वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दही हा पदार्थ जरी दुधापासूनच बनत असला तरी दुध व दह्याच्या गुणधर्मात बराच फरक आहे.दुधासारखे जर आपण दह्याचे नियमीत सेवन केले तर ते रोगांना आयतेच निमंत्रण दिल्या सारखे होईल.
दही हा पदार्थ थंड असून तो शरीरात थंडावा निर्माण करतो हा जो समज आपल्या समाजात रूढ झाला आहे तो पुर्णत: चुकीचा आहे.वास्तविक दही हे उष्ण गुणाचे असते.
आता दह्याचे सामान्य गुणधर्म पाहूया:
दही हे शरीरात स्निग्धपणा निर्माण करते,पचायला जड असते,तोंडास रूची आणते,शरीरात शुक्रधातू व चरबी वाढविते,वात दोष कमी करून पित्त व कफ दोष वाढविते.
साधारण पणे दही हे ७ प्रकारचे असते व प्रत्येकाचे गुण वेगळे असतात चला आता ते आपण थोडक्यात पाहू:
१)ताजे दही:
रुचिकर,गोड,शरीरात विविध स्त्रावांची उत्पत्ती करणारे व चरबी व कफ वाढविणारे असते.
२)आंबट दही:
कफपित्तकर,अंगावर सूज उत्पन्न करणारे व शरीरात स्त्राव उत्पन्न करणारे असते.
३)शिळे आंबट दही:
रक्तधातू विकृत करते,पित्त वाढविते व त्यामुळे रक्ताचे व पित्ताचे अनेक विकार जसे त्वचारोग,डोळे लाल होणे,घशाशी आंबटकडू येणे,झोपेचा अतिरेक असे त्रास होतात.
४)अदमुरे दही:
ह्याचे वारंवार सेवन केल्याने छातीत जळजळ,सर्दी,खोकला,पोट फुगणे,अशा तक्रारी होतात.
५)तापविलेल्या दुधाचे दही:
वातनाशक,तोंडास रूचि आणते,शरीर पुष्ट करते,बलदायक आहे.
६)साय काढलेल्या दुधाचे दही:
तुरट,पचायला साईच्या दह्या पेक्षा हल्के,भुक वाढविणारे,मळ घट्ट बांधुन बाहेर काढणारे,आतड्यांची गती कमी करणारे,ह्याच्या नियमीत सेवनाने पोट फुगते.
७)साईचे दही:
पचायला जड,वातनाशक,कफकर,शुक्रधातू वाढविणारे आहे.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 10, 2017
आपली त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याची नितांत गरज आहे. केवळ त्वचा स्वच्छ राखण्यामुळेही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सध्या अनेक कारणांमुळे त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
बाहेरून आल्यावर लगेचच हात-पाय, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास साबणही वापरावा.
त्वचेसाठी साबण निवडताना विशेष काळजी घ्यावी. आज-काल बाजारात साबणाचे शेकडो नमुने मिळतात. पण चांगल्या दर्जाचा साबण न वापरल्यास त्वचेचे आजार होऊ शकतात. यासाठी मान्यताप्राप्त, सौम्य आणि त्वचेचे रक्षण करणारा साबणच वापरावा. आयुर्वेदिक किंवा षर्बलच्या नावाखाली आजकाल काहीही विकले जाते. त्यांच्या मागे लागू नये. बाजारात दर महिन्याला नवे-नवे साबण येत असतात. गरज नसल्यास आपला साबण बदलू नये. आपल्या त्वचेला मानवणाराच साबण वापरावा.
त्वचा स्वच्छ व कोरड्या कपड्याने हळूवार पुसून कोरडी करावी. यामुळे पुळ्या, पुरळ, घामोळे, खाज येणे आदी त्वचेच्या आजारांपासून आपली त्वचा सुरक्षित राहू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जो टॉवेल वापरतो तो शक्यतो इतरांबरोबर शेअर करु नये. आपला टॉवेल आपल्यासाठीच ठेवावा. घरातील प्रत्येक माणसासाठी दोन टॉवेल असल्यास उत्तम. पाहुणे मंडळींसाठीही वेगळे टॉवेल ठेवावेत.
स्त्रियांनी कपडे-भांडी धुण्यासाठी वापरायचे साबण शक्यतो चांगल्या प्रतीचेच घ्यावेत. जास्त सोडा असलेला कमी प्रतीचा साबण त्वचेला घातक.
-- पूजा प्रधान
December 16, 2015
शुभा तोले – यांचा जन्म ऑगस्ट १९६७ मध्ये एका समृद्ध वैज्ञानिक कुटुंबात झाला. त्यांच्या आई डॉ. अरुणा पी. तोले , एक व्यावसायिक थेरपिस्ट होत्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण कमी किमतीच्या प्रोस्थेटिक्स, एड्स आणि उपकरणे डिझाइन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यांचे वडील भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या समीर या संस्थेचे संचालक होते.
August 27, 2025
धायरी, पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळा आहे. इव्हान आलीच यांनी युरोपमध्ये डी-स्कुलिंग ही चळवळ सुरू केली होती. स्कूलमध्ये जे आपण कप्पे केलेत, विषयांचे असो, वर्गांचे असो, वयांचे असो, स्कूल ड्रेसचे असो, यांच्यापलीकडचं जे आहे ते सर्व डी.स्कुलिंग मध्ये येतं. स्कुलिंग पुसून त्याच्या पलीकडचं, जे जे आहे, पुस्तकांच्या पलीकडचं तसेच व्यवहारातलं जीवन जगण्यासाठी जे जे लागतं ते, थोडक्यात जीवनशिक्षणच.
२०११ पासून ही शाळा सुरू झाली. २०२३ मध्ये दहावीची पहिली बॅच या शाळेच्याबाहेर पडली. शाळेच्या पलीकडे मुलांना काय येतं व काय करायचंय, काय शिकायचंय हा या शाळेत देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा गाभा आहे. वेगळ्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक शाळा आज आकाराला येत आहेत. पूर्वी खरोखर ज्यांना शिक्षणाच्या कार्यात व प्रसारात तळमळ होती त्यांनी समर्पित होऊन शैक्षणिक संस्था काढल्या ज्या पुढे नावाजल्या गेल्या.
June 30, 2026
गेले चार दिवस दिल्लीत राजकीय क्षेत्राशी संबंधीत कामं घेऊन मित्रांसोबत आलोय. माझा हा दिल्ली मुक्काम राजकीय दृष्ट्या वेगळे अनुभव देणारा ठरला.
November 3, 2018
जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
Error, group does not exist! Check your syntax! (ID: 3)सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्राम ची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्की लाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत.
जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.
मॅकडोवेल नं १ (McDowell’s No.1)
हा देशातील सर्वात जास्त विकला जाणार व्हिस्की ब्रँड आहे. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडचा हा ब्रँड असे ही कंपनी UB ग्रुप चालवते. 1968 मध्ये हा ब्रँड बाजारात उतरवला होता.
मॅकडोवेल नं १ चे बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहे.
मॅकडोवेल नं १ रिझर्व
मॅकडोवेल नं १ रिझर्व डायेट मेट
मॅकडोवेल नं १ प्लॅटीनम
ऑफिसर्स चॉइस (Officer’s Choice)
'ऑफिसर्स चॉइस' हा देशातील दुसर्यार क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड आहे. या ब्रँडचा मालकी हक्क किशोर छाबरिया यांच्या अलाइड ब्लेंडर्स अॅण्ड डिस्टिलर ग्रुपकडे आहे.
बॅगपाइपर (Bagpiper)
'बॅगपाइपर व्हिस्की' हा ‘यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड'चा ब्रँड आहे. 'बॅगपाइपर व्हिस्की'चा जगातील टॉप 100 ब्रँड्स्मध्ये समावेश आहे.
रॉयल स्टॅग (Royal Stag)
'रॉयल स्टॅग' या ब्रँडचा मालकीहक्क फ्रेंच कंपनी 'पेर्नोड रिकार्ड'कडे आहे. 1995 मध्ये सीग्राम कंपनीने हा व्हिस्की ब्रँड बाजारात उतरवला होता. 'रॉयल स्टॅग'मध्ये कोणतेच आर्टिफीसियल फ्लेवर नाही आहे.
ओरिजिनल चॉइस (Original Choice)
'ओरिजिनल चॉइस'हा गोव्यातील 'जॉन डिस्टिलरीज'चा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जॉन डिस्टिलरीजचा हा ब्रँड वादाच्या भोवर्याोत सापडला होता.
ओल्ड टेवर्न (Old Tavern)
टॉप इंडियन व्हिस्की ब्रँडमध्ये 'ओल्ड टेवर्न’सहव्या क्रमांकावर आहे. ओल्ड टेवर्न व्हिस्की देशातील बिहार व उत्तरप्रदेशातील सर्वात पॉप्युलर ब्रँड आहे. काही आफ्रिकन देशांमध्येही हा ब्रँड फेमस आहे.
इम्पीरियल ब्लू (Imperial Blue)
'इम्पीरियल ब्लू'ला 'सीग्राम्स इम्पीरियल ब्लू' असेही म्हटले जाते. इंडियन व्हिस्की मार्किटमध्ये हे नाव खूप प्रतिष्ठित आहे.
ह्यावर्ड्स फाइन (Haywards Fine)
'ह्यावर्ड्स फाइन' हा देखील विजय माल्या यांची कंपनी UB Group चा एक पॉप्युलर ब्रँंड आहे. इकॉनॉमी व्हिस्की कॅटेगरीमधील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे.
8 PM
8 PM हा प्रसिद्ध कंपनी Radico Khaitan चा एक फेमस इंडियन ब्रँड आहे. Radico Khaitan आधी 'रामपूर डिस्टिलरी अॅण्ड केमिकल कंपनी या नावाने ओळखली जात होती.
डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)
'डायरेक्टर्स स्पेशल' हा युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. ही कंपनी युनाइटेड ब्रेव्हरीज ग्रुपचा (UB) एक पार्ट आहे. जागतिक क्रमवारीत 'डायरेक्टर्स स्पेशल'चा ४४ वा क्रमांक लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
नाकपुडीची उजवी बाजू ही सूर्याची बाजू होय, तर डावी बाजू ही चंद्राची बाजू होय असे योगाभ्यासामध्ये म्हटलेले आहे.
July 31, 2011
दमदाटी करून चीनने आपल्याला बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही करावयास लावली.चीनने भारतीयाना व्हिसा नाकारायचा आणि भारताने मात्र चिनी नागरिकांसाठी पायघड्या घालायच्या हे भारतासाठी लज्जास्पद आहे. चिनी बनावटीची शस्त्रे मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतातील बंडखोरांना दिली जात आहेत.
November 12, 2013
झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी..हे गाणं म्हणजे रेल्वे नामक एका भव्य युगाशी आपली बालपणीच झालेली ओळख. आमच्या पिढीने तर जन्मापासूनच या झुकझुक गाडीचा प्रवासमय आस्वाद घेतला. परंतू, हजारो प्रवाशांना एकत्र घेऊन जाणारी ही रेलगाडी भारतात पहिल्यांदा कधी धावली आणि या रेल्वे नामक एका ‘चाक्या म्हसोबा’ चा चमत्कार बघून लोकांनी तिचं स्वागत कसं केलं हे ऐकून आजच्या आणि येणार्या अनेक पिढ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
November 19, 2012
मंत्र म्हणजे तरी काय? तर आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, ‘मंत्र’ म्हणजे मन त्या त्रयीत लय करून जो शब्दोच्चार केला जातो, तोच मंत्र होय. (याचाच अर्थ, मन + त्र म्हणजे तीन ज्ञानेंद्रिये अर्थात नाक, कान आणि डोळे म्हणजेच त्रिकुटी एका ठिकाणी एकाग्र होत असते, तेव्हाच मुखातून जो प्रणव ओम् सहित बाहेर पडतो किंवा ज्याचे उच्चारण केले जाते तोच हा मंत्र होय.)
January 8, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti