(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ‘रक्तदाब’ (Blood Pressure)

    सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.

    दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.

    एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.

    रक्तदाबाचे प्रकार
    अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.
    साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. जवळजवळ ९०-९५ टक्के लोकांमध्ये साधा अति रक्तदाब असतो.

    अनुषंगिक अति रक्तदाब (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.

    अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)

    ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :
    कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.

    क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.

    ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.

    ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.

    इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी

      January 9, 2017


  • परफेक्ट बॉस कोण ?

    खरं तर एखाद्या ठिकाणी स्त्री बॉस असली तर त्यात एवढं मोठं काय? असा प्रश्न काही जणांना पडेल. पण त्यांची संख्या केवळ 20 टक्के असेल, बाकी 80 टक्के वर्गाला हा बदल फारसा रुचत नाही. त्यातही पुरुषांची संख्या अधिक ! कारण स्त्रियांवर हक्क गाजवणं ही कल्पना मनाला चिकटलेली असते. आता त्यांच्या हाताखाली काम करायचं म्हणजे… पण अपरिहार्यतेच्या दृष्टिकोनातून त्याला ‘अंजाम’ दिला जातो.

      October 14, 2018


  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ३

    भगवान गणेशांचा आवडता रंग लाल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे.पण लालच का असे म्हटले तर?

      January 15, 2020


  • समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

    समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे

    सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

    नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

    सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।

    कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

    रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

    चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

    हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।

    रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

    माथा मुकुट मणी कानी कुंडले ।

    सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।

    नागबंद सोंड-दोंद मिराविले ।

    विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

    चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

    खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

    सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

    अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

    छत्रे चामरे तुजला मिरविती ।

    उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।

    ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।

    आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

    ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

    ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।

    ताल मृदंग वीणा घोर उमटती ।

    त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

    लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

    सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥

    दास रामाचा वाट पाहे सदना ।

    संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना

    ॥ जय ० ॥ ७ ॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

    !!गणपती बाप्पा मोरया!!

      September 8, 2016


  • अनुभवात ईश्वरी दर्शन !

    प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला वा दिसला, ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही. परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे.

      September 27, 2011


  • रोग परवडला!

    प्रकाशन दिनांक :- 02/01/2005
    तिकडे सुनामी लाटांनी दक्षिण भारताच्या किनारपट्टीला धुऊन काढले आणि त्याच वेळी पश्चिम किनाऱ्यावरील मुंबईत देशी दारूच्या लाटांनी जीवघेणे थैमान घातले. विषारी दारू प्राशन केल्याने तब्बल 83 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. केवळ आठवडाभराच्या आतच दोन वेगवेगळ्या घटनांत एवढ्या मोठ्या संख्येत बळी गेलेल्या लोकांमुळे अवैध दारूचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

      January 2, 2005


  • नवरत्नमालिका – ४

    भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां
    वारिराशिमणिमेखलावलयवह्निमण्डलशरीरिणीम् ।
    वारिसारवहकुण्डलां गगनशेखरीं च परमात्मिकां
    चारुचन्द्ररविलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ४॥

    आई जगदंबेच्या अतीविराट विश्वरूपाचे इथे वर्णन साकारण्यात आले आहे. विश्वातील अतीव वैभवशाली पंचमहाभूते ही जणूकाही आई जगदंबेची अवयव वा आभूषणे आहेत असे अतिभव्यतम वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात,

    भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां- भूरी म्हणजे प्रचंड. भार अर्थात वजन. सगळ्यात जास्त वजन कशाचे? तर या पृथ्वीचे. त्याला जो धारण करतो तो भूरीभारधर. कोण? तर कुंडलीद्र. कुंडली म्हणजे वेटोळा. वेटोळा घालून बसणारा प्राणी म्हणजे साप. त्या सर्व सापांचा इंद्र अर्थात राजा म्हणजे भगवान श्री शेषनाग.

    त्याच्या मस्तकावर असणाऱ्या मण्याप्रमाणे असणारी पृथ्वी. भूवलय. ती पृथ्वी ही जिचे पदपीठ अर्थात पाय ठेवण्याचे आसन आहे अशी.
    वारिराशिमणिमेखलावलय- वारी म्हणजे पाणी. ज्याची राशी म्हणजे साठा.सगळ्यात मोठी जलराशी समुद्र. तो समुद्र हीच जणू आई जगदंबेची मेखला, कंबरपट्टा आहे. कंबर पट्टा सतत हलत राहतो. तसा समुद्रही लाटांच्या स्वरूपात हलत राहतो. पण कंबर पट्टा कधी जागा सोडत नाही. तसा समुद्र आपल्या जागी स्थिर असतो. त्यामुळे त्याला कंबरपट्टा म्हटले आहे.
    वह्निमण्डलशरीरिणीम् - या विश्वातील सकल वह्निमंडळ अर्थात तेजस्वी गोष्टी या आईच्या शरीर दृश्य स्वरूप आहेत. जेथे जेथे तेज आहे तेथे आईचे प्रगटीकरण आहे असा अर्थ.
    वारिसारवहकुण्डलां- वारी म्हणजे पाणी. त्याचे सार म्हणजे भरलेला साठा. असा पाण्याचा साठा म्हणजे ढग वाहून नेतो तो वारा आईची कुंडले आहेत.
    त्याची हालचाल तेथे गृहीत आहे.
    गगनशेखरीं- गगन म्हणजे आकाश हेच जिचे शिखर म्हणजे मस्तक आहे अशी.
    परमात्मिकां- परब्रह्मस्वरूपिणी.
    चारुचन्द्ररविलोचनां- चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य हेच जी चारू म्हणजे अत्यंत सुंदर नेत्र आहेत अशा,

    मनसि भावयामि परदेवताम् - परम देवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 18, 2020


  • मी येतोय… ५ सप्टेंबरला !!

    विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना.

    च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात वर्षभर फार फार तर पंचवीस तीस लोकांचा सहवास, इथे मात्र 10 दिवस लोकांची मला भेटण्यासाठी नुसती झुंबड लागलेली असते. मज्जा म्हणजे काय ते फक्त या 10 दिवसात मला अनुभवायला मिळते.

    सर्वात महत्वाचे आमचे पिताश्री, व माय या दिवसात माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत! काय पाहणार, जे दरवर्षी चालते तेच या वर्षी पण होणार.

    या वर्षी किती हप्ता गोळा केलास?, त्याची आकडेवारी दे, त्यात कट मारलेला मला चालणार नाही, धमकी वजा सूचना आली. मी कोणताच हिशोब कधीच दिला नाही, तरी याला कसे माझे कटींग किती आहे हे समजले ! आमच्या सानिध्यात राहून भलताच बेरकी झाला आहे. आता विचार करावाच लागेल, पार्टी बदलायचा, लवकरच याला बदलून नवीन कुणाची वर्णी लाऊन त्याच्या जीवावर मौज करायची, असा विचार मनात आला. याला डोईजड बनवून चालणार नाही, कारण आम्ही एकतर याच्या येण्याच्या आधी महिनाभर वसुलीला लागतो, त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात, वेळ प्रसंगी जे शानपट्टी करतात त्यांना हाडांवर नंबर टाकून ठेवा, डाक्टरला जोडताना त्रास नको, असा पंटर मार्फत निरोप द्यावा लागतो, इतके करून बाचाबाची ( बा चा व बा ची) होतेच. हिशोब मागणे, हे मात्र जरा अतीच झाले.

    या वर्षी स्वारी जरा, जास्तच रंगात आली असे दिसते, चक्क म्हणाला, या वेळेस मी सर्व म्हणजे सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणार आहे. तुम्ही लोक माझ्या नावावर वसुली करता, मज्जा करता, मी काय नुसते पहात राहू?

    पूर्ण दहादिवस मी तुमच्यातील एक म्हणून राहणार आहे, जो गल्ला इथे गोळा होईल, त्यावर माझी करडी नजर राहील. दररोज रात्री समोरचा पडदा पडला की, स्टेज मागे आपली बैठक झालीच पाहिजे. या वेळेस ब्रँड चांगले हवेत, घेतल्यानंतर वास नको म्हणून भरपूर अगरबत्या लाऊन ठेवा. भाविकांचा प्रसाद मी चकणा म्हणून खाणार नाही, सांगून ठेवतो. काजू, बदाम, पिस्ता, जर्दाळू, हेच पाहिजेत, नाहीतर आणाल मसाला शेंगदाणे, बटाटा चिप्स, आणि फारसाण.

    या वर्षी पत्त्यांचे डाव मांडायचेच, मागीलवर्षी पैशावरून बराच वाद झाला, तसा या वर्षी होणार नाही याची दक्षता घे. रमी, तीनपत्ती, झालीच पाहिजे, मी यात सामील होणार नाही, कारण सर्व डाव मीच जिंकणार हे त्रिवार सत्य आहे, आणि काय सांगावे, तुमचा तो पप्या, बाल्या, बंटी, दादा लोक माझ्या पोटाला चाकू लाऊन शेवटच्या दिवशी मी मिळवलेले सर्व घेऊन पसार होतील. बाकी तुमचे हे चलन आमच्या राज्यात चालत नाही, आणि बदलून पण मिळत नाही, त्यामुळे तुमचा तमाशा पाहण्याचाच मी आनंद घेतो.

    यावर्षी मला निरोप देताना कोणती गाणी लावणार, जरा यादी देशील, डीजे जोरदार झाला पाहिजे सांगून ठेवतो, आर्ची परश्या ला बोलावशील, सैराटचा धुडगूस केलास तर गर्दी वाढेल, वसुलीतील सर्व अडका इथेच खर्च होउदे, नाहीतर त्या साक्षी- सिंधू सारख्याचे पोस्टर लाऊन बेरंग करशील. भाजनांचा, किर्तनांचा तर मला अगदी वीट आला आहे. वाजले कि बारा, चोली के पीछे, चुम्मा दे अशी गाणीच लावायची.

    आणि काय रे तुझ्या डोक्यात नसते विचार येऊ लागले आहेत, पोरीबाळी साठी वेगळ्या रांगा म्हणे, अरे येड्या, पोर उनाड असतातच, जरा मुलींची छेड काढली, गर्दीचा फायदा घेऊन, त्यांना हात लावला तर इतकं मनावर घ्यायचे नसते. अचकट विचकट हाव भाव करू देत, काही फरक पडत नाही, जरा नशापाणी केल्यावर असं होतेच, आदर्शवाद मी गेल्यानंतर.

    स्वच्छ पाण्याची मला ऍलर्जी आहे, दर वर्षी तुम्ही लोक मला गटारी सारख्या निर्मळ पाण्यात बुडवता, आता त्याचीच सवय झाली आहे. पर्यावरण वाद्यांचा आयचा घो, खूप माजले आहेत, प्रत्येक सणात काहीतरी दोष काढतातच, म्हणे मला पाण्यात बुडवल्याने मासे मरतात, अरे या विश्वाचा कर्ता करविता मीच आहे, दहा पंधरा हजार मासे मेले तर काय मोठा फरक पडणार आहे? तुम्ही सर्व कायदे झुगारून मला तलावात, नदीत, समुद्रात टाकाच.

    दुसऱ्या दिवशी मी हात पाय मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत तीरावर, पडलेला दिसणार आहे, असुदे. सफाई कामगार मग माझे तुकडे त्यांच्या कचऱ्याच्या गाडीत भरून, घेऊन जातील, आणि गावाच्या बाहेर फेकतील. तसेही आपला धर्म सांगतोच, आत्मा गेल्यावर शरीर नश्वर आहेच, ते नष्ट करायलाच पाहिजे. पण थोडा हा पण विचार करा, तुम्हालाही मेल्यानंतर असेच कचऱ्यात टाकून दिलेले आवडेल का? कुत्री, मांजरे तुमच्या देहाचे लचके तोडतील तर तुमच्या घरच्यांना त्याचे काही दुःख होणार नाही, असे मी समजायचे का? माझी जी अवस्था तुम्ही करताय, तशीच तुमची नको का व्हायला?

    माझ्या उंचीवर बंधने आणणारे, उपदेश देणारे यांना मात्र उलटे टांगून मिरचीची धुरी द्या, या वर्षी माझी उंची किमान 30 फूट असली पाहिजे, आणि हो, वीज आकडा टाकून घ्यायची, वर्गणीतील पैशाने विजेचे बिल भरशील तर मी मुळीच खपवून घेणार नाही.

    तो लोकमान्य उर्फ केशव (बाळ) गंगाधर टिळक, त्याचा तिकडे गेल्यावर चांगलाच समाचार घेतो, लोकांना उगीचच आदर्शवाद, देशाभिमान, सुसंस्कृत, असले सुतकी विचार सुचवण्याचा, तसेच त्यांना सुधरवण्याचे, त्यांचे दुःसाहस यासाठी त्यांना चांगला धडा शिकवतो.

    -- विजय लिमये
    (9326040204)

      September 3, 2016


  • प्रीस्ट्रेस्ड काँक्रिट म्हणजे काय?

    काँक्रिट आपल्याला माहित असते. पूल, धरणे, बंधारे इत्यादीसाठी आपण सिमेंट-काँक्रिटचा वापर करतो. तुळईचा आकार आयताकृती असतो. आवश्यकतेनुसार तुळई तीन मीटरपासून १५० मीटर पर्यंत लांब असू शकते. इमारत किंवा पूल यांच्यावर स्वतःचे आणि त्यावर उभारलेल्या वस्तू आणि रहदारीचे वजन, वाऱ्याचा दाब, भूकंपाचे धक्के इत्यादिचे परिणाम स्लॅबवर पडता

      January 23, 2023


  • डिसेंबर ०१ : पहिली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी आणि भारताची कसोटी कारकीर्द

    भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीचा आणि भारताच्या आजवरच्या कसोट्यांमधील कामगिरीचा लेखाजोखा.

      December 1, 2010