वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले.
September 11, 2021
कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.
November 19, 2021

पेंढारे’ या गावाला ‘कर’ जोडून हे आडनांव तयार झालं असावं असा प्रथम दर्शनी समज होतो. ‘पेण्ढरकर’ या आडनावावरून राजकवी यशवंत यांचे पूर्वज ‘पेण्ढर’ या मूळ गावाचे रहिवासी असावेत असाही रास्त समज होतो.
June 10, 2016
मुंबईतील ब्रिटीशकालीन पुतळ्यांच्या सद्यस्थितीवरील एकूण चार लेखांपैकी हा शेवटचा चौथा भाग
November 11, 2016
गॅसनामा
गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.
फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "
हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.
या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.
गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !
हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.
वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.
या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.04.2017
April 4, 2017
आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही.
December 5, 2017
आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ?
एक.
दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर....
दोन अडीज मोसंबी.
यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत.
आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही !
पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ?
एक ग्लास अगदी सहज.
आग्रहाने, स्पेशल कोणी आणून दिला तर...
दोन ग्लास पण नक्कीच पिऊ....
मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गझलेच्या भाषेत सांगायचे तर ....
मला तर तो "रस" नकोच होता
मला तर तो "रस" नकोच होता,
पण
तू दिलेला रस
रस घेऊन
घेतला नाही तर....
.
..
...
तुझा विरस होणार होता
आणि नंतर तुझा,
माझ्यातला "रस" कमी होणार होता....
म्हणून प्यावा लागला.
मोसंब्याचा दोन ग्लास रस येण्यासाठी किती मोसंबी लागतात ?
तब्बल सात ते आठ.
माझी रसनेंद्रियांची तृप्ती फक्त एक नाहीतर दोन मोसंबी खाऊन होणारी होती, तिथे सात आठ मोसंब्यांचा ऐवज जर पोटात ओतला गेला तर ?
पचेल का तो ?
नाही ना.
मग ??
आधीच आहे अप्सरा
बटेने झाकला चेहरा
केसात माळला गजरा
चेहराही मंद हसरा
त्यात जरासा नखरा
हाऽय हाऽय्ऽ
काय हा नजारा
फेसाळलेला रस काढलेला
ग्लास समोर भरलेला
त्यात आल्यालिंबाचा रस पिळला
पुनः वरून चाट मसाला भुरभुरवला
गरज नसताना स्ट्राॅ ही घातलेला
एवढासा ग्लास तो किती नटवला
बाकी चवींनी एवढा का सजवला ?
पचायला जड होणारा पचवायला.
स्नेहन, प्रीणन, तर्पण, बृंहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकासी, आणि ह्रद्य
असे सारे गुण एकाच वेळी, एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजीर्णच व्हायचे. !
फळे हवीत चावून खायला
एवढंस मर्म सांगायला
एवढं हवं होतं का घोळवायला.
असं ज्युस पिणे म्हणजे, स्वतःचा बंगला असताना, बंगल्यात अप्सरा असताना, बंगला अप्सरा सोडून, झोपडीतील खत्रूड मड्डमेवर प्रेम केल्यासारखंच नाही का ?
तोंडात स्वतःचे बत्तीस दात समोर हयात असताना, आणि तिला फसवून (जीभेला) डायरेक्ट घश्यात ज्युस ओतणे, हा शुद्ध अन्याय आहे.
चव निर्माण करणाऱ्यावर,
चव घेण्यासाठी "मी" आहे,
असे सांगणाऱ्या "मी" वर !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.12.2016
December 1, 2016
रामायणातील खलनायक म्हणून रावणाला ओळखले जाते. रावणाची ही एक वेगळीच ओळख वाचा
November 7, 2016
स्वामींच्या चित्राखाली तुम्हांला एक वाक्य दिसेल,
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"
आता ह्यात शब्द किती तर सहा. आता ह्यातल्या कुठल्याही शब्दामागे "च" हे अक्षर लावा आणि अर्थ बघा कसा होतो.
"भिऊच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
"भिऊ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे"
"भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे"
"भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे"
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे"
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच"
।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
भि......ती कशाची उरात धरतो
ऊ.......न सावली नियम जगाचा
न.......को अंतरू परमात्म्याला
को.....णी नाही त्याविना तुझला
स.......तत रहा तू नामस्मरणात
मी......पण नाही स्वामी चरणी
तु.......झे न काही माझे न काही
झ्या....गिरदारी कुणा दाखवतो
पा......मर जीव हे सारे असती
ठी......क समजुनी राहे जगती
शी......घ्र धाव घे स्वामीपाशी
आ......दरे वंदन करी स्वामीशी
हे........ची विनवितो मी सर्वांशी
!! श्रीस्वामी समर्थ !!
'' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"
-- अनुराग
December 7, 2016
निसर्गाचे मानसशास्त्र ही शब्दरचना वाचून गोंधळात पडलात का? पर्यावरण आणि मानसशास्त्र यांच्यात काय नातं असं क्षणभर वाटलं ना? पण असं वाटणारे तुम्ही एकमेव नाही आहात. थोडा नवा प्रकार आहे हा पण भविष्यकाळात मानवजातीवर याचा विशेष प्रभाव पडलेला असेल. मानवाचे भवितव्य ठरविणारा हा उद्याचा एक घटक असणार आहे.
February 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti