वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक प्रियकराला आपल्या प्रेयसीचा व प्रेयसीला आपल्या प्रियकराचे पहिले चुंबन घेऊन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण नोंदविण्याची इच्छा असते. परंतु, चुंबन कसे घेणार, या भीतीपोटी संधी येऊनही प्रेमीयुगल चुंबन घेण्याचे धाडस करत नाहीत…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला, सातत्याने होत असलेल्या त्यांच्या आत्महत्यांना अनेक बाबी जबाबदार आहेत. परंतु शासनाचे चुकीचे धोरण ही त्यामधील मुख्य बाब म्हणावी लागेल. शेती आणि शेतीशी संबंधित बाबींच्याच बाबतीत शासनाचे धोरण चुकत आहे, असे नसून शेतीशी थेट संबंधित नसलेल्या अनेक बाबींच्या संदर्भातही शासनाचे चुकीचे धोरण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे.
वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.
तुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण.
एलियन्स या विश्वात कुठे राहतात हा एक माणसाच्या दृष्टीने असलेला व्यापक चर्चेचा विषय आहे. त्यांचे अस्तित्वात या विश्वात आहेत की नाही, ते आपल्याला पाहत आहेत की नाही, ते पृथ्वीवर आहेत का, असे काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. एका स्वयंघोषित 'टाईम ट्रॅव्हलर'नुसार, एलियन ८ डिसेंबर रोजी पृथ्वीवर उतरतील. खरच टाईम ट्रॅव्हलची व्याख्या करायची झाली तर एखादी व्यक्ती जी भूतकाळातील किंवा भविष्यातील वेगवेगळ्या काळात फिरू शकतो त्याला प्रामुख्याने टाईम ट्रॅव्हलर म्हणतात.
TikTok वापरकर्ता एनो अलारिक, जो एक स्वयंघोषित 'टाइम ट्रॅव्हलर' देखील आहे, याने कॅप्शनसह एक व्हिडिओ पोस्ट केला: "सावधान! होय, मी २६७१ सालचा एक वास्तविक-वेळ प्रवासी आहे, येणाऱ्या या पाच तारखा लक्षात ठेवा." असे या टाईम ट्रॅव्हलरने कमेंट द्वारे हे विधान केले आहे.
स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच अंदाज शेअर केले आहेत. या वर्षी डिसेंबरमध्ये मानव एलियनशी संवाद साधू शकतो, असे सर्वात लक्ष वेधून घेणारे विधान त्यांनी केले आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार, ८ डिसेंबर रोजी एलियन पृथ्वीवर एका महाकाय उल्कामध्ये येऊ शकतात. मार्च २०२३ मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला ७५० फूट मेगा-त्सुनामीचा सामना करावा लागेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. हा माणूस २६७१ सालचा असल्याचा दावा करतो. .
एलियन लँडिंग व्यतिरिक्त, अलारिकने इतर अनेक गोष्टींचा अंदाज लावला. त्याने पुढील सहा महिन्यांत घडणाऱ्या इतर चार घटनांचाही अंदाज लावला, त्यातील पहिली घटना ३० नोव्हेंबरला घडण्याची शक्यता आहे. त्या दिवशी पृथ्वीचे अनुकरण करणारा एक नवीन ग्रह जेम्स वेब दुर्बिणी शोधून काढेल असे त्याने सांगितले. त्यानंतर, 8 डिसेंबर रोजी एलियनशी संवाद होईल.
तिसरा डावा हा ६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे, जिथे किशोरांचा एक गट इतर आकाशगंगांमध्ये वर्महोल उघडण्यासाठी एक उपकरण शोधेल. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात, अलारिकने मारियाना ट्रेंचमध्ये प्राचीन प्रजातीचा शोध लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील रहिवाशांना, विशेषत: सॅन फ्रान्सिस्को, 750 फूट मेगा-त्सुनामीचा तडाखा बसेल, असे त्याच्या शेवटच्या भविष्यवाणीत म्हटले आहे.
जरी या स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने अंदाज व्यक्त केले असले. तरी आतापर्यंत घोषित केलेल्या अनेक टाईम ट्रॅव्हलर्सचे विधानसिद्ध झालेली नाहीयेत . त्यामुळे या टाईम टेबल चे विधान खरे होते की नाही हा एक मोठा चर्चेचा विषय आहे !
-- अथर्व डोके
सूचना - वरील लेखाशी लिहिणारा लेखक सहमत असेलच असे नाही.
भारत इंठाजांच्या गुलामगिरीतून मुत्त* झाला; स्वतंत्र झाला. बघताबघता या घटनेला 59 वर्षे उलटली. या 59 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न सतत करीतच असते. काही लोक दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण जो उपाय समोरच्या व्यक्तीला लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो तोच आपल्यालाही लागू पडेल असे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे.
अणुभट्टीत अपघाताच्या वेळी होणारे स्फोट हे धोकादायक असले तरी ते अणुबॉम्बसारख्या तीव्रतेचे स्फोट नसतात. तसंच हे स्फोट अनेकदा अणुविखंडनामुळे नव्हे तर इतर कारणांमुळे घडून येतात.
मुंबईचे आकर्षण इतर लोकांसारखेच मलापण पहीलेपासुन होते. मुंबईबद्दलच्या अनेक गोष्टी लहानपणापासुनचं मनावर बिंबवल्या गेल्या आहेत.
जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था दोन प्रमुख गोष्टींवर अवलंबून आहे. एक आहे पर्यटन आणि दुसरी आहे सफरचंद आणि इतर सुकामेवा. दहशतवाद्यांनी गेले काही दिवस सातत्याने सफरचंद उद्योगाला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांचे सध्या लक्ष्य आहे तो काश्मीरचा सफरचंद उद्योग हे स्पष्ट आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti