वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

अजिंठा लेण्यांच्या आतील हा सुंदर फोटो....
-- संतोष पाटील
वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..!
(श्राद्ध हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटील आणि गहन असा विषय आहे. या विधीचा साकल्याने विचार एका छोट्या लेखात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधीक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न.)
हिंदू धर्म संस्कृतीमधील एक महत्वाची संकल्पना म्हणजे धार्मिक आचार. नामकरण, मुंज, विवाह अशा विधींच्या जोडीनेच हिंदू जीवनप्रणालीत श्राद्धविधीचे महत्व विशेषत्वाने आहे.
श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. श्राद्धाच्या विविध व्याख्या धर्मशास्त्रकारांनी सांगितल्या आहेत. त्यामध्ये दिवंगत पूर्वजांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देश काळ आणि पात्रता विचारात घेता ब्राह्मणाला काही देणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धामध्ये दिवंगत व्यक्तीला अनुसरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण व गरजू व्यक्तीना भोजन व दान दिले जाते. अशी एकूण ९६ प्रकारची विविध श्राद्धे करणे विहित मानले जाई. आता या सर्व श्राद्धविधींचे आचरण करणे काळाच्या ओघात शक्य नसले तरी व्यक्तीच्या निधनानंतर केले जाणारे श्राद्ध, वर्षश्राद्ध असे काही निवडक श्राद्धविधी आजही समाजात केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे महालय श्राद्ध-
भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काल हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करीत नाहीत, त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि खरेदीही करीत नाहीत !
महालयाचा काळ
या काळात महालय करणे न जमल्यास आश्विन अमावास्येला दिवे लावून हे श्राद्ध करावे. या श्राद्धात विश्वेदेव तसेच धुरिलोचन नावाच्या पितरांना पिंडदान केले जाते.
महालयश्राद्धाचा गौण काळ आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत मानण्यात आला आहे.
( याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात विपुल चर्चा आढळते, तरी येथे केवळ निवडक संदर्भच नोंदविले आहेत. जिज्ञासूंनी याविषयी अधिक माहिती अवश्य घ्यावी. )
महालयाचे वेगळेपण- वसुधैव कुटुंबकम।
महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही !
महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो.यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा , पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण , काका-काकू, मामा-मामी, मावशी , आत्या ,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो. आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त , आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशून आपण हे श्राध्द करतो. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करतो .आपल्या नकळत झाडे तोडली जातात, कीड-मुंगी-कीटक आपल्या हातून नकळत मारले जातात . त्यांचीही आठवण आपण यावेळी करतो.सारांश,आपल्या जवळचे असोत वा दूरचे असोत, हे विश्वचि माझे घर या न्यायाने आपण सर्वच दिवंगत लोकांचे स्मरण महालय श्राद्धात करतो. चारही दिशांना असलेल्या ज्ञात अज्ञात अशा सर्वासाठी श्रद्धेने पुष्प अर्पण करण्याचे हे दिवस. तसेच माझया कुटुंबाचा "वंशवृक्ष" आठवण्याची संधी. त्यानिमित्ताने कुटुंबाचेही संघटन !
ज्या काळात समाजात विधवा महिलांचे स्थान हे निम्न दर्जाचे होते त्या काळात पती जिवंत असताना सुवासिनी असताना मृत्यू येणे हे महिलेच्या सामाजिक आयुष्यात फार महत्वाचे होते. त्यामुळे अर्थातच सवाष्ण गेलेल्या महिलेसाठी अविधवा नवमीचा स्वतंत्र दिवस योजला गेला असावा.
जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने आपल्याला आपला वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने आपण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती करून घेतो. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंबासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने आपलाही आत्मविश्वास वाढतो व आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्यालाही प्रेरणा मिळत राहते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या सामाजाची मदत घेत असतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही आपल्या नकळत का होईना आपण चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहता येऊ शकेल.
आधुनिक काळातही असे अनुभवास येते की या काळात सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात शक्यतो टाळले जाते. शुभकार्याची चर्चाही या काळात केली जात नाही. खरं म्हणजे आपले दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वीलोकात येवून आपल्या सर्व गोष्टींचे अवलोकन करीत असतील तर आपल्या कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये ?
भारतातील संस्कृती ही कृषी आधारित आहे. त्यामुळे शेतीची कापणी' होऊन पहिले पीक हाती आल्यावर मगच कदाचित कृषीवलाला आर्थिक स्थिरता मिळे ज्यामुळे तो काही आवर्जून खरेदी करू शकत असे. पण ज्या काळात पिके अजून शेतातच कापणीसाठी वाट पाहत उभी आहेत त्या काळात खरेदी करणे टाळणे इष्ट असावे. त्यातूनच कदाचित या काळात खरेदी करू नये असा संकेत रूढ झाला असावा.
ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशजांसाठी आशीर्वाद असावेत असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. श्राध्द म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण . त्यामुळे पितृपक्षात सर्व दिवंगत पूर्वजांच्या सामूहिक स्मरणाची संधी अवश्य घ्यावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
आधुनिक वेगवान काळात महालय श्राद्ध विधीपूर्वक करणे शक्य झाले नाही तरी आपल्या कुळातील तसेच ज्ञात अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना गरजूला दान देणे, समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हितार्थ उपक्रमाला हातभार लावणे किंवा आपल्या शक्ती बुद्धीनुसार आणि आवडीनुसार कोणत्यातरी विधायक उपक्रमाला हातभार लावण्याची संधी श्रद्धापूर्वक अवश्य घ्यावी.
-- आर्या आशुतोष जोशी
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्या पर्यायाचा विचार करू.
असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहता दृश्य भासे |
निराभास निर्गूण ते आकळेना | अहंतागुणे कल्पिताही कळेना ||171||
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या | स्फुरे ब्रध् रे जाण माया सुविद्या |
मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली | विवेके तरी सस्वरूपी मिळाली ||172||
स्वरूपी उदेला अहंकार राहो | तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो |
दिशा पाहता ते निशा वाढताहे | विवेके विचारे विवंचूनि पाहे ||173||
जया चक्षुने लक्षिता लक्षवेना | भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना |
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो | दयादक्ष तो सक्षिने पक्ष घेतो ||174||
विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी | परी लीहिता कोण त्याचे कपाळी |
हरू जाळितो लोक संहारकाळी | परी शेवटी शंकरा कोण जाळी ||175||
जगी द्वादशादित्य ते रूद अकःा| असंख्यात संख्या करी कोण शकःा |
जगी देव धुंडाळिता आढळेना | जनी मख्य तो कोण कैसा कळेना ||176||
तुटेना फुटेना कदा देवराणा | चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
कळेना कळेंना कदा लोचनासी | वसेना दिसेना तो जनी मीपणाशी ||177||
जया मानला देव तो पूजिताहे | परा देव शोधूनि कोणी न पाहे |
जगी पाहता देव कोटयानकोटी | जया मानली भक्ती जे तेचि मोठी ||178||
तिन्ही लोक जेथून निर्माण जाले | तया देवरायासि कोणी न बोले |
जगी थोरला देव तो चोरलासे | सदगुरूवीण तो सर्वथाही न दीसे ||179||
गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी | बहूसाल मंत्रावळी शक्ति मोंठी |
मनी कामना चेटके घातमाता | जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||180||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
ऑक्टोबरपासून थंडी वाढायला लागते. या सुमारास धुकं देखील खूप पडायला लागतं. धुक्याच्या आवरणातून जवळची झाडं तेवढी दिसत असतात; तर लांबच्या टेकड्या, झाडं धुक्यात गुरफटून गेलेली असतात. त्यातून दुरच्या झाडांचे नुसते शेंडेच दिसत असतात. आसपासच्या दर्यांतून धुक्याच्या लाटा उठत येतात. एखादा तलम दुपट्टा वार्यावर तरंगत जावा तसं धुकं वार्यावर लहरत जातं. फॉल मधल्या धुक्याची मजा काही औरच असते. टेकड्या, डोंगरांची होळी रंगात आलेली असते. एखादं नाटक सुरू व्हायच्या आधी रंगमंच पडद्याने झाकलेला असावा तसे धुक्याने डोंगर झाकलेले असतात. मग एखाद्या वळणावर गाडी वळते आणि धुक्याचा पडदा सारून आपली रंगलेली डोकी दाखवत डोंगर अचानक समोर येतात.
रस्त्यांच्या बाजूच्या फुलांचा बहर ओसरत जात असतो. रंगांची वेडी उधळण आता आटोपती घेतली जात असते. गवत पिवळं पडत असतं. शेतातल्या मक्याची कापणी होऊन गेलेली असते आणि शेतामधे आता नुसते खुंट राहिलेले असतात. मक्याशिवाय काही शेतांमधे भाजीपाला देखील तयार झालेला असतो. या हंगामात लाल भोपळा खूप येतो. शेतांत मधे मधे पसरलेले त्यांचे वेल आणि शेंदरी रंगाचे तयार झालेले भोपळे दिसत असतात.
कधी तरी फॉल सिझनमधे पाऊस पडतो. आधीचेच स्वच्छ रस्ते आणखी चकचकीत होऊन जातात. सुकलेली पानं रस्त्याच्या कडेला लोटली जाऊन पावसाने चप्प होऊन रस्त्याच्या किनारी बनून रहातात. धुक्याच्या आणि लोंबत्या ढगांच्या तलम वस्त्रातून रंगीत झाडं लंपंडाव खेळत असतात. पावसामुळे झाडांचे बुंधे आणि फांद्या काळसर ओल्या झालेल्या असतात. त्यांच्या पार्श्वभूमीवर झाडावरची उरली सुरली रंगीत पानं तग धरून वार्यावर फडफडत असतात. दाटी वाटीने उभ्या असलेल्या त्या रंगीबेरंगी झाडांमुळे टेकड्या म्हणजे जणू महाकाय Flower arrangements झालेल्या असतात.
बर्याचदा सस्कुहाना नदीच्या वरच्या अंगाने गाडी चालवताना नदी धुक्याच्या शालीत लपेटून गेलेली दिसते. नदीच्या अल्ल्याडची झाडं नि:शब्दपणे उभी असतात. पल्ल्याडचा काठ आणि त्यावरची झाडी धुक्यात धुसरशी दिसत असते. पल्ल्याडच्या काठावरच्या झाडांची स्वतंत्र आकृती नाहीशी झालेली असते, आणि एक लांबच लांब बाह्याकृती (silhouette) मात्र अंधुकशी दिसत असते.
ऑक्टोबर पासून सुरू झालेली थंडी नोव्हेंबर – डिसेंबर पर्यंत चांगलीच वाढलेली असते. सूचिपर्णी वृक्ष सोडले तर इतर झाडांवर पानांचं नामोनिशाण राहिलेलं नसतं. झाडांचे बुंधे, फांद्या, झुडपांच्या बारीक काटक्या, खालचं गवत, सगळं शुष्क होऊन गेलेलं असतं. हिरव्या रंगाचा एकछत्री अंमल संपुष्टात आलेला असतो. एखाद्या कार्यक्रमाचा grand finale मोठ्या झोकात करावा तसं ह्या फॉल सिझनमध्ये एक नेत्रदीपक रंगायतन साजरं करून पानं निपचित धुळीत पडलेली असतात. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती…’, याची वर्षामागून वर्ष प्रचिती येत रहाते. सगळीकडे करड्या, तपकिरी रंगाचं एकसुरी साम्राज्य पसरलेलं असतं. डोंगरांवर, टेकड्यांवर पर्णरहित झाडांची आणि हिरव्या सूचिपर्णी वृक्षांची सरमिसळ नजरेत भरत असते. ह्या पर्णरहित वृक्षांच्या पार्श्वभूमीवर, ते हिरवेगार सूचिपर्णी वृक्ष अधिकच उठून दिसत असतात. जणू एखाद्या युद्धभूमीवर, पराभूत नि:शस्त्र घायाळ सेनेमधून, दिमाखदार शिरस्त्राणे घातलेल्या विजयी सेनेच्या सैनिकांचा उत्साहाने वावर चालला असावा, तसं दृश्य दिसत असतं.
नाटकाचा हसता खेळता रंगीबेरंगी अंक आता संपलेला असतो. पुढचा हिवाळ्याचा अंक, एक लांबच लांब, एकसुरी, प्रौढ आणि गंभीर असणार असतो. तपकिरी करड्या पडद्याकडे बघत, संपलेल्या अंकाच्या सुखद आठवणी मनात घोळवत, पुढच्या अंकाची वाट बघत बसावं, तसा हा मधला काही आठवड्यांचा काळ असतो.
27 डिसेंबर 2009
मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिले; परंतु त्यातील बहुतेक निधी आधी सुरू झालेल्या योजनांची पुर्तता करण्यासाठीच आहे. नव्या योजना त्यात नाही, विशेषत: सिंचनाच्या बाबतीत हे पॅकेज कोरडेच आहे. सरकारने देण्याचा उत्साह दाखविला नाही आणि विरोधकांनी खेचून आणण्याचा प्रयत्न केला नाही.
प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच.
प्रत्येकाची एक कहाणी असते कोणाची दुःखाची, कोणाची यशाची, सुखाची, कर्तुत्वाची प्रेरणेची,कोणाची एकटेपणाची, कोणाची अपयशाची अशीच एक मीनाकुमारीची हळवी कहाणी मनाला चटका लावून जाणारी कहाणी आपल्याला अस्वस्थ करते. मीनाकुमारी ही एक हळवी, व्यथित पण अफाट प्रतिभेची अभिनेत्री होती.
कैरी पिकल्या त्यांचा आंबा झाला की त्याचे गुणधर्म पुर्ण बदलतात. आंबा हा चवीला गोड,थंड व वात व पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
पिकलेल्या आंब्याचे औषधी उपयोग आता आपण पाहूया:
१)रोज १ आंबा खाऊन त्यावर तासाभराने दुंध प्यायल्यास वजन वाढते व झोप ही चांगली लागते.
२)आंब्याचा रस बाळंतीण बाईला नियमीत प्यायला दिल्यास तिचे स्तन्य वाढते.
३)लघ्वीची तक्रार असल्यास जसे लघ्वी कमी होणे,जळजळ १ ग्लास आंबा रस+ १/४ ग्लास गाजराचा रस + १/४ चमचा सैंधव हे मिश्रण प्यावे.
४)आंब्याची ओली साल आंघोळी पुर्वी १/२ तास अंगावर चोळल्यास त्वचा नितळ व निरोगि होते.
५)आंब्याच्या कोईचे चुर्ण ताकातून प्यायल्यास जुलाब कमी होतात.
६)आंब्याच्या सोयीचे चुर्ण हिरड्यांना लावल्यास त्यातून येणारा रक्त स्त्राव,पू येणे कमी होते व हिरड्या मजबूत व्हायला मदत होते.
आंबे खायचा अतिरेक केल्यास पोटात खळखळून जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti