील काही महान समाजसुधारकही या फसवणुकीला बळी पडले होते.

    हे लिहिण्याचे कारण – आजही या तीनही प्रकारची फसवणूक भारतीय – मराठी लोकांच्या लक्षात आलेली नाही. ब्रिटिश गेले तरीही स्वत: मराठी माणूस कधी पुरोगामित्वाच्या नावाखाली तर कधी समतेच्या नावाखाली स्वत:च्याच सांस्कृतिक ओळखीपासून दूर जात आहे - जन्माधारित जातिद्वेषालाच शहाणपणा समजतो आहे. जी गोष्ट ब्रिटिशांच्या फायद्याची होती – तीच आज भ्रष्ट राजकारण्यांच्या फायद्याची आहे. मतदानाचे गणित जाती-जातींना फोडून सोपे होते – लोक देशाच्या हिताला सहज विसरतात.

    -- दिपक पुरोहित

      March 25, 2016