(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

    पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार?

  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सातवा – ज्ञानविज्ञानयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय.

  • मुळा

    भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात.

  • || सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर ।।

    गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर यांच्या जीवनचरीत्रावर आधारीत आहे. गुरुतत्त्वाचे हे ३४ वे पुष्प नानांच्या चरणी समर्पीत करीत आहे.

    मध्यप्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदराया गावी होते. वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात नानांचा जन्म झाला. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. गुरुचरित्राचे सप्ताह लहानपणीच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले. या मार्तंडाची दत्तप्रभुंवर मोठी निष्ठा होती.

    “हा मार्तंडनामे पुन्हा । श्रीएकनाथांचा अवतार म्हणा । हृदयी रमता दत्तराणा । आवडीने
    जयाचिया।” असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.

    सन १९१४ मध्ये इंदूरचे शंकरराव डाकवाले यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु संसार नीटपणे झाला नाही. पत्नीचे निधन झाल्यावर तराणेकर यांनी काशीची यात्रा केली. मथुरा, शेगाव इत्यादी तीर्थयात्रा केल्या. ते बद्रिकेदारलाही गेले होते. अनेक योगी लोकांची, सत्पुरुषांची नानांनी दर्शने घेतली. त्यांच्यावर गुळवणी महाराजांचा प्रभाव मोठा होता. नानांनी अनेक ठिकाणी यज्ञ केले. वास्तव्य उत्तरार्धात इंदूर येथे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परीवाराची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ आणि जप यांचे विकसित रूप आहे. नानांच्या परिवाराने या मार्गांची जोपासना केली आहे. प्रासादिकमंत्र, स्तोत्र व प्रार्थना यांना महत्त्व आहे.

    परमपूज्य नाना महाराज यांच्या घराण्यात दत्तभक्तीची परंपरा उत्कटधारा तशी पिढ्यान
    पिढ्यापासून होती. असे म्हणतात की सद्गुरु भूमीवर अवतरण्यासाठी ८० पिढ्यांचे दत्त भक्तीचे पुण्य हवे. हे पुण्य परम सद्गुरुच्या पुनर्जन्माच्या माध्यमातून प्रगत होत असते.

    बालवयातच प. पू. नानांना दत्तसाधनेची इच्छा व ओढ वाटू लागली. घराजवळच श्रीदत्तप्रभूंचे मंदिर असल्यामुळे श्रीदत्तप्रभूंच श्रीगुरु म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये ठेवून जप तप व श्रीदत्तप्रभूंचे स्मरण नित्य अविरत होऊ लागले. एवढ्या बालवयातच श्रीदत्तप्रभुंच्या भेटी साठी काहीही करण्याची प. पू. नानांची साधना परिश्रम पाहून घरामधील वडिलधारी मंडळी आश्चर्यचकित होत असत. प. पु. नानांचे अतीव श्रीदत्तप्रभू प्रेम सगळ्यांना भारावून टाकत असे. प. पू. नानांमहाराजानी जे अनुभवलेले ते अद्भुत होते. राम लक्ष्मण यांच्या मूर्तीतून दोन तेजस्वी दिव्यमूर्ती बाहेर आल्या व दोघे ब्रज भाषेत संवाद करत खेळ खेळू लागले.

    प. पू. नाना महाराजांना गिरनारी श्री अवधूत नाथ दर्शन, मथुरेत श्रीकृष्ण दर्शन व अनेक देवातांचे दिव्य दर्शन होऊन त्यानी श्रीगुरुंची प्रीती अनुभवली. शेवटी श्रीगुरुभक्तीसाठी मनोनिग्रह हेच प्रमुख साधन आहे व अध्यात्मिक वाटचालीत श्रीगुरुंची करुणात्रिपदी व श्रीगुरूंचा जप हेच नित्य आचरणात असले पाहिजे, तीच मुख्य साधना पद्धती आहे. हा प.
    पू. नानामहाराजांचा आग्रह आहे! स्थूलदेह जरी नसला तरी सुक्ष्म देहामध्ये आज प. पू. नानामहाराज भक्तासाठी कार्यरत आहेत, नाना महाराजानी स्थूलदेह धारण करण्या अगोदर सुध्दा ते गुरुतत्त्व स्वरूपात होतेच स्थूल देह धारण केल्यावर सगुण स्वरूपात गुरुतत्त्व कार्य केले व आज त्यानी जरी देह त्याग केला असला तरी ते गुरुतत्त्व स्वरूपात आहेतच, या तत्वाचा कधीच लय होत नाही. दत्त भक्तांना साधनेसाठी आपले मार्गदर्शन देण्यासाठी अधीर आहेत. या कलियुगात श्रीगुरुंमुळेच दत्तभक्त तारून जाणार आहेत.

    शेवटी एवढेच, श्रीदत्तमहाराजांची आवडीची ओळ गुणगुणाविशी वाटते, “भजा भजा हो
    श्रीगुरूंसी.” मध्यप्रदेशातील “इंदौर" चे महान योगी सद्गुरु श्री नानामहाराज तराणेकर यांच्या साधकावस्थेतील ही कथा नाना महाराज तराणेकर. श्री नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायणसाधना करून “परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीं” कडून गुरुमंत्राची दिक्षा मिळवली. त्यानंतर अखंड गुरुमंत्राच्या जपाने ते तेज:पुंज बनले. श्री टेंबे स्वामींकडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा घेऊन त्यांनी परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत त्यांना देवदेवतांची अनेक दिव्य दर्शने घडली. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण आरंभले. बद्रीनाथ, केदारनाथ येथे श्री शिवदर्शन घेतल्यावर त्यांनी नागराज हिमालयात जाण्याचे ठरवले. हिमालयाची यात्रा करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले. त्यातीलच हा एक अनुभव.

    नानामहाराज हिमालयात भ्रमंती करत असतांना एके दिवशी एका ठिकाणी त्यांना एक गुहा दिसली. गुहेत थोडा विश्राम करावा या हेतुने ते गुहेजवळ गेले. परंतू जवळ जाताच गुहेच्या मुखाशी त्यांना दोन वाघ दिसले. वाघ नानामहाराजांना पहाताच गुरगुरू लागले. परंतू त्याच गुहेत आत मध्ये एक सात - आठ फुट उंच, गोरेपान, तेजस्वी योगी समाधी लावून बसले होते. या योग्याने त्या दोन्ही वाघांना, नानामहाराजांना आतमध्ये येऊ देण्याची आज्ञा केली. तसे ते वाघ एकदम शांत झाले. योग्याने नानामहाराजांना जवळ बोलावले. महाराज आत गेले. योगी व महाराज यांच्यात बरेच बोलणे झाले. योग्याने महाराजांना योगसाधनेतील अनेक गोष्टी सांगितल्या. योगाचे अनेक प्रकारही शिकवले. त्याचबरोबर आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचे व साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिक्षा देऊन योगसाधनेचा आदेश दिल्याचे सांगितले. नंतर योग्याने महाराजांना पुढील प्रवासाबद्दल विचारले महाराजांनी आपल्याला गंगातटी गंगा नदीचे दर्शन घ्यायला जायचे असल्याबद्दल सांगितले. तेव्हा योग्याने त्यांना आपले (म्हणजे त्या योग्याचे) पाय पकडून डोळे घट्ट मिटून घेण्यास सांगितले. "मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नको अन्यथा कोठेतरी मध्येच पर्वतांमध्ये पडशील” असे सांगितले. त्याप्रमाणे श्री नाना महाराजांनी त्या योग्याचे पाय पकडले व डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षणांनी योग्याने डोळे उघडण्यास सांगितले, त्याप्रमाणे महाराजांनी डोळे उघडताच ते गंगा नदीच्या घाटावर उभे होते. योगी त्यांना तिथे सोडून केव्हाच अदृष्य झाले होते.

    श्री समर्थ नाना महाराज सांगतात की आजही नागराज हिमालयात असे अनेक योगी महात्मे हजारो वर्षापासून समाधी अवस्थेत आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांचे आस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. म्हणून ते नाहीतच असे म्हणणे कितपत योग्य? राग, प्रेम, अहंकार या भावनादेखील प्रयोगशाळेत सिद्ध केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व आपण नाकारतो का? या गोष्टीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा.

    प. पू. नाना महाराज सांगतात, भक्ती कशी करावी? तुमची भक्ती ही ज्ञान युक्त असावी. ज्ञानाने अनुभव व माहिती यातील फरक समजतो. भक्ती आपण कोणाची व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करतांना त्यात असणारे शब्द व वाक्य याचा अर्थ समजून, जाणून भक्ती करावी फक्त ज्ञानयुक्त भक्तीने शिष्य गुरुंची योग्यता समजू शकतो.

    मनुष्य देवाची भक्ती करतो पण देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. भक्ति मनापासून करतो पण मागत असतो. देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर ही मागणी देवाजवळ करतो. काही वेळेला देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर देवाचे करणे सोडून देतो. त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अशी मनुष्याची मानसिकता आहे. देवाची भक्ती करीत असतांना मनुष्याच्या वासना निघून गेल्या पाहिजेत. कारण मनुष्याचे दु:खाचे मूळ कारण म्हणजे वासना आहेत. मनाचे सतत लाड पूरविणे व त्यासाठी कोणाचाही घात करायला मागे पढे न पाहणे. त्या वासनांचा त्याग होण्यासाठी भक्ति करायची असते. पण भक्ती करून मनुष्य काही वेळेला देवांवर विश्वास ठेवत नाही. त्याचा त्याच्यावरच विश्वास नसतो. मग देवांवर विश्वास कसा ठेवेल. प्रथम देवाजवळ काहीही मागू नये. कारण तुम्ही जे काही मागाल ते देव पूर्ण करतो. त्यामुळे तुमच्या भक्तीची पुण्याई कमी होते. तर भक्ती ही निष्काम भावनेचीच पाहिजे. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजी घेतो व पैसे देतो. त्यातच आपला व्यवहार पूर्ण होतो. मग आपल्याजवळ त्या माणसाचे काहीही घेणे उरत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने भक्ती करीत असतांना देवा जवळ काही मागितले की देव त्याला सर्व देतो पण स्वत: देव त्याच्या जवळ राहत नाही. तर देवाला मिळविण्यासाठी त्याच्या कडून काहीही मागू नका. प्रथम त्याच्यावर विश्वास ठेवा की तू मला संकटात मदत करणार. म्हणजेच प्रत्येक संकटात मला धैर्य देणार. मला संकट जिंकायला मदत करणार. म्हणजे मला जिद्द आत्मविश्वास देणार ह्यावर विश्वास ठेवावा. देव स्वत: तुम्हाला कधीही भेटणार नाही. पण तुम्हाला जगण्यासाठी बल, कौशल्य, आत्मविश्वास, जिंकण्याची जिद्द मात्र देइल. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचे कर्म त्याला अर्पण करा. त्याच्या जवळ काहिही न मागता “देवा, तुझे नाम सतत माझ्या मुखात राहू दे हे मागा." कारण जेव्हा आपण देवा तुझे नाम मुखात राहू दे अस मागतो.

    तेव्हा आपण देवाच्या हृदयाला मागतो त्याचे अस्तित्व मागतो. मग का नाही आपल्या भक्तिला भुलून तो आपल्याला मदत करणार. त्यासाठी निष्काम भावनेची भक्ति करा. त्याला प्रेम द्या, मग पहा, तुम्ही त्याला सोडले तरी तो तुम्हाला सोडणार नाही व मनात एकच भावना ठेवा की देवा तुझे अस्तित्व आहे. मला तू प्रत्येक संकटात मदत करणारच अशी भावना ठेवा.

    मनुष्याने नुसती भक्ती केली व काहिही काम केले नाही व मनात एकच आशा ठेवली की देव सर्व करेल माझे व प्रयत्न केले नाही तर त्या वेळेस देव मदतीला येणार नाही. देवाच्या नामाची भक्ति करा व कष्ट करा. स्वतःवर व देवांवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही रुपात भेटेल. आपल्या प्रारब्धाचे भोग तो कमी करेल. जीवनात आनंद देईल पण त्यासाठी फक्त विश्वास हा तिहेरी शब्द मनात पाहिजे. कारण विश्वास ह्या शब्दात त्याच्या विषयी प्रेम व त्याचे अस्तित्व आहे.

    परमपूज्य श्री नानामहाराज यांच्यावर आधारीत असलेला अंक आपल्याला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

    संपर्क: श्री समर्थ नाना महाराज प्रासादिक संस्थान पारमार्थिक ट्रस्ट,
    इंदोर. त्रिपदी परिवार, नानासाहेब तराणेकर,
    मार्ग ८१/१, स्नेहलता गंज,
    इंदोर ४५२००३
    दुरध्वनी: ०७३१-२५४५०२४

    -– श्री संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १० वा, (अंक ३४)

  • राष्ट्रीय उंधियो दिवस

    भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे पूर्वी फक्त एखाद्या प्रदेशाची खासियत होते. परंतु कालांतराने ते संपूर्ण राज्याची ओळख बनून गेले. उंधियो पदार्थ याच पठडीतला. उंधियोला सुरती उंधियो म्हणूनही ओळखलं जातं.

  • मारुति स्तोत्र

    मारुति स्तोत्र

    भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
    वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥

    महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
    सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥

    दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
    पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥

    लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
    पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

    ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
    काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

    ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
    नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥

    पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
    सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

    ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
    चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

    कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
    मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

    आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
    मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥

    अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
    तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥

    ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
    तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

    आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
    वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

    धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
    पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

    भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
    नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥

    हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
    दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥

    रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
    रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥

    ॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥
    ॥ श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥

    समर्थ रामदास

  • श्रेयसी प्रजा’ काळाची गरज !

    सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

    ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते.

    व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असल्यामुळे माझ्या वीस वर्षाच्या अनुभवांवरून मला असे वाटते की, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असले पाहिजे. प्रेम, विवाह, मातृत्व, घटस्फोट आणि गर्भनिरोध ह्यांसारखे निर्णय अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे असून त्यामधे इतरांनी ढवळाढवळ करू नये. धर्माचा उपसर्ग तर त्यास आजिबात येऊ देऊ नये. वैज्ञानिक प्रगतीचे उद्दिष्ट आणि उपयोग दोन्ही केवळ मानवी-जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने असावे. त्याचप्रमाणे आपल्या खाजगी जीवनात कोणी कोणता निर्णय घ्यावा ह्या बाबतीत किमान कायद्याचा किंवा सरकारचा हस्तक्षेप असू नये. सुख हेच जीवनाचे अंतिम सत्य असल्यास दु:खदायक श्रद्धा अनैतिक ठरू शकते.

    स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रवेश करणारा जीव? ह्या जीवाचे आगमन झाल्यावर त्याला जन्मभर दु:खच भोगावे लागणार असल्यास त्याला जन्म देण्याचे प्रयोजन तरी काय? नवा जीव जन्माला घालणे हीच मानवी जीवनाची सार्थकता समजणे कितपत योग्य आहे? नव्याने ह्या जगात येणाऱ्या जीवाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभावे ही अपेक्षा आई-वडिलांसाठी अवास्तव म्हणता येईल का?

    निकिता मेहताचे गर्भपात प्रकरण कोर्टाने फेटाळले आणि काही दिवसांतच निकिताचे बाळ पोटातच गेले, जन्मण्याआधीच नाहीसे झाले. ह्या संदर्भातले कायदे आज काही नव्याने झालेले नाहीत. प्रश्न आहे तो केवळ लोकांच्या भावनेपोटी असे कायदे बदलावेत का? पूर्ण आरोग्यमय असलेले बाळ आपल्या पोटी जन्माला यावे अशी प्रत्येक मातेची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यात काहीही चूक नाही पण दुर्दैवाने काही व्यंग असलेले, मतिमंद बाळ जन्माला येणार हे आधी कळले तर कोणतीही आई त्याला जन्माला घालण्यास स्वेच्छेने तयार होणार नाही. सामाजिक दडपणाखाली असे मूल जन्माला घालणे ही गोष्ट वेगळी. अशा वेळी समाज किंवा इतर नातेवाईक फक्त सल्ले देण्याचे काम बजावत असतात. यापेक्षा अधिक अपेक्षा त्यांच्याकडून न केलेलीच बरी. अशा वेळी कायद्याचा आधार घेऊन गर्भपात करणे योग्य राहील असे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आत्म्याचे अमरत्व वर्णन करणे व आपल्या घरातील प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यावर आत्म्याच्या अमरत्वाचे भान विसरणे ही तर नेहमीचीच बाब !

    ह्या जगात कितीतरी अनैतिक गोष्टी चालतात. मुलामधे जन्मजात दोष, शारीरिक अथवा मानसिक दोष खूप जिकीरीचे आहे. आपला समाज अशा मुलांबाबत प्रगल्भ नाही. आपल्यानंतर आपल्या बाळाची काळजी घेणारा कोण ही चिंता अशा मुलांच्या पालकांना नेहमीच असते. काही मुले स्वबळावर जीवनाला आकार देतात. पण त्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे कौटुंबिक, सामाजिक वातावरण सक्षम असावे लागते. न्याय देऊन न्यायालयाचे काम संपुष्टात येते. पण त्या कुटुंबाला खूप मोठ्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागते. ह्या बाबतीत आयुर्वेदातील ‘श्रेयसी प्रजेचा’ मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो. त्याचा उहापोह नक्कीच व्हायला हवा. म्हणून हा लेख प्रपंच.

    मार्गाधारे वर्तावे विश्व हि मोहरे लावावे !

    या भावार्थ दीपिकेतील वचनाप्रमाणे आप्तस्वकीयांनाही त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे. गरज निर्माण झाली की शोधाशोध किंवा संशोधन सुरु होते. म्हटलेच आहे की, ‘गरज ही शोधची जननी आहे.’ प्रचंड महागाईच्या काळात अनेक अपत्यांना जन्म देण्यापेक्षा ‘एक किंवा दोन अपत्येच पुरेत’ असा बहुतेकांचा निर्णय असतो. म्हणून होणारी संतती सदगुणी, सुंदर, दीर्घायु, बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व व्यंगरहित असावी. ‘श्रेयसी प्रजेचे’ वर्णन करताना महर्षी चक्रपाणी म्हणतात.

    श्रेयसी प्रजा इच्छतो इति अत्र श्रेयसी प्रजा

    गुणवान पुत्रो, गुणवती च कन्या अभिप्रेतो !

    गुणवान अपत्यप्राप्ती ‘क्वालिटी अश्युरन्स’ हेच ध्येय ठरविल्यावर नियोजन आणि व्यवस्थापन ओघाने आलेच. गर्भस्थापनेचे व गर्भावस्थेचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणे ही माता पित्यांची जबाबदारी ठरते.

    सामर्थ्यवान व निर्दोष वीर्य असलेला पुरुष, अविकृत रज, गर्भाशययुक्त स्त्री व श्रेष्ठ दर्जाचा पोषक आहार यामुळे ‘श्रेयसी प्रजा’ निर्माण होते. ऋतुकालानुसार उत्तम जमिनीत पोषक द्रव्यांचा वापर करून शेतीबागायत केली तर त्याचे फळही उत्तम मिळते. त्याचप्रमाणे सुयोग्य दिन गर्भस्थापनेसाठी निवडणे आवश्यक ठरते.

    रजोदर्शनापासून सोळा रात्रींपैकी फक्त दहा रात्रीच गर्भाधारणेस प्रशस्त आहेत. रजोदर्शनापासून ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १४, १५ ह्या दहा रात्रीत मैथुन केल्यास व्यंगरहित संतती प्राप्ती होते. समरात्री समागम केल्याने पुत्रप्राप्ती व विषम रात्री समागम केल्याने कन्याप्राप्ती होते असे आयुर्वेदाचे मत असले तरी ह्यावर अधुनिक पद्धतीने संशोधन झालेले नाही, म्हणून तूर्त हा वादाचा विषय आहे.

    ऋतुकाली चौदाव्या रात्री संग केल्याने अत्यंत धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ, परोपकारी, दृढनिश्चयी, आत्मानुभवी महापुरुष जन्माला येतो. पंधराव्या रात्री समागमामुळे पतिव्रता कन्या जन्माला येते. सोळाव्या रात्री व्यवाय केल्याने सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा सर्वाधारभूत चक्रवर्ती राजा जन्माला येतो.

    शुभ वार - व्यंगरहित संततीसाठी - सोम, बुध, गुरु, शुक्र

    शुभ तिथिप्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या अशा दहा तिथि गर्भधारणेसाठी वर्ज्य आहेत.

    दोन्ही पक्षातील उरलेल्या वीस तिथि गर्भाधानासाठी शुभ आहेत.

    अशुभ नक्षत्ररेवती, अश्विनी, पुण्य, अश्लेषा, मघा, चित्रा, मृग, मूळ ही नक्षत्रे गर्भाधानासाठी योग्य नाहीत.

    मध्यम नक्षत्र - भरणी, कृतिका, आद्रा, पूर्वा, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा ही सात नक्षत्रे मध्यम स्वरुपाची आहेत.

    सर्वश्रेष्ठ नक्षत्रे - रोहिणी, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा ही अकरा नक्षत्रे गर्भधानासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहेत.

    शुभ मास - वसंत ऋतूतील दोन महिने व हेमंत – शिशीरातील चार महिने असे एकूण सहा महिने गर्भधानासाठी योग्य आहेत. इतर ऋतूंमधे प्रजास्थापनेसाठी व व्यंगरहित संततीसाठी मैथुन करू नये.

    गर्भाधान व्यवस्थापन - विवाहानंतरच्या काळात गर्भाधानास योग्य अशा निवडलेल्या दिवसांच्या तीन महिने अगोदर स्त्री आणि पुरुष दोघांचीही वमन – विरेचन, स्नेहन / स्वेदनपूर्वक शरीरशुद्धी करावी. वमन - विरेचनानंतर संसर्जन क्रम विधिवत करावा. त्यानंतर पूर्ण आहार सुरु करावा. पंधरा दिवसांनी आस्थापन व अनुवासन बस्ति द्यावा. हे सर्व उपक्रम तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावे.

    गर्भाधान - गर्भाधानासाठी सुनिश्चित दिवशी दोघांनीही उद्वर्तनादी सुगंधी द्रव्याचा वापर करून शुचिर्भूत व्हावे. श्वेत वस्त्रे परिधान करावीत. धूप, उदबत्ती, कापूर, इ. लावून घरात सुगंध पसरवावा. आनंद देणारे संगीत लावावे. मन प्रफुल्लित, आनंदित, प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करावे. मधुर, सात्विक असा आहार घ्यावा. शयनमंदिरात भडक रंग, हिंस्त्र प्राण्यांची चित्रे नसावीत. भिंती पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असाव्यात. डोके पूर्वेकडे येईल अशी शय्येची रचना असावी. पूर्वरात्र उलटल्यावर पादप्रक्षालन करून पुरुषाने उजवा पाय, स्त्रीने डावा पाय शय्येवर ठेवून चढावे. स्त्रीने पुरुषाच्या डाव्या बाजूला असावे. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने समागम करावा.

    आहारssचार चैष्टिभि: यादृशीभि समन्तितौ |

    स्त्रीन्युसौ स्मुपेयातां तयो पुत्रोsपि तदृश ||

    आहार, आचार, विचार व चेष्टा इत्यादिकांनी युक्त होऊन स्त्री-पुरुष ज्या भावनेने एकत्र येत असतील तशीच संतति त्यांना निश्चित प्राप्त होईल.

    लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
    आयुर्वेद वाचस्पति
    सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई

  • डीएनएमधील नत्रयुक्त घटक

    डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि, पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील ॲडेनीन, रायबोज साखरेबरोबर अँडिनोसिनचा रेणू बनवितो. अँडिनोसिन फॉस्फेटशी बंध तयार करून असे काही रेणू बनवितो ज्यात विविध प्रक्रियांसाठी लागणारी उष्मांक शक्ती सामावलेली असते.

  • भारताचे यशस्वी अंतराळ उड्डाण….

    भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत.

  • नशिबावरचा विश्वास

    AMOR FATI - नशिबावरचा विश्वास

    हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.
    याचा अर्थ आहे "नशिबावरचा विश्वास".

    आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.

    थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
    एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?
    "अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?
    की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
    पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"
    स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."

    आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल - नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे.
    ६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

    मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

    # कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,

    # कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

    # कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,

    # कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

    # कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

    तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.

    तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे.
    जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.

    एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं.
    पण तेव्हा शांत रहा.

    जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल...
    बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल...
    सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल...
    हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल...

    चला मित्रांनो आमोर फाटी स्विकारुया...

    -- राम जोशी, अलिबाग
    (अनुवाद)


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..