वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मी लिहिलेल्या आठ संगीत नाटकांपैकी तीन नाटकांचे त्रिदल हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . आज त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे . संगीत घन अमृताचा ,संगीत शांतिब्रह्म , संगीत राधामानस या तीन संगीत नाटकांचे , खल्वायन संस्थेने प्रकाशित केलेले माझे पुस्तक म्हणजे त्रिदल
May 23, 2025
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!!
December 27, 2018
हॉस्पिटलमधुन थेट मैदानावर जाऊन फलन्दाजी कर्णारा इंग्लन्डचा एडी पेन्टर
February 13, 2011
सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर आले आणि त्यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते, ” मी मा्फी मागितली नाहि. फक्त खेद व्यक्त केला. शिवसैनिक किंवा आम्ही माफी मागित नसतो. माफी आणि खेद यातिल फरक समजावुन घेतला पाहिजे. “
आम्ही ही बातमी बघितली आणि विचारात पडलो. अरे खरोखरच की ! माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक आपल्यालाही माहित नाहि. तसे आम्ही स्वतःला मराठीच समजतो. आम्ही मराठी घरात जन्मलो. आमच्याआधी आमच्या किमान दहा पिढ्या मराठी. मराठवाड्यात बालपण आजुबाजुला इतर भाषांचा संबंध नाही . इथुनतिथुन सर्व मराठीच. त्यात आमचे दहावीपर्यंत पुर्ण शिक्शण मराठी शाळेत झाले. त्यानंतर मात्र बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातुन आणि वैद्यकिय शिक्शण ( मनसेचा जन्मच तोपर्यंत झाला नसल्याने ) नाइलाजाने इंग्रजी माध्यमातुन झाले. या गोष्टीमुळे ” आम्ही पक्के मराठी ” असा आम्हाला आत्मविश्वास होता , तो मात्र ढासळायला सुरुवात झाली, आणि आम्ही ” माफी मागणे आणि खेद वाटणे “ यातील फरक शोधायच्या मागे लागलो.
बराच विचार केल्यावर आम्हाला एक आयडीया सुचली. महाराष्टातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत , आपले प्रश्न ते बरोबर सोडवतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राजकारण्यांकडेच सापडेल असा आम्हाला लगेच विश्वास बसला आणि राजकारण्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवले. मराठीचा विषय आल्याबरोबर राजसाहेबांचे नाव लगेच आठवले आणि त्याना भेटण्यासाठी आम्ही आमचे मनसेचे नगरसेवक गंपुशेटना भेटलो. त्यांनी जे सांगितले ते ऐकुन आमची पाचावर धारण बसली. त्यांच्यामते राजसाहेबांशी बोलताना मराठीचा वापर अनिवार्य आहे. कारण राजसाहेबांकडे चाबुक आहे , आणि आपण बोललेल्या वाक्यातील प्रत्येक अमराठी शब्दासोबत तो ते चालवतात. आता आम्ही मराठीवादी असलो तरी आमच्या बोलण्यात काही अमराठी शब्द येतात. उगीचच राजसाहेब आपल्याला विचारायाचे ” कसे आलात ? ” , आपण सांगायचो , ” रेल्वेने आलो . “ आणि “ रेल्वेने ” हा शब्द उच्चरताच सप्पकन चाबकाचा आवाज यायचा , या कल्पनेनीच आम्ही राजसाहेबांना भेटायचा विचार सोडुन दिला.
महाराष्ट्रातील दुसरे अत्यंत हुशार राजकारणी म्हणजे शरदरावजी. आपले क्रुषिमंत्री . राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याने आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत असल्याने मराठी भाषेशी संबंधित आपला प्रश्न ते सहज सोडवु शकतील असा आम्हाला विश्वास वाटला आणि लगेचच आम्ही त्यांची भेट घेतली , आणि आमची शंका विचारली.
“ शरदरावजी , खेद वाटणे आणि माफी मागणे यात नेमका फरक काय हो ? “ शरदरावजी लगेच उत्तरले , ” बाळा , डाळींचे भाव तुला माहित आहेत काय ? साखर काय भाव आहे ? भाज्या काय भाव आहेत ? ” आम्ही सांगितले , “ नाही. कारण किराणा बायकोच आणते. आम्ही फक्त पिशव्या उचलतो. पण हल्ली ती फारच कटकट करायला लागली आहे. महिन्याला पैसे पुरत नाही म्हणते. “ शरदराव म्हणाले, “ मी कारण सांगु ? कारण डाळ शंभर रुपये किलो झाली आहे. साखर चाळिस रुपये आणि भाजी दहा रुपये पाव . मिळते . “ मी विचारले , ” पण माझ्या प्रश्नाचा आणि या उत्तराचा काय संबंध ? मला माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक हवा आहे. “ शरदराव उत्तरले , “ सांगतो. संबंध सांगतो. एवढी महागाई वाढली असताना , घरी पैसे पुरत नसताना , प्रत्येकाला दिवसा नोकरी झाल्यावर रात्री पार्टटाइम नोकरी करणे घर चालवण्यासाठी आवश्यक आहे. ती नोकरी शोधायचे सोडुन तुम्ही अशा फालतु प्रश्नात आपला वेळ फुकट का घालवता , हेच मला कळत नाही. आज प्रत्येक भारतीयाची ही गरज आहे . ”
आमचे डोळे खाडकन उघडले. असल्या फालतु प्रश्नाच्या नादी लागायला आमच्यासारख्या सामान्य माणसांना वेळ नाही. संसारपण चालला पाहिजे. पार्टटाइम नोकरी शोधायच्या आम्ही मागे लागलो. एक गोष्ट मात्र पटली , की महाराष्ट्रातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत. आपले प्रश्न ते बरोबर सोडवितात.
--निखील मुदगलकर
February 15, 2010
लहान मुले हे नेहमीच मोठ्यांना फॉलो करतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि तासंतास मोबाईलचा वापर ही सध्या लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. म्हणून आज मी ह्या सगळ्यावर कशाप्रकारे मात करता येईल ह्यासंबंधी काही टिप्स येथे देणार आहे.
March 23, 2019
मनुष्याला जन्मताच ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रिया मिळाली. त्या द्वारे तो पाच तत्वानी बनलेल्या अनेक वस्तु, पदार्थ,.. ह्यांचा आनंद घेत असतो. पण मानवाला बाह्य सुखांची अशी सवय लागली आहे की आज ह्या सुखांच्या पाठीच त्याची धाव आहे. मृगतृष्णा समान जीवन झाले आहे. पाहणे, ऐकणे, खाणे, गंध आणि स्पर्श एक एक इंद्रियानी जितके आणि जसे सुख घेता येईल तसे मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु बाह्य सुखापेक्षा आंतरिक सुख किती मूल्यवान आहे ह्याची जाण आजच्या मनुष्याला नाही. म्हणून म्हटले आहे ‘अंतर्मुखी सदा सुखी.’
अंतर्मुखी अर्थात चेहऱ्यावर (मुखावर) ज्या इंद्रिया आहेत नाक, कान, डोळे, मुख हे अंतरविश्वा मध्ये जितके रमण करतील तितके ते सुखी राहतील. डोळे सतत बाह्य विश्वातल्या व्यक्ति, वस्तु, पदार्थ.. ह्यांना बघण्यात व्यस्त आहे. जे आपण बघतो त्याचा प्रभाव आपल्या मनावर होतो. अजाणतेपणे एखादी व्यक्ति, वस्तु आपण बघितली तर ती स्वप्नामध्ये येऊन जाते तेव्हा जाणीव होते की त्याची मनावर छाप पडली आहे. सांगण्याचा भाव हा की डोळ्या द्वारे अनेक चांगल्या-वाईट गोष्टी मनामध्ये उतरतात. म्हणून सूरदास ने आपले डोळेच फोडले. बघितलेच नाही तर वाईट विचार येणार नाहीत हा त्यापाठीमागचा भाव होता. पण टेक ह्या डोळ्याचे कार्य काही वेळासाठी थांबवून पूर्ण लक्ष आपल्या अंतरविश्वाला बघण्यासाठी दिला तर नक्कीच झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मार्ग व शक्ति मिळेल.
आपले कां हे तर सतत काही ना काही ऐकण्याचा आनंद घेत असतात. जगभरच्या बातम्या, आजूबाजूच्या पंचायती.. ह्यांचा रस तर काही वेगळंच. वर्तमानात अशी अनेक साधने ही उपलब्ध झाली आहेत जी आपल्याला बघण्या व ऐकण्याची सामग्री पुरवत राहतात. आजचा मानव त्याच्यात किती व्यस्त झाला आहे. जे कामाचे आहे ते ऐकण्यापेक्षा वायफळ गोष्टी ऐकण्याचा आनंद घेत आहे. पण ह्या सर्व गोष्टी अंतर्मनावर किती दुष्परिणाम करत आहेत ह्याची जाणीव मनुष्याला नाही. हेच जर स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी काढला तर किती बर होईल?
‘वाचलता लाभम नाशम’ म्हटले आहे. जितके हे मुख वाचाळ होईल तितका नाश अर्थात स्वतःचे नुकणस होईल. मनुष्य बोलल्याशिवाय राहू शकत नाही. कधीतरी स्वतःला चेक करून पहा की न बोलता आपण किती तास राहू शकतो. ‘मौन’ चा अभ्यास किती करू शकतो. कधी कधी एखाद्यावर रागावलो की बोलणं सोडून देतो, ती वेगळी गोष्ट. पण जितके मुख बंद तितके मन आपले काम चालू करते. जे मुखाने बोलायचे आहे ते संकल्पा द्वारे बोलायला सुरुवात होते. पण तेच मन आणि मुख शांतीचा अनुभव करत असेल तर तितकेच आपण सुखी होऊ.
डोळे, कान आणि मुख ह्यांचा वापर बाह्य जगासाठी न करता अंतरजगावर लक्ष केंद्रित केले तर व्यक्ति, वस्तु, पदार्थाच्या पाठीमागे धावणे बंद होऊन आंतरिक सुख शांतीचा अनुभव करण्यात मन रंगेल. व तितकीच आत्म्याची शक्ति ही वाढेल. हर्तमद्धे अनेक योगी होऊन गेले. त्यांची धाव अंतर जगाकडे होती म्हणून कधीच बाहेरच्या सुखावर त्याची नजर नव्हती. तसेच जीवनाची अनेक गुपिते त्यांनी जाणली, अनुभवली म्हणून निर्भय जीवन जगू शकले. आजचा मनुष्य सतत भयभीत होतो की जे मी कमावले ते माझ्यापासून कोणी हिसकावून तर नाही ना घेणार? पण जे मिळवले ते नष्ट तर होणारच आहे हा नियम आहे. तरीही चुकीच्या मार्गावर धाव का?
आज कोरोंनाच्या महामारितून आपल्याला खूप काही शिकायचे आहे. जे डोळ्यासमोर घडतंय त्या सत्याचा स्वीकार करायचंय. मृत्यू अटळ आहे. परिस्थिती चा परिणाम निश्चित आहेत. जर स्वतःला आंतरिक शक्तींनी संपन्न केले असेल तर वाईट परिस्थिती मध्ये ही सुखी समाधानी शांत असल्याचा अनुभव करू शकू. म्हणून ह्या कर्मेंद्रियानी बाह्य जगाला बघा पण अंतर जगामध्ये त्याची छाप काय पडते त्याचे ही परीक्षण करा. जे चांगले आहे तेच आत्मसात करायचे आहे ही विचारांची गाळणी सतत वापरा. अनावश्यक बाबींना फेकून देण्याची सवय लावा. तरच ह्या मनुष्य जीवनाचा आनंद घेऊ शकू.
-- ब्रह्माकुमारी नीता.
December 15, 2021
काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे, त्याला राजकीय परिपक्वतेची खुप मोठी पार्श्वभूमि आहे परंतू या पक्षाला काही कालावधीचा अपवाद वगळला तर सक्षम प्रतिस्पर्धी कोणीही भेटला नाही. त्यामुळे या पक्षाची वैचारीक पातळी सातत्याने हेलकावत राहिली व म्हणूनच हा पक्ष नेहमीच टिकेचे लक्ष्य तर बनलाच परंतू त्यातील वैचारिक दिवाळखोरीही चव्हाट्यावर येवू लागली परिणामी लोकांच्या विश्वासाला नेहमीच तडा गेला हे कटू सत्य.
-- अतुल तांदळीकर
December 11, 2010
गेल्याच महिन्यात, १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा झाला. त्या दिवशी फेसबुकवर कृपा देशपांडे यांचा ‘टिम टिम करते तारे’ हा लेख वाचनात आला. त्या लेखात त्यांनी डेजी इराणी, हनी इराणी, सचिन, मास्टर महेश, बेबी तबस्सुम, बेबी फरिदा, बेबी नाझ, मास्टर राजू व ज्युनियर मेहमूद अशा हिंदी चित्रपटातील बाल कलाकारांबद्दल लिहिलेलं आहे.
December 6, 2023
भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन. १८ दिशा विचार मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत.
February 18, 2018
बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।
बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.
मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.
विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.
श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.
एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.
आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.
हारावलीव हरिनीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.
कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti