वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ॲमेझॉनचे जंगल तर वनस्पती आणि प्राण्यांच्या तीस लाख प्रजातींचे आश्रयस्थान आहे. हे जंगल जगातील सर्वात मोठे सदाहरित जंगल आहे. ॲमेझॉनचं जंगल हा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. बाहेरील लोकांसाठी ॲमेझॉनचं गुढ आणि रहस्यानं भरलेलं जंगल नेहमीच खुणावत असतं.
‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते.
मी दिव्यांचा संग्रह करायला सुरुवात केल्याला आता ५० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सध्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळांचा शोध घेत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी दीपमाळ आहे. ही संपूर्ण दीपमाळ, चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल ! या दीपमाळेसह आणखी काही वैभवशाली इतिहासाच्या श्रीमंत खुणा पाहायला मिळाल्या.
या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,
श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां
श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायकीम् ।
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ३॥
श्रीविद्यां- आई जगदंबेच्या तात्त्विक स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या शास्त्राला श्रीविद्या असे म्हणतात.
शिववामभागनिलयां- भगवान शंकरांच्या अर्ध्या डाव्या भागामध्ये निवास करणारी.
स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचा विचार करताना शास्त्रात पुरुषाचे उजवे तर स्त्रीचे डावे अंग पवित्र स्वरूपात वर्णन केले आहे. पुरुष सामान्यतः बुद्धिप्रधान असतो तर स्त्री सामान्यत: भावनाप्रधान.
अर्धनारीनटेश्वर स्वरूपात उजवे अंग भगवान शंकरांचे तर डावे अंग आई जगदंबेचे असते. दोघांचाही पवित्र भागाचे एकत्रीकरण. परमपवित्र असे हे स्वरूप.
ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां- ह्रीं या मंत्राने प्रकाशित असणारी. त्या स्वरूपात विश्वाला मार्गदर्शन करणारी. त्याच्या आधारे साधकांना दर्शन देणारी.
श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं- श्रीयंत्र याच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूवर निवास करणारी, श्रीमत्सभानायकीम् - श्री म्हणजे वैभव. त्याने युक्त असल्यामुळे भगवंताला श्रीमत्, श्रीमान असे म्हणतात. त्यांची सभा अर्थात हे संपूर्ण विश्व. या जगाची नायिका ती श्रीमत्सभानायकी.
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं- सहा मुख असल्यामुळे त्यांना षण्मुख असे म्हणतात ते कार्तिकेय, स्कंद. विनायक अर्थात भगवान शंकर पार्वती च्या घरी झालेले श्री गणेश अवतार. यांची जननी.माता.
श्रीमज्जगन्मोहिनीं- संपूर्ण जगाला आकर्षित करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या, आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात.आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळा देखील वापरतो.पंजबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहे बुवा पण मला अजुनही तो खायचा योग आला नाही,मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीर देखील सुरेख लागते बरं का.
तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते ही पाहणे गरजेचे आहे.
मुळ्याचे झुडूप असते व मुळा जो पांढरा असतो जमिनीखाली उगवतो तर पाल्याला उगवणा-या शेंगामध्ये बिया असतात.मुळ्याचा पाला हा कडू,खारट व गोड अशा मिश्र चवीचा असमतोल तो शरिरातील कफ आणी वात दोष कमी करतो.
आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)लघ्वीला कमी व बुळबुळीत होत असेल तर मुळ्याच्या पाल्याचा रस १/४ कप सकाळी अनशापोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावा.
२)छोटा मुतखडा असल्यास मुळ्याच्या पाल्याचा रस १/२ कप + १ चमचा धणे पुड नियमीत ६ महिने घ्यावे तो खडी विरघळतो.
३)शौचास काळपट पांढरे होणे,भुक न लागणे,अंग जड होणे अशा तक्रारी मध्ये १/४ कप मुळ्याच्या पानांचा रस+१/४चमचा कळी मिरीपूड रोज दिवसातून ४ वेळेस काही दिवस घ्यावी.
४)संडासला साफ होत नसेल तर मुळ्याच्या पाल्याची भाजी नियमीत जेवणात असावी.
५)वारंवार सर्दी खोकला होत असल्यास २ चमचे मुळ्याच्या पाल्याचा रस+२ चिमूट मिरपुड+ १/४ चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस काहि दिवस घ्यावे.
मुळ्याचा पाला खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास व वारंवार संडासला होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शेवग्याच्या पाल्याची एक मजेशीर दंत कथा मला माझ्या सासुबाईंनी सांगितली आहे ती तुम्हाला आधी सांगते.एकदा शेवग्याची भाजी लग्न होऊन काही दिवस झाल्यावर माहेरी जायला निघाली,तिला तिच्या नव-साने त्याचदिवशी घरी परतयायला सांगितले होतेनाहीतर माहेरी येऊन तुझी हाडे मोडीन असे तो म्हणाला पण हि बिच्चारी त्या दिवशी माहेरी राहिली, रागाने तिचे यजमान तिच्या माहेरी गेले आणि बदडून बदडून तिची हाडे खिळखिळी केली.म्हणूनच शेवग्याच्या पाल्याची भाजी ज्या दिवशी काढतो त्याच दिवशी चिरून ठेवावी लागते जर तुम्ही दुस-या दिवशी चिरायला गेलात तर तिचे पान अन् पान मोकळे झालेले असते(फ्रिज देखील कामी येत नाही बरं का)
तर अशी हि शेवग्याची भाजी पुष्कळ जणांची आवडीची पण हि चांगली भाजी आषाढ व श्रावंण महिन्यात चांगली मिळते.हिचे मोठे २०-२५ फूट उंच झाड असते.व हिची पाने बारीक असतात.
हि चवीला तिखट,कडू असते व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
हि भाजी चांगली पथ्यकर व औषधी गुण युक्त आहे बरं का! त्यामुळे घरगुती उपचारात वापरतात.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना आपण:
१)सुजेवर शेवग्याच्या पानांचा लेप लावावा.
२)डोके दुखीमध्ये शेवग्याच्या पाल्याचा रस त्यात मिरे खलून डोक्यावर लेप करावा.
३)जखम होऊन चिघळली असेल व त्यात पू झाला असेल तर शेवग्याच्या पाल्याची चटणी त्या जखमेवर लावावी(क्रुपया हा उपाय मधुमेहामुळे चिघळलेल्या जखमेवर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये हि विनंती).
४)गळवांवर शेवग्याच्या पाल्याच्या रसात शेवग्याचे बी उगाळून लावावे.
५)काही व्यक्तींना ऋतू बदलला कि सर्दी,खोकला,होतो त्यांनी सकाळी उपाशी पोटी शेवग्याचा रस ४ चमचे +मध १ चमचा+१ काळी मिरी हे मिश्रण ४२ दिवस द्यावे.
अतिप्रमाणात शेवग्याची भाजी खाल्ल्यास घाम येतो,पोटात आग होते,चक्कर येते व घशाला कोरड पडते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची.
“जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे.
केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.
Copyright © 2025 | Marathisrushti