(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ५

    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥

    भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
    आचार्यश्री म्हणतात,
    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
    पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
    कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
    येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
    सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ५

    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥

    भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
    आचार्यश्री म्हणतात,
    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
    पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
    कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
    येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
    सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • यदृच्छता (Randomness)

    आज Randomness ही संकल्पना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरावी लागते आहे. संगणकाच्या मदतीने हे सोपे झाले आहे. आपल्याला याची अनेक उदाहरणं सापडतील. एखादी व्यक्ती अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडण्याची शक्यता फार कमी असते. तरी यंदा बिहार व उत्तर प्रदेशात वीज पडल्यामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. तशीच आणखी एक आश्चर्यकारक घटना आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया पार्कमध्ये काम करणारा रेंजर, रॉय सलिव्हन याच्या अंगावर 1942 ते 1977 या काळात वेगवेगळ्या प्रसंगी सात वेळा वीज पडली. तो प्रत्येक वेळेस वाचला व पुढे 71 व्या वर्षापर्यंत जगला. अशा असतात यदृच्छतेच्या करामती.

  • वनसंवर्धन दिन

    आज दिनांक २३ जुलै. आज वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. मंडळी नावातच हा दिन का साजरा केला जातो ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो. आपण नेहमी ऐकतो की निसर्ग आपला मित्र आहे. खरोखरच हे वाक्य अगदी सत्य आहे. अगदी जगद्गुरू संत तुकोबारायांनीही त्यांच्या अभंगात वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे असे सांगितलं आहे.

  • ज्ञात अज्ञात पंढरपूर २ – समस्त कलगीवाले थोरली तालिम

    पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे समस्त कलगीवाले थोरली तालिम हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा. पंढरीत गुणवंत मल्लाची खाण होती, आहे त्यांना घडविण्याचे कार्य या तालिमीने केले.

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ४

    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
    पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥

    बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
    कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
    मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
    आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
    पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
    रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
    वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
    त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
    प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
    भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ४

    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
    पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥

    बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
    कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
    मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
    आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
    पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
    रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
    वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
    त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
    प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
    भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ३

    प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
    धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
    शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥

    मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
    प्रौढोहं यौवनस्थौ - मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
    विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
    दष्टो - त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
    त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
    नष्टो विवेकः - त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः - मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
    शैवीचिन्ताविहीनं - भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
    मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
    हे सर्व माझे दोष आहेत.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
    मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ३

    प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
    धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
    शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥

    मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
    प्रौढोहं यौवनस्थौ - मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
    विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
    दष्टो - त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
    त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
    नष्टो विवेकः - त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः - मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
    शैवीचिन्ताविहीनं - भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
    मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
    हे सर्व माझे दोष आहेत.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
    मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • माणसाचे जमिनीवर असणे

    जीवनात चढ -उतार येतच असतात , सुखातल्या जीवाला संकटाची झळ बसते , तर दुखाने होरपळून गेलेल्याला सुखाची सुखद शीतल सावली मिळून जाते. अशा नित्य बदलत्या प्रसंगात माणसाची एक प्रकारे परीक्षाच होत असते.

    भल्या भल्या माणसांना अशा वेळी स्वतःला नियंत्रित ठेवणे जमू शकत नाही, म्हणूनच आपल्या सभोवतालची असलेली मित्र मंडळी अपेक्षा करीत असतात की- अशा बिकट प्रसंगी आपले जमिनीवर असणे खूप महत्वाचे असते.

    लहान असो व मोठा , गरीब असो वा श्रीमंत .प्रत्येकाला जीवनात नेहमीच यश आणि अपयश या दोन गोष्टींशी सामना करावा लागतो . अशा प्रसंगांना सामोरे जातांना ,एखाद्या संकटाशी सामना करतांना यश किंवा अपयश पदरात पडते मग यशाने दिलेली हुलकावणी आणि अपयश स्वीकारणे कठीण जात असते कारण अपयश " ही भावना कुणाच्याही मनास वेदना देणारी असते. यात भर म्हणजे "आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाचे खापर "नेहमी इतरांच्या माथी फोडणे " ,अपयशाचे दुखः उगाळीत बसणे" ,हा कित्येकांचा आवडता उद्योग असतो ."गम्मत म्हणजे ,अशी माणसे आपल्या सहवासात असतात , काहीच प्रयत्न न करता खूप काही मिळावे .! अशी इच्छा असणार्याला यश कसे मिळेल ? असे तुम्ही म्हणाल , पण अशा व्यक्तीला याचा सोयीस्करपणे विसर पडत असतो .अपयशाचे धनी होणे कुणालाच आवडत नसते

    यशाची धुंदी आणि विजयाची नशा माणसाला हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" ,याचा अर्थ आजकालच्या मिळणार्या प्रसिद्धीच्या झोताने कळून येतो आहे . लोकांच्या नजरेत भरण्यासाठी " टीव्ही आणि त्यावरील शो" अगदी सोपे आणि सहजसाध्य माध्यम झालेले आहे. प्रसिद्धीच्या झोतात येणे ", ग्लैमरच्या दुनियेत वावरण्यास मिळणे , चाहते मिळणे ,त्यांचे प्रेम मिळणे "

    स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी अचानक वाट्यास येतात आणि "पतंग आकाशात उंच उंच भिरभीरु लागतो ", माणसाचे पाय जमिनीवर नसतात " याचे उदाहरण पहावयास मिळते .नेमक्या अश्या वेळी "जो भानावर राहून जमिनीवर राहू शकतो " त्याला या "वैभवाचा मोह" दूर दूर सारणे जमून जाते , या उलट अनेकांचे होते .यशाची धुंदी ,यशाचे वारे अंगात भिनले की .आपल्या माणसापासून दूर दूर जात आहोत "याचे भान रहात नाही ,आणि हे जग तर उगवत्या सूर्यास नमस्कार करणारे आहे" , मावळतीचे दिवस कठोर जाणीव देतात आणि आकाशात विहरणारा -एक दिवस पुन्हा त्याच जमिनीवर येऊन आदळतो .फार कठीण असते हे सारे .जो तरला -तो यातून सहीसलामत सुटला "असे म्हणूया .

    श्रीमंती आणि गरिबी या दोन अवस्था दुरावा निर्माण करणाऱ्या आहेत .जो श्रीमंत असतो..त्याला आपल्या वैभवाचा आणि श्रीमंत असण्याचा गर्व ,वृथाअभिमान असेल तर काय उपयोग त्याच्या श्रीमंतीचा ? कारण आपल्या भोवती अशी खूप श्रीमंत माणसे असतात की जी कधीच -गरीब-श्रीमंत असा भेद न करता सगळ्यांशी मिळूनमिसळून वागतात ,त्यांच्या माणुसकीच्या व्यवहारात "पैशांची भाषा "कधी बोलली जात नाही ,अशा माणसांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात "असे लोक म्हणतात .हा त्या श्रीमंत व्यक्तीचा गौरवच असतो.

    काही व्यक्ती अशाही असतात की ज्यांच्यासाठी त्यांचे सर्वस्व फक्त पैसा "असतो, जगातील सगळ्या गोष्टी पैश्याने विकत घेता येतात "अस त्यांचा पक्का विस्वास असतो .याच गुर्मीत ते जगत असतात ,पण दुर्दैवाने यांचे दिवस बदलून गेले की मग मात्र "जमिनीवर पाय असते तर ? याची जाणीव होऊ लागते ,पण आता खूप उशीर झालेला असतो.

    सारासार बुद्धीची देणगी मिळालेली असतांना "विचारशक्ती गमावून बसणार्यांना समजावून सांगणारे भेटले पाहिजे. आणि अशा अनुभवी माणसांनी सांगितले पाहिजे की "

    बाबा रे ,जमिनीवर रहात जा " यातच तुझे भले आहे.

    -- अरुण वि.देशपांडे -पुणे.
    मो- ९८५०१७७३४२ .
    ई-साप्ताहिक - जनमंगल.
    दि.१२-७-२०२० अंकात पूर्वप्रकाशित लेख