वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
क्रिकेटमधील यष्टीरक्षणाचे काम पाठीला त्रासदायक तर असतेच पण ग्लोव्ह्जमुळे मनगटाच्या पुढील भाग ‘हवाबंद’ होत असल्याने हातांसाठीही त्रासाचे असते. आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या रबरी मोज्यांच्या आतून घालण्याजोगे पातळ मोजे उपलब्ध झाले आहेत पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या ‘पावात’ एका यष्टीरक्षकाने यावर नामी युक्ती शोधून काढली होती.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना लोकनेते आण्णासाहेब मगर यांनी ४ मार्च १९७० साली पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी-निगडी ही गावे एकत्र करून केली. शासकीय समितीने १९७० ते १९७८ पर्यंत कारभार केल्यानंतर २० मार्च १९७८ मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली.
पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती
ह्या दिवशी लोक विविध प्रकारचा भुताचा, पिशाचांचा, चेटकिणीचा, वेश परिधान करून रस्त्यांवर उतरतात. तसेच बरेच जण चांगल्या भूतांचे देखील कपडे परिधान करतात. ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते.
प्रत्येक घराचे जसे कुदैवत – कुलस्वामिनी, तसंच शहराची, नगराची, गावाची सुद्धा एखादी जागृत देवता ही असतेच ज्याला ग्रामदेवता असंही म्हणतात. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची एकतरी ग्रामदेवी ही असतेच.
आपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात? मराठी माणसाने दुसर्या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या महाराष्ट्रदिनी करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे?
६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.
पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.
अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.
तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.
सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रकाशन दिनांक :- 02/01/2005
तिकडे सुनामी लाटांनी दक्षिण भारताच्या किनारपट्टीला धुऊन काढले आणि त्याच वेळी पश्चिम किनाऱ्यावरील मुंबईत देशी दारूच्या लाटांनी जीवघेणे थैमान घातले. विषारी दारू प्राशन केल्याने तब्बल 83 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. केवळ आठवडाभराच्या आतच दोन वेगवेगळ्या घटनांत एवढ्या मोठ्या संख्येत बळी गेलेल्या लोकांमुळे अवैध दारूचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे.
२. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे.
३. मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा गायब केला.
४. सध्या शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आधी झेरॉक्स वाल्यांना असते.
५. गर्लफ्रेंड पटवल्यानंतरच मुलांना कळते की, 200-250 रुपयांचेसुध्दा चॉकलेट्स असतात.
६. आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो. अन् हे लोक ३ रूपयांचे पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.
७. आमच्या देशात "हाय अलर्ट" म्हणजे पोलिसांच्या हातात काठी पकडून त्यांना नाक्यावर उभे करणे.
जसे काय आतंकवादी "एके ४७" नाही तर म्हशी घेऊन हल्ला करणार आहेत...
" थोडेसे मजेदार वाटले तरी वास्तवता आहे हि मित्रांनो "
नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून संपले. दरवर्षीची परंपरा याही वर्षी पाळल्या गेली. विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा वार्षिक सोहळा यापलीकडे नागपूर अधिवेशनाला आता महत्त्व उरलेले नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti