वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं
स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते |
स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖
जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे.
प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात.
मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख आल्यावर आचार्य श्रींची ती मूळ वेदांतनिष्ठा जागृत झाली.
त्याआधारे परब्रह्म स्वरूपात भगवान शंकरांचे वर्णन करताना ते म्हणतात,
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं - ज्याच्या पासून हा विचित्र प्रपंच निर्माण होतो. अर्थात खरेतर ज्याच्या अधिष्ठानावर या चित्रविचित्र पदार्थ आणि घटनांनी भरलेल्या प्रपंचाचा भास होतो,
स्थितिं याति - ज्याच्या अधिष्ठानावर या संसाराचे कार्य चालते, यस्मिन्यदेकांतमंते - शेवटी तो सर्व प्रपंच त्याच्यातच लय पावतो,
स कर्मादिहीनः - अशा त्या कर्मविहीन, अर्थात या सगळ्याचे अधिष्ठान असले तरी स्वतः कोणतेच कर्म न करणारे,
स्वयंज्योतिरात्मा - आत्म ज्योती स्वरूप असणारे, जे भगवान श्री शंकर तेच माझे मूळ वास्तव स्वरूप आहे.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे. मी शिव आहे. मी शिव आहे.
अर्थात या विश्वाची निर्मिती,स्थिती आणि लयाला कारणीभूत असणारे, खरेतर आधारभूत असणारे जे परम निर्गुण-निराकार स्वरूप तेच माझे मूळ रूप आहे. त्यात विलय पावणे, एकरूप होणे हे माझे ध्येय आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖
भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,
महादेव - हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
शंभो - हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: - हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् - आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.
हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖
भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,
महादेव - हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
शंभो - हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: - हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् - आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.
हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे .
अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
अमौलौशशांकादवामेकलत्राद-
हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖
एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
आचार्यश्री म्हणतात,
अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.
मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्ठेची घोषणा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
अमौलौशशांकादवामेकलत्राद-
हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖
एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
आचार्यश्री म्हणतात,
अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.
मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्ठेची घोषणा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार?
इंग्रज गेले पण कांही भंपक पध्दती सोडून गेले. कोशल्येने रामाचा वाढदिवस साजरा केल्याची कथा ना वाल्मिकींना सुचली ना गदिमांना सुचली. कॉंव्हेंटमधल्या मुलांना रामनवमी म्हणजे लॉर्ड रामाचा हॅपी बर्थडे येवढेच शिकवले जाते.
एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.
एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.
Copyright © 2025 | Marathisrushti