वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात.
कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते.
भारतीयांना सिंचनाची कला अनादीकालापासून ज्ञात आहे. जे ज्ञात आहे, त्यात कालमानपरत्वे सुधारणा मात्र झाल्या नाहीत. कधी काळी विकसित झालेल्या पद्धती परंपरेचा भाग बनून अढळ ताऱ्याप्रमाणे निश्चल झाल्या.
घरगुती स्तरावर जमा होणारा ओला कचरा हा घरटी अर्धा पाऊण किलो एवढाच असतो. पण भाजी मंडयात भाजीचा खूप कचरा जमा होतो. तो प्रत्येक मंडईमागे टन अर्धा टन एवढा सहज असतो.
काचेतून आरपार निघून जाणार्या किरणांचं प्रमाण कमी करून तिच्यावरून परावर्तित होणार्या किरणांचं प्रमाण वाढवलं तर त्या काचेचा आरसा बनतो, हे ध्यानात आल्यावर मग काचेचं तसं रुपांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. काचेच्या पाठी जर एखादा पदार्थ बसवला तर आरपार गेलेल्या किरणांना परत उलट्या दिशेनं वळवता येईल, हे तर स्पष्टच होतं.
स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व वर्गांच्या डब्यांमध्ये सोयी-सुविधा वाढीस लागल्या. तृतीय श्रेणी शयनयान ही त्यातली मोठी झेप होती.
ठिबक सिंचन ही अत्याधुनिक सिंचनप्रणाली आहे. झाडाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देऊन अगदी कमी पाण्यात पीक पोषण करण्याच्या पद्धतील ठिबक पद्धत म्हणतात. पारंपरिक पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीमुळे अडीच ते तीनपट जास्त क्षेत्रावर सिंचन होते म्हणून शेती शास्त्रातला हा एक चमत्कार समजला जातो.
कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये आणि त्याचे नीट निर्मूलन व्हावे यासाठी समाज प्रबोधन करायची फार मोठी गरज आहे. हल्ली खूप लोक परदेशी जाऊन येत असतात पण तेथील स्वच्छता काही शिकून येत नाहीत. शेवटी शिक्षण आणि संस्कृती हे दोन वेगवेगळे भाग आहेत असेच म्हणावे लागेल.
जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात.
आपल्याला जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. नेहमीच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
Copyright © 2025 | Marathisrushti