(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुरक्षित अन्न सर्वांचाच अधिकार

    सध्या बातम्यात काही अन्नपदार्थ सुरक्षित आहेत कि नाहीत ह्यावर बरीच चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने मी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते.

    जणु काही वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनला (WHO) स्वप्न पडले म्हणूनच की काय यंदाच्या वर्षी आपण "Food Safety: Food from farm to plate make it safe" अशा स्लोगनेच आपण 7 एप्रिल 2015 रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला.

    जे अन्न त्यातील अन्नघटकांची गुणवत्ता टिकवून धरतो ज्यामुळे त्या पदार्थात contamination होत नाही तसेच food-borne diseases (अन्नामुळे होणारे रोग) होत नाहीत आणि ते योग्य पद्धतीने शिजवलेले असेल व सुस्थितीत असेल तर ते अन्न सुरक्षित आहे असे समजावे.

    Bacteria, viruses, parasites, chemicals, contamination, addatives, addultent मुळे अन्न असुरक्षित होते. Contamination हे विविध कारणांनी होते अगदी शेतकरी जेव्हा ते ध्यान पिकवतो तिथपासून ते खाण्यासाठी तयार केलेल्या पदार्थापर्यंत ते असुरक्षित होऊ शकते. भेसळयुक्त अन्न पदार्थ असल्यास तो पदार्थही असुरक्षित होऊ शकतो. साधारणतः भेसळ करण्यासाठी एक तर हलक्या दर्जाचे किंवा हानिकारक पदार्थ त्यामध्ये मिसळला जातो. भेसळीसाठी मग एखादा हलक्या प्रतीचा रंग वापरला जातो किंवा एखादा कमी किंमतीचा घटक त्यात मिसळला जातो. उदाहरणार्थ mouse ह्या पदार्थात तकाकी येण्यासाठी व्हेज जिलेटिन एवजी बीफ जिलेटिन चा वापर काहीजण करतात.

    image-2पदार्थात मिसळण्यात येणाऱ्या घटकात कधी रंग मिसळला जातो तर कधी स्वाद वाढवण्यासाठी flavor enhancers वापरले जातात. Ready to eat पदार्थाच्या पाकिटावर त्या पाकीटातील पदार्थ बनवण्यासाठी काय काय जिन्नस वापरले आहेत ह्या संदर्भातील माहिती दिलेली असते. त्यात मिसळण्यात येणारे जिन्नस हे आहे त्या नावातच लिहिले असतात तर काही ठिकाणी ते E नंबर ह्या स्वरुपात उपलब्ध असतात. ह्या E नंबरच्या संदर्भातील माहिती खाली दिलेली आहे ह्यात तो नंबर कशासाठी वापरला जातो हे सांगीतले आहे.

    E number 100 - 199 रंगांशी निगडीत

    E number 200 - 299 प्रीझरवेटीवजशी निगडीत

    E number 300 - 399 हा अॅटीऑक्सीडंटशी निगडीत

    E number 400 - 499 हा thickeners, emulsifiers, and stabilizers n शी निगडीत

    E number 500 - 599 हा anti-cacking agents

    E number 600 - 699 flavour enhancer agents

    E number 700 - 799 antibiotic

    E number 900 - 999 glazing agents and sweeteners

    E number 1000 - 1500 additional chemicals

    image-3भेसळ साधारणतः अगदी मोहरी जि-यापासून ते तयार अन्न किंवा ready to eat पदार्थांपर्यंत होऊ शकते. उदाहरणार्थ मिठाई, फरसाण. नुकताच भेसळयुक्त पदार्थांच्या संदर्भात डॉक्टर अर्पिता ह्यांनी दिल्लीत एक शोध घेतला. ह्यात स्ट्रीट फूडमध्ये काही दोष आहे का हे तपासण्यासाठी समोसा, पाणीपुरी, बर्गर व मोमोजची 100 सॅम्पल गोळा केली आणि त्यांची तपासणी केली असता त्यातील 15% पदार्थ मध्ये दोष आढळले.

    आशा असुरक्षित अन्न पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य हेल्दी राहीलच असे नाही म्हणूनच FDA ही संस्था जागतिक पातळीवर लोकांना योग्य अन्न व औषधे मिळतात का नाही ह्या वर नजर ठेवून आहे. असा अंदाज वर्तविला जातो की साधारणतः 2.2 million लोक food-borne and waterborne म्हणजेच अन्न व पाण्याच्या दोषामुळे मृत्यूमुखी पडतात आणि त्यातही मुलांचं प्रमाण जास्त आढळते. केमिकल्स व टाॅकसीनमुळे क्राॅनीक आजार ते कॅन्सरच्या रोगापर्यंत त्रास होतो. तळकट, खारट व गोड पदार्थांच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब ह्या सारख्या रोगांचा धोका वाढतो.

    अन्न सुरक्षित करण्यासाठी काही उपयुक्त टीप्स

    • सगळ्या पातळ्यांवर स्वच्छता राखा

    • शिजवलेले व कच्चे अन्न वेगवेगळे ठेवा

    • अन्न व्यवस्थित शिजवा

    • अन्नाचे तपमान योग्य राखा

    • सुरक्षित पाणी आणि कच्या मालाचा वापर करा.

      June 10, 2015


  • भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

    मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच.

      November 8, 2023


  • नैराश्यावर बोलू काही

    आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!!

      October 16, 2017


  • मेडिटेशन गरजेकडून व्यवसायकडे ?

    विषय विचित्र म्हणा , गरजेचं काहीही म्हणा! परंतु आज जगभर या व्यवसायात करोडो डॉलरची उलाढाल होते हे मान्यच करावे लागेल. फार पूर्वी फ्राईड ने संगितले होते २०२१ किंवा त्यानंतरचे शतक मानसोपचार तज्ञांचे असणार आहे . आज ती वस्तूस्थती निर्माण झाली आहे कारण कोरोनाच्या काळात एक तर सवांद तुटलेला आहे आणि काहींच्या डोक्यात पुढे काय ? हा यक्षप्रश्न निर्माण झाला असणारच ह्यात शंका नाही.

      June 26, 2021


  • तोंडाच्या दुर्गंधीवर सोपे उपचार

    कधी - कधी असं होतं की आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तिचे तोंड उघडताक्षणी तिच्या तोंडातून दुर्गंधीचा एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि आपण हैराण होता. अशा वेळी आपण मोठ्या संकटात सापडता कारण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्या तोंडातून येणाया दुर्गंधी बद्दल सांगूही शकत नाही आणि तिच्या तोंडातून येणाया घाण दर्पाला सहनही करू शकत नाही. लोकांना याबद्दल असे वाटते की उन्हाळ्याचे दिवस असल्याने श्वासातून घाण दर्प निघण्याची समस्या होते, परंतु हे खरे कारण नाही. कोणताही ऋतु असेल तरी ही समस्या उद्भवू शकते.

    श्वासांच्या दुर्गंधी ची अनेक कारणे असू शकतात. जसे - पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कुजल्याने, पोटात काही गडबड झाल्याने, तोंडात किंवा हिरड्यात कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाल्याने.

    जर संतुलित आहार असलेले जेवण केले, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ आणि मिनरल्स आदींचे योग्य सेवन केले तर आपल्यासमोर ही दातांची समस्या उद्भवू शकत नाही. योग्य आहाराच्या सेवनाने आपण सहजरीत्या दातांच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो.

    पाणी खूप प्यावे

    जर आपण योग्य प्रमाणात पाणी पितो तर कधीही रोग ग्रस्त होणार नाही. पाणी पिण्याने आपल्याला बरेच फायदे होतात. त्यात एक फायदा हा आहे की पाणी आपल्या तोंडाची स्वच्छता करण्यात मदत करतो. पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करतो. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो. संपूर्ण दिवस आपण काही तरी खात असतो, त्यामुळे आपल्या तोंडात पूर्वीपासूनच जे बॅक्टीरिया असतात, ते बॅक्टीरिया आपल्या हिरड्या आणि दातांवर प्रहार करीत असतात. आपण कमी पाणी पिण्याने आपल्या तोंडात निर्माण होणाया लाळेमध्ये अशा बॅक्टीरियाचे प्रमाण खूप वाढते, जे आपल्या दातांचे शत्रू असतात. त्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वारंवार पाणी पिण्याने तोंडाच्या दुर्गंधीतून बर्‍याच प्रमाणात मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर जेव्हा आपणास वाटेल की तोंडातून घाण वास येत आहे तर पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे केल्याने तोंडातून बॅक्टीरियायुक्त लाळ बाहेर निघून जाते.

    दह्याचे सेवन करावे

    अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की दही खाण्यानेही आपल्या तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते. दह्यात बॅक्टीरिया उत्पन्न होतात, परंतु हे असे बॅक्टीरिया असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक आहेत. दह्याचे सेवन केल्याने श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते. दह्यामुळे असे कसे होते, याबाबत वैज्ञानिक जास्त माहिती मिळवू शकलेले नाहीत. खरंतर तेल व मैद्याने बनलेले चिप्स, बिस्कीट आदी स्नेक्सच्या सेवनापेक्षा ताज्या दह्याच्या सेवनाने जास्त फायदा मिळू शकतो.

    संत्री खावी

    संत्री व्हिटॅमिन 'सी'चे मुख्य स्रोत असते. याच्या सेवनाने आपली त्वचा सुंदर आणि कांतीवानच होत नाही तर याच्या सेवनाने श्वासांच्या घाण दर्पापासूनही सुटका होऊ शकतो. संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आपल्या तोंडात उपस्थित बॅक्टीरियाला लढा देण्यासाठी मुख्य भूमिका निभावते. संत्र्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी' युक्त इतर फळांच्या सेवनानेही आपण श्वासांच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकतो. टॉमेटो, लिंबू, द्राक्षाच्या सेवनाने आपण श्वासातील घाण दर्प घालवू शकता.

    बडी शोप खावी

    जेवण झाल्यावर जर थोडीशी बडी शोप खाल्ली तर चांगले होईल. त्याने एक तर जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत करते. बडी शोप दोन भाग करून एक भाग थोडा भाजून घ्यावा. आता दोन्ही भाग एकत्र करावे. ही शोप दररोज जेवण झाल्यावर खावी. असे केल्याने आपण श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकता.

    लहान वेलची खावी

    हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपल्याला दुसर्‍यांसमोर लाजिरवाणे होणार नाही. या वेलचीला तोंडात ठेवून हळूहळू चावून त्याचा रस चोखत राहावे.

    लवंग सेवन करावे.

    लवंगाचे जे ऍरोमेटिक फ्लेवर असते, ते तोंडाची दुर्गंध दूर करते. त्यामुळे जेवणात त्याचे वापर अवश्य करा.

    दालचीनीचे सेवन करा

    दालचीनीची गोड चव भाज्यांना चवीष्ट तर करतेच, त्याचबरोबर यात जे अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे आपल्या तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टीरिया नष्ट होतात त्यामुळे आपल्याला श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 11, 2017


  • देवदारू

    ।। सुराग्रजाय नम: देवदारूपत्रं समर्पयामि।।

    हिमालयात अथवा अतिशीत वातावरणात अतिशय उंच वाढणारा हा वृक्ष आहे.हा कोनाकृती वृक्ष असून त्वचा उभ्या रेषा युक्त असून आडव्या दिशेने फाटलेली असते.पाने हिरवी,लांब,निमुळती,टोकदार ३-५ वर्षे टिकतात.फुले हिरवट पिवळी,गुच्छ युक्त स्त्री व पुरुष बीज एकाच वृक्षावर उगवते.फळ १०-१२ सेंमी लांब,८-१० सेंमी रूंद पिकल्यावर काळ्या रंगाचे व आत १ सेंमी लांबीचे त्रिकोण भुरकट रंगाचे बी असते.हे वृक्ष ६०० वर्षे जगते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे काण्डसार व तेल.
    आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
    ह्याची चव कडू असून हे उष्ण गुणाचे असते तसेच हल्का व स्निग्ध असतो.हा कफवात नाशक व पित्तकर असतो.

    आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
    १)देवदार व्रणातील स्त्राव व दुर्गंध नष्ट करायला उपयोगी आहे.

    २)देवदारूचा लेप पोटावर लावला असता अडलेला वात पुढे सरतो.

    ३)आंत्रातील कृमी नष्ट करायला देवदारू उपयुक्त आहे.

    ४)सुजेवर देवदारूचा लेप फायदेशीर ठरतो.

    ५)दमा,सर्दी,खोकला ह्यात देवदारूचा चांगला उपयोग होतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 11, 2017


  • पक्षीपरिचय १९

      October 7, 2015


  • आमचं आयपीएल, आमचं राष्ट्रकुल

    आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला.

      April 21, 2024


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ९

    भगवान विष्णूची पत्नी रूपात जसा देवी लक्ष्मी चा गौरव केला जातो तशाच स्वरूपात भूमातेला देखील विष्णू पत्नी स्वरूपातच वंदन केले जाते. त्या भूदेवीचे वर्णन करताना, भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

      December 12, 2020


  • अभंगवारी…!!’

    आषाढ सुरु होतो तोच वारी चे वेध घेऊन...!! आम्ही सुद्धा गेलो होतो वारीला...!हे दुसरं वर्ष आमचं!! नोकऱ्या... शाळा कसं काय जमणार २१ दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला वैगरे सारखे प्रश्न गेल्यावर्षी पासून अडगळीत गेले ते गेलेच.... माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा !!! अहो...जिथे जगतनियंता पाठीशी उभा तिथे इतर चिंता उभ्या राहतायत होय ? हां ... थोडा वेगळा केला प्रवास आम्ही पण वारी करून पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून आलो हे हि खरंय !!

    सामानाची बांधाबांध करता करता वारकरी गेल्यावर्षीची वारी मनातून जगत असतो... आम्ही सुद्धा गेल्या वर्षीच्या आठवणीत रमलो..पांढरे सदरे ..उपरणी सगळी छान तयारी करून ठेवली आणि वारी ची चाहूल लागल्याबरोबर लगेच bookmyshow वर जागा धरून ठेवल्या... दिंडीत कसं काही वारकरी पुढे जाऊन पाल (तंबू)रोवून ठेवतात ना!!...हो नंतर उगाच प्रॉब्लेम नको ना? आणि आमची ठरलेली दिंडी बरं का .. काही ठरलेले... काही नवीन जोडले गेलेले वारकरी असे सगळे एकत्रच जातो आम्ही..!! एकमेकांच्या मनातल्या विठ्ठलाला अनुभवत... स्वतःच्या अंतरंगातल्या विठ्ठलाची अनुभूती घेत घेत त्या विठ्ठलाच्या वारी चा आनंद म्हणजे स्वर्गसुख !! जिवंतपणी मोक्ष अनुभवणं म्हणजे काय ते हे २१ दिवस शिकवून जातात आम्हाला!! आळंदीला कळस हलला आणि पालखीप्रस्थान झालं कि मग ... भेटी लागी जिवा लागलीसे आस !! ऊन..वारा..पाऊस कशाचीही तमा न बाळगता अखंड नामघोषात मन तल्लीन होऊन जातं ! रोजच्या जबाबदाऱ्या..मुलांच्या शाळा... स्वतःच्या नोकऱ्या या ऊन.. वाऱ्या... पावसासारख्याच आडमार्गी होत्या पण माऊली ने या सगळ्याचा भार सांभाळलेला होता त्यामुळे आम्हालाही विशेष चिंता नव्हतीच या कशाची!! वारीत वारकरी मोकळ्या वेळात सुद्धा नामस्मरण करीत असतात तसाच आमच्या whatsap गप्पांमधून पांडुरंग रंगू लागला ..तो रंगला आणि आम्हालाहि रंग चढू लागला त्याच्या भक्तीचा! असाच प्रवास करत करत दिवेघाट... जेजुरी...अगदी वाखरी पर्यंत येऊन पोहोचलो...सगळ्या दिंड्या एक होऊन माऊली भेटीला जातात तसंच पुणे-मुंबई अशी सगळी मंडळी आम्ही एक झालो.. पुढे चंद्रभागा तीरावर पुंडलिकाचं मंदिर दिसलं आणि साद आली ... "आलोच!!" नवखे वारकरी ना आम्ही सगळे!..देवदर्शन नीट व्हायला हवं ना ! आणि पुंडलिका खेरीज कोण भेट घडवून देणार माऊलीची आम्हाला?? एव्हाना आमच्या आषाढीचा दिवस उजाडला...आज माऊली ची भेट होणार हि भावनाच हृदयात उफाळून येत होती सारखी...आणि पावलांनी वाट धरली......... षण्मुखानंदची!!!!

    एरवी साठी ऑडिटोरियम पण आज मात्र सगळ्यांसाठी मंदिर बनून गेला...! त्यात प्रवेशताच गंध... बुक्क्याच्या टिक्याने अंतर्बाह्य विठ्ठलमय झालो...! वेगवेगळे वेष परिधान केलेले... वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे पण कपाळावरच्या तो एक टिळा इतका उठून दिसत होता कि आम्ही सगळेच आता भागवत !! राम कृष्ण हरी कानावर आलं आणि स्तब्ध झालो ...संथ लयीच्या नामस्मरणापासून ते गजर होई पर्यंत!!!जणू काही भगवंताचं विश्वरूप दर्शन घडत होतं...स्वराभिषेक होत होता माऊलीच्या पायावर!!!

    राम कृष्ण हरी ने वातावरण भरून टाकलं तिथलं!! अभंगरसात न्हाऊन निघत असतानाच कर्नाटकातून दिसणारा विठ्ठल सुद्धा अनुभवला !...विश्वरूप पाहून थक्क झालेल्या मनाने हात जोडले गेले आणि रंध्रा रंध्रा ने नामघोष केला ...... जगदोद्धारणा!! विठ्ठल आता पुरेपूर सामावला मनामध्ये..... 'आता अंतरंग झाले पांडुरंग........' हे शब्द जगला तिथला प्रत्येक जण!! आता तिथे बाकी कोणीच उरलं नाही... गायक नाही... वादक नाही...रसिक नाही... तिथे कणाकणात होता फक्त आणि फक्त 'विठ्ठल'!! अभंगशृंखला सुरु झाली... नामदेव पायरीच दर्शन घेऊन एक एक पाऊल माऊलीच्या गाभाऱ्याकडे जाऊ लागलो !! माऊलीचं साजरं रूप डोळे भरून अनुभवलं आणि विठ्ठला.... मायबापा ... आमच्या मनातल्या भक्तीचा सूर असाच निरागस राहो ही प्रार्थना करून त्याच्या पायावर नतमस्तक झालो!!

    मोरया इंटरटनमेंट Morya Entertainment(पुणे) आणि Mukesh Patil ventures (मुंबई ) या दोन पालख्यांनी आमची आषाढवारी.... 'अभंगवारी' घडवून आणली !! गेली ४ वर्ष ज्यांच्या स्वरांमधून या वारीची ओढ लावली आणि पुंडलिकाच्या भक्तिभावाने ज्या स्वरांनी आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं ते म्हणजे आमचे सर! या वर्षीच्या सोहळ्याचं अजून एक वैशिष्टय म्हणजे वैभव जोशी यांनी लिहिलेली आणि प्राजक्ता माळी यांनी निवेदनातून ती उत्तमरीत्या साकारलेली संहिता !! माऊलीच्या गळ्यात नानाविध अलंकार असले तरी तुळशीहाराने माऊलीचं रूप खुलून दिसतं. या वर्षी Soniya Saanchi दि ने सरांसाठी बनवलेला कुर्ता म्हणजे सरांच्या स्वरांमधून अनुभवलेल्या भक्तीचं 'मूर्त स्वरूप' भासला!!

    वारीत चालणं हे भाग्यच पण कर्तव्यात बांधले गेलेल्यां आमच्यासारख्यांच्या धावपळीच्या आयुष्याला वारीचा रंग देऊन विठ्ठला दर्शनाची अनुभूती देणारे सरांचे स्वर....म्हणजे माऊलीने आम्हाला दिलेली सगळ्यात गोड आणि मौल्यवान भेट !!

    आज तिथून परतणाऱ्या प्रत्येक पावलाने मनात हा स्वररूपी विठ्ठल सामावून घेतला आणि प्रत्येकाच्या मनातल्या शुद्ध भक्तीभावनेने न्हाऊन निघालेला हा सोहळा संपन्न झाला ती पुढल्या वर्षीची वारीची आस घेऊनच !!

    ©अपर्णा

      August 7, 2019