(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – २

    बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा
    नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
    नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥

    पूर्वजन्मीच्या कर्मांच्या फलवशात गर्भवास प्राप्त झाला. आरंभीच्या श्लोकात त्याचे वर्णन केल्यानंतर आचार्यश्री पुढे म्हणतात की जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील ही दुःख परंपरा सुटली नाही.
    शैशवावस्थेतील दुःखांचा विचार मांडताना आचार्यश्री म्हणतात,

    बाल्ये दुःखातिरेको - बालपणात मला अनेक दुःखदायक गोष्टींचा सामना करावा लागला. मललुलितवपुः- माझे शरीर मलाने व्याप्त होते. स्वतःचे मलमूत्र देखील स्वच्छ करता येत नव्हते. मी त्यातच लोळत होतो. आजूबाजूला इतर घाण असली तरी त्यातच लोळावे लागत होते. सरकण्याची देखील क्षमता नव्हती.
    स्तन्यपाने पिपासा - सातत्याने स्तनपानाची तृष्णा जागृत होत होती. अर्थात तहान भुकेच्या वेदना त्रस्त करीत होत्या.
    नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो- शरीराच्या अवयवांची मध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नव्हती. सर्वच बाबतीत पराधीनतेचे दुःख होते. भवगुणजनिता
    जन्तवो मां तुदन्ति -
    या संसारात जन्माला येणारे विविध जीव-जंतू मला तोडत होते. डास मुंग्या चावत होत्या. त्यांना हाकलण्याचीदेखील ताकद नव्हती.
    नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः - नानाविध रोगांनी आणि दुःखांनी परवश झालेला मी केवळ रडत होतो.
    शड्करं ना स्मरामि- हे भगवान शंकराच्या वेळी मला आपले स्मरण देखील करता येत नव्हते.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या अपराधांना क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – २

    बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा
    नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
    नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥

    पूर्वजन्मीच्या कर्मांच्या फलवशात गर्भवास प्राप्त झाला. आरंभीच्या श्लोकात त्याचे वर्णन केल्यानंतर आचार्यश्री पुढे म्हणतात की जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील ही दुःख परंपरा सुटली नाही.
    शैशवावस्थेतील दुःखांचा विचार मांडताना आचार्यश्री म्हणतात,

    बाल्ये दुःखातिरेको - बालपणात मला अनेक दुःखदायक गोष्टींचा सामना करावा लागला. मललुलितवपुः- माझे शरीर मलाने व्याप्त होते. स्वतःचे मलमूत्र देखील स्वच्छ करता येत नव्हते. मी त्यातच लोळत होतो. आजूबाजूला इतर घाण असली तरी त्यातच लोळावे लागत होते. सरकण्याची देखील क्षमता नव्हती.
    स्तन्यपाने पिपासा - सातत्याने स्तनपानाची तृष्णा जागृत होत होती. अर्थात तहान भुकेच्या वेदना त्रस्त करीत होत्या.
    नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो- शरीराच्या अवयवांची मध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नव्हती. सर्वच बाबतीत पराधीनतेचे दुःख होते. भवगुणजनिता
    जन्तवो मां तुदन्ति -
    या संसारात जन्माला येणारे विविध जीव-जंतू मला तोडत होते. डास मुंग्या चावत होत्या. त्यांना हाकलण्याचीदेखील ताकद नव्हती.
    नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः - नानाविध रोगांनी आणि दुःखांनी परवश झालेला मी केवळ रडत होतो.
    शड्करं ना स्मरामि- हे भगवान शंकराच्या वेळी मला आपले स्मरण देखील करता येत नव्हते.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या अपराधांना क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • भारतीय शब्दकोषातील पंचांगे

    पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन…..

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४०

    भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
    भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
    नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
    सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖

    या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
    भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
    अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
    शंभो - हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
    मयैवं - मी अशा प्रकारे
    भुजंगप्रयातेन वृत्तेन - भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
    क्लृप्तम् - आपले स्तवन रचलेली आहे.
    नरः - जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् - या स्तोत्र रचनेला,
    पठित्वोरुभक्त्या - दृढ भक्तीने पठन करील,
    सुपुत्र - सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
    आयु: - प्रदीर्घ आयुष्य,
    आरोग्यम् - निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
    ऐश्वर्यम् - विविध प्रकारचे ऐश्वर्य.
    एति - प्राप्त करेल.
    या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
    अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
    त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.

    जय भोलेनाथ !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४०

    भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
    भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
    नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
    सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖

    या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
    भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
    अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
    शंभो - हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
    मयैवं - मी अशा प्रकारे
    भुजंगप्रयातेन वृत्तेन - भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
    क्लृप्तम् - आपले स्तवन रचलेली आहे.
    नरः - जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् - या स्तोत्र रचनेला,
    पठित्वोरुभक्त्या - दृढ भक्तीने पठन करील,
    सुपुत्र - सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
    आयु: - प्रदीर्घ आयुष्य,
    आरोग्यम् - निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
    ऐश्वर्यम् - विविध प्रकारचे ऐश्वर्य.
    एति - प्राप्त करेल.
    या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
    अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
    त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.

    जय भोलेनाथ !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३९

    अनेन स्तवेनादरादंबिकेशं
    परां भक्तिमासाद्य यं ये नमंति |
    मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते
    हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖

    आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत.
    आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात,

    अनेन स्तवेनादरादंबिकेशं - या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक भगवान श्री अंबिकेशांचे स्तवन करतात,

    परां भक्तिमासाद्य यं ये नमंति - परम भक्तीने युक्त होऊन जे त्यांना नमस्कार करतात.
    अर्थात स्तोत्राचे पठन हे आदरपूर्वक आणि भक्तिपूर्वक असावे हे आचार्य श्री अधोरेखित करीत आहेत. तो केवळ उपचार नसावा किंवा स्वार्थ नसावा हे त्यात गृहीत आहे.
    अशा सांगितलेल्या मार्गाने या स्तोत्राचे पाठ करतात त्यांना मिळणारी दोन अद्वितीय लाभ सांगतांना आचार्य म्हणतात,
    मृतौ निर्भयास्ते- ते निर्भयपणे मृत्यूला सामोरे जातात. जनास्तं भजंते- लोक त्यांची उपासना करतात.
    यात त्याच्या स्वतःच्या जीवनाचे कल्याण होते हे त्याच्या निर्भय मृत्यूतून वर्णन केले. सोबतच तो इतरांच्या जीवनाचे कल्याण करतो. त्यांनाही शिव मार्गाला लावतो हे दुसऱ्या उल्लेखात आचार्य स्पष्ट करीत आहेत.
    यासाठी जीवनाचे साफल्य कशात आहे? हे सांगताना आचार्य म्हणतात,
    हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् - सदैव आपल्या हृदयकमळात निवास करणाऱ्या भगवान शंकरांचे स्मरण करावे.
    तोच आपल्या परम कल्याणाचा मार्ग आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३९

    अनेन स्तवेनादरादंबिकेशं
    परां भक्तिमासाद्य यं ये नमंति |
    मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते
    हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖

    आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत.
    आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात,

    अनेन स्तवेनादरादंबिकेशं - या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक भगवान श्री अंबिकेशांचे स्तवन करतात,

    परां भक्तिमासाद्य यं ये नमंति - परम भक्तीने युक्त होऊन जे त्यांना नमस्कार करतात.
    अर्थात स्तोत्राचे पठन हे आदरपूर्वक आणि भक्तिपूर्वक असावे हे आचार्य श्री अधोरेखित करीत आहेत. तो केवळ उपचार नसावा किंवा स्वार्थ नसावा हे त्यात गृहीत आहे.
    अशा सांगितलेल्या मार्गाने या स्तोत्राचे पाठ करतात त्यांना मिळणारी दोन अद्वितीय लाभ सांगतांना आचार्य म्हणतात,
    मृतौ निर्भयास्ते- ते निर्भयपणे मृत्यूला सामोरे जातात. जनास्तं भजंते- लोक त्यांची उपासना करतात.
    यात त्याच्या स्वतःच्या जीवनाचे कल्याण होते हे त्याच्या निर्भय मृत्यूतून वर्णन केले. सोबतच तो इतरांच्या जीवनाचे कल्याण करतो. त्यांनाही शिव मार्गाला लावतो हे दुसऱ्या उल्लेखात आचार्य स्पष्ट करीत आहेत.
    यासाठी जीवनाचे साफल्य कशात आहे? हे सांगताना आचार्य म्हणतात,
    हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् - सदैव आपल्या हृदयकमळात निवास करणाऱ्या भगवान शंकरांचे स्मरण करावे.
    तोच आपल्या परम कल्याणाचा मार्ग आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३८

    किरीटे निशेशो ललाटे हुताशो
    भुजे भोगिराजो गले कालिमा च |
    तनौ कामिनी यस्य तत्तुल्यदेवं
    न जाने न जाने न जाने न जाने ‖ ३८ ‖

    विवेचनाच्या ओघात शिवोऽहम् ही आत्म स्वरूपाची जाणीव झाली आणि क्षणात समाधिस्थ झालेले आचार्य त्या अनुभूतीचे वर्णन करून गेले.
    प्रारब्धवशात पुनश्च देह भानावर आले. जसा झोपेतून उठलेला माणूस झोपण्यापूर्वीच्या विचारांना पुन्हा प्राप्त होतो तसे आचार्यश्री पुन्हा स्तोत्रातील सुरू असलेल्या विषयावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन श्लोका पूर्वीची रचना पहावयास मिळते.

    पुनरुक्ती चे हे कारण पाहिले म्हणजे हे वर्णन योग्य वाटते. आचार्यश्री म्हणतात,

    किरीटे निशेशो - ज्यांनी मस्तकावर निशेचा म्हणजे रात्रीचा ईश म्हणजे स्वामी असणारा चंद्र धारण केलेला आहे,
    मस्तकावर चंद्र असणे हे मस्तकाच्या अर्थात विचारांच्या उज्ज्वलतेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे. भगवान भालचंद्र शंकर या स्वरूपातील आहेत.

    ललाटे हुताशो- ज्यांच्या कपाळावर असणाऱ्या तृतीय नेत्रामध्ये विश्व विनाशकारी अग्नी विराजित आहे,
    भुजे भोगिराजो - ज्यांच्या हातावर वासुकी तक्षक इत्यादी सर्प रुळत आहेत,
    गले कालिमा च - ज्यांच्या कंठात हलाहल विष धारण केले असल्याने ज्यांचा गळा काळा पडलेला आहे.
    दुसरा सुंदरतम अर्थ म्हणजे ज्यांच्या कंठातून कायम राम नामाचा उच्चार निघतो त्या रामाच्या घनश्याम अशा रंगाचा ज्यांचा गळा झालेला आहे,
    तनौ कामिनी यस्य - ज्यांच्या अंगावर म्हणजे मांडीवर देवी पार्वती विराजमान आहे,
    तत्तुल्यदेवं - त्यांच्यासारखा अन्य कोणीही देव,
    न जाने न जाने न जाने न जाने - मी जाणत नाही. मी जाणत नाही. मी जाणत नाही .मी जाणत नाही.

    शेवटी चार वेळा सांगणे याचा अर्थ अगदी ठासून सांगणे असा आहे. यात कोणतीच शंका नाही असे निर्विवाद कथन आहे.

    उपासना करतांना आपली उपास्य दैवत हेच परमश्रेष्ठ तत्व आहे ही साधकाची भूमिका अनिवार्य असते. त्या भूमिकेला सुदृढ करण्यासाठी आचार्यांचे हे वर्णन आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३८

    किरीटे निशेशो ललाटे हुताशो
    भुजे भोगिराजो गले कालिमा च |
    तनौ कामिनी यस्य तत्तुल्यदेवं
    न जाने न जाने न जाने न जाने ‖ ३८ ‖

    विवेचनाच्या ओघात शिवोऽहम् ही आत्म स्वरूपाची जाणीव झाली आणि क्षणात समाधिस्थ झालेले आचार्य त्या अनुभूतीचे वर्णन करून गेले.
    प्रारब्धवशात पुनश्च देह भानावर आले. जसा झोपेतून उठलेला माणूस झोपण्यापूर्वीच्या विचारांना पुन्हा प्राप्त होतो तसे आचार्यश्री पुन्हा स्तोत्रातील सुरू असलेल्या विषयावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन श्लोका पूर्वीची रचना पहावयास मिळते.

    पुनरुक्ती चे हे कारण पाहिले म्हणजे हे वर्णन योग्य वाटते. आचार्यश्री म्हणतात,

    किरीटे निशेशो - ज्यांनी मस्तकावर निशेचा म्हणजे रात्रीचा ईश म्हणजे स्वामी असणारा चंद्र धारण केलेला आहे,
    मस्तकावर चंद्र असणे हे मस्तकाच्या अर्थात विचारांच्या उज्ज्वलतेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे. भगवान भालचंद्र शंकर या स्वरूपातील आहेत.

    ललाटे हुताशो- ज्यांच्या कपाळावर असणाऱ्या तृतीय नेत्रामध्ये विश्व विनाशकारी अग्नी विराजित आहे,
    भुजे भोगिराजो - ज्यांच्या हातावर वासुकी तक्षक इत्यादी सर्प रुळत आहेत,
    गले कालिमा च - ज्यांच्या कंठात हलाहल विष धारण केले असल्याने ज्यांचा गळा काळा पडलेला आहे.
    दुसरा सुंदरतम अर्थ म्हणजे ज्यांच्या कंठातून कायम राम नामाचा उच्चार निघतो त्या रामाच्या घनश्याम अशा रंगाचा ज्यांचा गळा झालेला आहे,
    तनौ कामिनी यस्य - ज्यांच्या अंगावर म्हणजे मांडीवर देवी पार्वती विराजमान आहे,
    तत्तुल्यदेवं - त्यांच्यासारखा अन्य कोणीही देव,
    न जाने न जाने न जाने न जाने - मी जाणत नाही. मी जाणत नाही. मी जाणत नाही .मी जाणत नाही.

    शेवटी चार वेळा सांगणे याचा अर्थ अगदी ठासून सांगणे असा आहे. यात कोणतीच शंका नाही असे निर्विवाद कथन आहे.

    उपासना करतांना आपली उपास्य दैवत हेच परमश्रेष्ठ तत्व आहे ही साधकाची भूमिका अनिवार्य असते. त्या भूमिकेला सुदृढ करण्यासाठी आचार्यांचे हे वर्णन आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३७

    यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं
    स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते |
    स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा
    शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖

    जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे.
    प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात.

    मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख आल्यावर आचार्य श्रींची ती मूळ वेदांतनिष्ठा जागृत झाली.
    त्याआधारे परब्रह्म स्वरूपात भगवान शंकरांचे वर्णन करताना ते म्हणतात,

    यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं - ज्याच्या पासून हा विचित्र प्रपंच निर्माण होतो. अर्थात खरेतर ज्याच्या अधिष्ठानावर या चित्रविचित्र पदार्थ आणि घटनांनी भरलेल्या प्रपंचाचा भास होतो,
    स्थितिं याति - ज्याच्या अधिष्ठानावर या संसाराचे कार्य चालते, यस्मिन्यदेकांतमंते - शेवटी तो सर्व प्रपंच त्याच्यातच लय पावतो,
    स कर्मादिहीनः - अशा त्या कर्मविहीन, अर्थात या सगळ्याचे अधिष्ठान असले तरी स्वतः कोणतेच कर्म न करणारे,
    स्वयंज्योतिरात्मा - आत्म ज्योती स्वरूप असणारे, जे भगवान श्री शंकर तेच माझे मूळ वास्तव स्वरूप आहे.
    शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे. मी शिव आहे. मी शिव आहे.

    अर्थात या विश्वाची निर्मिती,स्थिती आणि लयाला कारणीभूत असणारे, खरेतर आधारभूत असणारे जे परम निर्गुण-निराकार स्वरूप तेच माझे मूळ रूप आहे. त्यात विलय पावणे, एकरूप होणे हे माझे ध्येय आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड