वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
महााष्ट्रात अनेक ोलीभाषा आहेत. त्यातल्याच पुणेरी आणि वर्हाडी यांच्यातला हा मेीर संवाद
होय, मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी फसवलंय. मला आय.ए.एस., आय. पी. एस. वा तत्सम पदवीधारक अधिकाऱ्यांनीही फसवलंय. माझा साधं सोपं जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊन यांनी मला मोठी स्वप्न दाखवून फसवलंय. पहिलं गरीबी हटाव आणि नंतर अच्छे दिनचा नारा देऊन मला या सर्वांनी फसवलंय..
राजवाडे, किल्ले, गढ्या, गोदामे, बंधारे ही प्राचीन बांधकामे होत. ही सर्व बांधकामे दगडी होती. खडकाळ भागांत खडक सुरुंगाने फोडून त्याचे तीस सें.मी. ते एक मीटर आकाराचे दगड काढण्यात येत. छिन्नी हातोड्याने दगड घडवून त्यांचे घनाकृती किंवा लंबघनाकृती आकार करून ते एकावर एक रचून भिंती बांधण्यात येत असत.
पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते.
चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती.
देवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला ….
निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे.
मानवी आयुष्याचे गणित लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यातच खरे शहाणपण आहे. यासाठी वेळ न दवडता अभी नही तो कभी नही हे सूत्र ध्यानात ठेवावे.
हिच आपली शोकांतिका आहे. शिक्षणव्यवस्थेत प्रश्न विचारण्याची सोयच ठेवलेली नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti