(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीहरी स्तुति – ३८

    भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे शास्त्राने सुस्पष्टरीत्या सांगितले आहे. त्यागाच्या या रचनेत शब्दच सर्वस्व असा आहे. यात प्रथम सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यानंतर स्व चा देखील त्याग करावा लागतो. त्याच वेळी परमात्म तत्त्वाची प्राप्ती होते. हीच प्रक्रिया उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,

      November 28, 2020


  • काळाचा पांढरा हात !

    नेहेमीचा शौनक अभिषेकींचा खर्ज /शास्त्रीय आवाज येथे अधिक मऊ / हळुवार आणि भावगीत सुलभ वाटतोय. त्यामानाने राहुलचा थोडा कठोर/ टणक वाटतोय.(” किंचित हार्श” ला हा शब्दपर्याय जवळचा वाटतो कां?)

      December 20, 2021


  • माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सव 

    गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

      January 22, 2018


  • “अोरॅकल मधलं मिरॅकल”

    Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा "Oracle Open World" हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला.
    तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात येते.
    "आमचे वक्ते हे भविष्याला नवा आकार देणारे लोक आहेत" अशी शेखी मिरवत Oracle या कार्यक्रमासाठी आपले वक्ते निवडते. आणि या वेळी प्रथमच एका भारतीय नेत्याला त्यात आमंत्रित करण्यात आले, त्या क्षेत्रातील धुरंधरांसमोर आपले मत मांडण्यासाठी !
    ते नेतेे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
    त्या जगाशी तसे पाहता अर्थाअर्थी संबंध नसलेल्या नेत्यास मिळालेले आमंत्रण ही भारत व मुख्यत्वे महाराष्ट्रासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.
    त्या परिषदेचा हा लेखाजोखा -
    १९ सप्टेंबर ला अमेरिकन वेळेनुसार सुमारे सकाळी नऊ वाजता परिषद सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्याआधी काही वक्त्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर Oracle च्या CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्झ मंचावर आल्या. पुढच्या वक्त्याविषयी बोलायला त्यांनी सुरुवात केली, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर आदर झलकत होता.
    "मी फेब्रुवारी महिन्यात Make In India Week च्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून भारावून गेले" असे त्या सांगत होत्या. अत्यंत आदर आणि कौतुकाने..
    आणि शेवटी सगळे शब्द गुंडाळून , "आता काही क्षणांतच आपल्याला CM यांना ऐकायला मिळेल आणि खरोखर सांगते, मी फारच excited आहे " असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मंचावर आमंत्रित केले.
    माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर येण्याआधी महाराष्ट्र सरकारच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी व व्हिजन वर एका लघुपटाद्वारे दृष्टिक्षेप टाकण्यात आला. "आपले सरकार" या app च्या माध्यमातून सर्व शासकीय सेवा एका छताखाली आणण्याच्या प्रयत्नाचे विवरण केल्या गेले. 'People First' या सरकारच्या तत्त्वाचाही उल्लेख करण्यात आला.
    तद्नंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मंचावर आले, तेच एक वेगळा आत्मविश्वास घेऊन. सर्वप्रथम त्यांनी आपले ठेवणीतले मोहक हास्य करत CEO सॅफ्रा यांचे आभार मानले आणि मग "Brothers and Sisters" - "बंधू आणि भगिनींनो" म्हणत आपल्या भाषणास सुरुवात केली.
    आणि त्यानंतर " येथे जमलेल्या सर्व मान्यवरांकडे पाहता, मी क्षणभर विचारात पडलो, की मी येथे का आलो आहे?" अशा जबरी वाक्याने आपले विचार मांडण्यास प्रारंभ केला.
    "भारत हा महत्त्वाकांक्षी युवांचा देश आहे. युवा पिढीच भारताची खरी ताकद आहे आणि आता ती योग्य वेळ आली आहे की आम्ही या पिढीस विकासाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात, आता अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही" असे बोलून त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला.
    Cloud Computing and Big Data Analytics या क्लिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यास महाराष्ट्रातील तरुणाई व खेड्याखेड्यांवर कसा प्रभाव पडेल, सरकारात अधिकाधिक कार्यक्षमता व पारदर्शिता कशी प्रस्थापित होईल हे सर्व सांगतानाच "तंत्रज्ञान हे तटस्थ असते. ते लिंग, व्यक्ती किंवा कुठल्याही अन्य निकषाआधारे भेदभाव करत नाही." हे अत्यंत प्रगल्भ विधान त्यांनी केले.
    "आम्हाला एक प्रतिक्रियाशील, पारदर्शक सरकार प्रस्थापित करायचे आहे, जे तंत्रज्ञानाद्वारे साध्य केल्या जाईल."
    "आम्हाला बदल घडवून आणायचा आहे. असा बदल, की राज्याचा प्रत्येक नागरिक सरकारचा भाग असेल आणि आपला सहभागही नोंदवेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने Oracle आमचे हे स्वप्न पूर्ण करेल."
    असे सांगत त्यांनी तिथे उपस्थित अन्य मान्यवरांनाही महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.
    त्यानंतर CEO सॅफ्रा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत Oracle च्या सहभागाबद्दल त्यांचे काय मत आहे असा प्रश्न केला.
    तेव्हा "आपण एका अशा काळात राहतो जिथे आपण जो विचार करतो, तंत्रज्ञान ते प्रत्यक्षात आणते. आणि अशा प्रकारे माझ्या राज्याच्या हर एक, शहरी किंवा अगदी दूरस्थ ग्रामीण भागातील नागरिकाला माझ्या सरकारशी जोडता यावे, एवढीच माझी Oracle कडून अपेक्षा आहे." हे अत्यंत दूरदर्शी आणि भावनिक विधान त्यांनी केले.
    त्याचबरोबर "कोणत्याही परिवर्तनाच्या प्रक्रियेत राजकीय नेतृत्व हे केवळ कल्पनानिर्मितीचे काम करते, तर तंत्रज्ञ ती कल्पना प्रत्यक्षात साकारतात."
    असे सांगत त्यांनी Oracle च्या भावी योगदानाचे महत्त्वही अधोरेखित केले.
    आणि इतकेच नव्हे तर, MOU signing आधी सॅफ्रा यांना महाराष्ट्र सरकारच्या 'तंत्रज्ञान सल्लागार' मंडळात सहभागी होण्याची विनंती करत मुख्यमंत्र्यांनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. CEO सॅफ्रा कॅट्झ यांनी तसे बोलूनही दाखवले.
    एकूणच यंदाची Oracle Open World Conference म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी देखील आश्चर्याचा एक गोड, सुखद व आश्वासक असा धक्का होती.
    माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली, लहेजा, आत्मविश्वास, आणि एकूणच त्यांचे Mannerism स्वतःच हे सगळे काही स्पष्ट करते. जागतिक पटलावर वावरतांना स्वतःला कशा प्रकारे Present करावं हे त्यांना अगदी बरोबर समजतं.
    कदाचित अतिशयोक्तीही वाटेल, पण या एकाच परिषदेतून त्यांनी, ते एक जागतिक नेते होण्याच्या पात्रतेचे आहेत अन त्या दिशेने त्यांची वाटचालही योग्यरित्या चालू आहे हे दाखवून दिलंय.
    Oracle सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीकडून एवढा आदर व कौतुक प्राप्त करणे, अगदी उच्चविद्याविभूषित तंत्रज्ञांसोबत इतकं लिलया वावरणे, आणि ओघाने भारताची व मुख्यत्त्वे महाराष्ट्र राज्याची शान वाढवणे व त्याचबरोबर विकासासाठी नवनवे व समकालीन उपाय शोधून ते राबवणे,
    या साऱ्या गोष्टी श्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या उज्ज्वल व नेत्रदीपक भवितव्याची नांदीच आहेत..

      September 28, 2016


  • वर्ल्डवाइडवेब’ ची ३३ वर्षं

    www म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर एखादी वेबसाइट ओपन करण्यासाठी त्याआधी www टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट ओपन होत नाही. या पेजवर एक टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया आपल्याला दिसेल. या सर्वांना एकत्रित जोडण्यासाठी एका हायपरलिंकची मदत होते.

      March 12, 2022


  • इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जगत

    इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जगत

    …..आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह स्वतःची समाजाप्रती असलेली उपयोगिता सिध्द केली पाहिजे. माध्यम आणि माध्यमकर्मींनी प्रसारमाध्यमातील व्यापार आणि हितसंबंध यापलीकडे जाऊन आपली उपयोगिता सिद्ध केली पाहिजे. असे झाले तर माध्यम जनसामान्यांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होतील.

      September 1, 2023


  • जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने

    दर वर्षी ८ मार्चला सर्व जगभर जागतिक महिला दिन मोठया प्रमाणावर साजरा केला जातो पण महिलांचे सर्व प्रश्न सुटतात का?

      March 7, 2011


  • भारतीय स्त्री वैज्ञानिक असीमा चटर्जी

    असीमा चॅटर्जी  या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या  ज्या  सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे  सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी  भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या  पहिल्या महिला होत्या.

      August 13, 2025


  • आजचा आरोग्य विचार – भाग एकोणीस

    अजून कोणी पाणी वाचवा मोहिमे अंतर्गत कागदच वापरा योजना सुरू करा योजनेची घोषणा केलेली नाही. पण पाश्चात्य देशात मात्र या कागद वाचवा योजनाच चालतात. तिथे जेवल्यानंतर सुद्धा वाटीभर पाण्यात हात बुचकळून कागदाला बोटं पुसायची पद्धत. मग नंतरच काय विचारता ?

      February 19, 2018


  • सर्दी-खोकल्याचा सामना

    थंडीत खूप वेळा सर्दी-खोकल्याचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. पण यावर काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो.

    लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते.

    चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.

    नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

    काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.

    हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा ऊपाय आहे.

    आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.

    पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो. पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा चमचा खसखस पेस्ट, ३-४ चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो. १०० ग्रॅम पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवावा. झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.

    कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसंस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत. कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासुन तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम (कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे.

    सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 10, 2017