वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रथम आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया.
एनर्जी ड्रिंकची व्याख्या करता येत नाही पण कोणतेही नॉन अल्कोहोलीक ड्रिंक, ज्या मधे कॅफिन, टॉरिन (एक अमिनो असिड) आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात, शारीरिक व मानसिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ही ड्रिंक्स मदत करतात अशा प्रकारे ह्यांचे मार्केटिंग केले जाते. उत्तेजनवर्धक म्हणून कॅफिन चा वापर बहुतेक ड्रिंक मध्ये केला जातो पण काही ड्रिंक्स मध्ये guarana आणि जिनसिंग चा वापर केला जातो.
कॅफिन हे बर्याच खाद्य पदार्थात आढळते तसेच ते सॉफ्ट ड्रिंक व एनर्जी ड्रिंक मध्ये ही आढळते. Substance Abuse and Mental Health Services Administration (SAMHSA) ह्यांच्या मते एनर्जी ड्रिंक च्या एका बाटलीत किंवा एका कॅनमध्ये ८० मिलीग्राम पासून ते ५०० मिलीग्राम पेक्षा जास्त कॅफिन असू शकते.
एक कॅन कोला ड्रिंक मध्ये साधारणतः १० चहाचे चमचे साखर असते. वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनच्या शिफारशी प्रमाणे दृश्य स्वरूपात दिवसाला फक्त ६ चहाचे चमचे साखर घेणेच योग्य आहे म्हणजेच फक्त एक कॅन कोला घेतल्यास शिफारशी पेक्षा कितीतरी जास्त साखर आपल्या पोटात जाते.
साखर युक्त ड्रिंक घेतल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जवळजवळ सगळ्यांच माहीत आहे. Harvard School of Public Health ह्यांच्यानुसार साखरयुक्त ड्रिंक चे १ ते २ कॅन चे सेवन दररोज केल्यास २६% लोकांमध्ये डायबेटिस होण्याची शक्यता बळावते आणि प्रतिवर्षी १८४,००० मृत्यू हे साखरयुक्त ड्रिंक घेतल्याने होतात असेही निदर्शनास आले आहे.
हेल्थ विषयीचे लिखाण करणार्या Wade Meredith ह्यांच्या संशोधनावर आधारित ब्रिटिश फारमसीस्ट निरज नाईक ह्यांनी एक infographic तयार केले आहे. यामध्ये त्यांनी ३३० मिलीलीटरचा एक कोकाकोलाचा कॅन घेतल्यावर १ तासात शरीरावर काय काय परिणाम होतो हे दाखवले आहे.
पहिल्या १० मिनीटातच : १० चमचे साखर शरीर प्रणाली (system) मध्ये जाते. याचाच अर्थ १००% शिफारशी पेक्षा जास्त साखर घेतली जाते, तरीही इतकी जास्त साखर जाऊनही लगेचच आपल्याला उलटी होत नाही कारण त्यात असलेल्या फॉस्फरिक अॅसिड मुळे. फॉस्फरस मुळे त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर कमी होतो त्यामुळेच एकदा ओठाला लावल्यावर बरेचदा आपण तो संपेपर्यंत खाली ठेवत नाही.
२० मिनीटे : रक्तातील साखरेमध्ये स्पाईक येतो (अचानक साखरेची पातळी वाढते) त्यामुळे इनसुलीनचा उद्रेक होतो. ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लिव्हर रक्तातील वाढलेल्या साखरेचे फॅट मध्ये रुपांतरीत करते.
४० मिनीटे : आत्तापर्यंत ड्रिंक मधील पूर्ण कॅफिन शरिरात शोषले जाते आणि त्यामुळे डोळ्यातील बाहूली (pupils) विस्फारित (डायलेट) होते, ब्लडप्रेशर वाढते. ह्यामुळे लिव्हर रक्तात जास्त साखर टाकते. ह्या वेळेस ब्रेन मधील adinosine receptors ब्लॉक झालेले असल्याने आपल्याला थकवा / ड्राऊझिनेस जाणवत नाही
६० मिनिटे: ड्रिंक मध्ये असलेले फॉस्फरिक अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक जे इनटेनस्टाईनच्या खालील भागात असते त्या बरोबर मिसळले जाते, मेटॅबोलिझम मध्ये आणखी वाढ होते. वाढलेली साखर व वाढलेले मेटॅबोलिझम ह्यामुळे शरीरातील कॅल्शियम लघवी वाटे बाहेर टाकले जाते.
६० मिनिटांनंतर : रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायला सुरवात होते ज्यामुळे तुमची चिडचिड वाढते, तुम्हाला चैतन्यहिन वाटू लागते. ह्या वेळेस डायुरेटीक इफेक्ट आमलात येऊ लागतो. Bladder भरले असल्याने तुम्हाला लघवी करावी लागते. ह्याच लघवी वाटे फॉस्फरस बरोबर बांधले गेलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक - जे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते - बाहेर टाकले जाते, . याचबरोबर सोडियम, इलेकट्रोलाईट सुद्धा शरिराच्या बाहेर टाकले जातात. युरिनेशनमुळे ड्रिंक मध्ये असलेले पूर्ण पाणीही शरिराच्या बाहेर टाकले जाते.
सध्या अल्कोहोल बरोबर पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक, मुख्यत्वे करून कोक घेण्याची प्रथा प्रचलित होऊ लागली आहे. तरूण पिढी तर हे जास्तच करताना दिसतात. हे आणखीनच धोकादायक आहे.
सार्वजनिक आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होणार आहे हे तो एक विधाताच जाणो.
September 8, 2015
जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?
एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.
त्यावर ती बाई म्हणाली,
"त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !"
जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.
मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.
निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !
आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.10.2016
October 31, 2016
समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.
March 26, 2006
रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.
प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.
या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:
१. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.
२. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.
३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.
४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.
ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.
५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.
६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.
७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.
८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.
९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.
१०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.
११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.
१२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.
बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.
मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.
डॉ. अविनाश वैद्य
July 23, 2022
पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात.
October 25, 2023
कोरोनाविरोधातील लढ्यात देश आज निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असताना कुठलंही अविवेकी वर्तन निर्धाराला तडा देणारे ठरेल. त्यामुळे सरकार म्हणून बोलताना प्रत्येकाने जबाबदारीची व्यापक जाणीव ठेवून बोललं पाहिजे. नागरिकांनीही कर्तव्याच्या जाणिवा जोपासण्याची गरज आहे.
April 4, 2020
श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् ।
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥
श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते.
भयहरां - भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. आई जगदंबेच्या कृपेने मोक्ष प्राप्त होत असल्याने ही भीतीच नष्ट होते.
ज्ञानप्रदां- या मोक्षाला कारण असणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्रदान करणारी.
निर्मलां- शुद्ध चैतन्यस्वरूपिणी, माया मल विरहित अशी.
श्यामाभां- आपल्या अत्यंत तेजस्वी सावळ्या वर्णाने आकर्षक दिसणारी. कमलासनार्चितपदां- कमळावर बसणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी चरणकमलांची उपासना केली आहे अशी. नारायणस्यानुजाम् - भगवान श्री नारायण अर्थात श्री विष्णूंची लहान भगिनी.
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां- वीणा, वेणू म्हणजे बासरी आणि मृदंग इत्यादी वाद्यांच्या ध्वनींचा रसिकत्वाने आस्वाद घेणारी.
यात वीणा हे तंतुवाद्य, बासरी हे वातवाद्य तर मृदंग हे चर्मवाद्य. अर्थात या तीनही प्रकारांमुळे परिपूर्ण होणारे संगीत.
नानाविधामम्बिकां- अनेक रुपांमध्ये नटून विश्व निर्माण करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 13, 2020
बघा जरा विचार करुन…का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला? का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर? त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही? असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…!
July 13, 2019
एकदा अब्दुल कलामांना एरोडे येथे एका कार्यक्रमात बोलावलं होतं,तिथे त्यांना भेट म्हणुन प्रायोजकाने त्यांच्या कंपनीचा मिक्सर देउ केला, तो घेण्यास कलामांनी नकार दिला मात्र त्यांच्या कुटुंबाकरीता त्यांना मिक्सर हवा होता . त्यामुळे त्यांनी त्या मिक्सर च्या किंमतीएवढा ४८५० रुपयांचा धनादेश प्रायोजकांना देऊ केला अन तो मिक्सर विकत घेतला. पण त्या प्रायोजक कंपनीने एक महिना झाला तरी तो धनादेश बँकेत जमा न करता तसाच ठेवला.
October 12, 2021
साधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.
June 23, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti