(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह 

    स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय.

      July 5, 2020


  • गेटवे ऑफ इंडिया ९७ वर्षाचे झाले

    मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.

      December 4, 2021


  • वणीची सप्तशृंगी

    महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

      June 6, 2025


  • कोकणची माती आणि तिचे संरक्षण

    कोकणची माती आणि तिचे संरक्षण

    कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा.

      January 10, 2022


  • शेतीचे सामूहिक व्यवस्थापन

    अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे.

      November 9, 2016


  • पक्षीपरिचय ३५

      October 23, 2015


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – १३

    किं यानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं
    किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् ।
    ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः
    स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् ॥१३॥

    आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवान श्री शंकराची कृपा हीच खरी प्राप्ती आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्री म्हणतात,

    किं यानेन - प्रवासाची सुखकारक साधने असून काय?
    धनेन - प्रचुर स्वरूपात धन असून काय?
    वाजिकरिभिः
    प्राप्तेन राज्येन किं - सगळ्या जगावर आपली सत्ता चालेल असे राज्य मिळून देखील काय?
    या सगळ्यामध्ये काय? या शब्दाच्या पुढे, उपयोग जी हा शब्द गृहीत आहे.
    या सगळ्याच्या प्राप्तीने सुख मिळेल असे माणसाला वाटते. काही काळा पुरते ते सुख मिळते देखील. पण ते टिकाऊ असत नाही. अशा नश्वर सुखाच्या मागे लागणारे लोक, आणखी कशा कशाचा हव्यास करतात? ते सांगताना आचार्य म्हणतात,
    किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभि: - पुत्र संतती, कलत्र म्हणजे पत्नी, मित्र, पशुपक्षी, नवीन संदर्भात लावायचे तर वाहन सौख्य,
    देहेन - इतकेच काय तर या सगळ्यांच्या द्वारे मिळणाऱ्या सुखाचा आधार असणारा देह.
    गेहेन किम् - विशाल घराचे काय?
    ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं - या सगळ्यांचे क्षणभंगुरतत्व समजून घेऊन,
    सपदि रे त्याज्यं मनो दूरतः - हे मना ! या सगळ्यांची आसक्ती दुरूनच, तत्काळ सोडून दे.

    स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् - जर तुला स्वतःचे खरंच कल्याण करायचे असेल! तर श्रीगुरूंचा सांगण्यानुसार भगवान पार्वतीवल्लभाचे भजन कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      August 1, 2020


  • मन की बात-हरपत चाललेलं समाजभान

    मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हल्ली एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते.. जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या स्मार्ट मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले.

      January 16, 2017


  • एक रहस्यमय सिद्धान्त

    सर्व forces जसे Electromagnetic , nuclear force आणि इतर काही हे सारे describe होऊ शकतात. म्हणजे microscopic level ला त्यांच्या particles मधले आदान-प्रदान दिसते  पण Gravitation एक मात्र असा force आहे की त्याबद्दल असे घडत नाही . म्हणून तो microscopic level ला describe होत नाही. त्यामुळे Quantum Gravity साठी अशी theory हवी जी सर्व forces describe करू शकेल व त्याचे स्वरूप हे massless हवे .आणि हे ‘string theory’ ने शक्य होते.

      March 30, 2019


  • वाहिन्यांचे लोकशाहीकरण आवश्यक

    प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

      May 15, 2024