वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
९ ऑक्टोबर १९७६ हा दिवस प्रतिस्पर्धी संघांमधील दोन कसोटीपदार्पणवीरांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.
७ ऑक्टोबर १९७८ रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपुरात जहीर खानचा जन्म झाला. मुंबई हा क्रिकेटमध्ये सवतासुभा असल्याने तो वगळता महाराष्ट्रात जन्मलेला खेळाडू भारतीय संघात निवडला जाणे ही आता महामुश्किल बाब झाली आहे.
‘निन्ना’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या नील हार्वेचा जन्म ८ ऑक्टोबर १९२८ रोजी ऑस्ट्रेलियात झाला.
नाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे.
भारतीय क्रिकेटमधील काही अनाकलनीय कोड्यांपैकी एक असलेल्या माधव आपट्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३२ रोजी तत्कालीन बॉम्बेत झाला.
१९६८ : दणदणीत पदार्पण, खणखणीत पुनरागमन आणि चटपटीत अपयश अशा विचित्र रंगांची कारकीर्द लाभलेल्या नरेंद्र दीपचंद हिरवानीचा जन्म. स्थळ गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्याच्याइतके झक्कास पदार्पण लाभायला भाग्यच हवे.
१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला.
एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे. अवघ्या दुसर्याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली.
१६ ऑक्टोबर १९५२ : पाकिस्तान कसोटी खेळणारे सातवे राष्ट्र बनले. पूर्वीच्या संघांच्या इतिहासाप्रमाणेच त्यांचा सुरुवातीला चोळामोळा झाला. लाला अमरनाथ या सामन्यात भारताचे कर्णधार होते. त्यांचा जन्म ‘आताच्या’ पाकिस्तानात झालेला होता.
१५ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत नेहरू चषकाचा सामना श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यान झाला. अलेक स्टेवर्ट आणि अँगस फ्रेजर यांनी आपापली पदार्पणे साजरी केली. ग्रॅहम गूचने अनपेक्षितरीत्या या सामन्यात गोलंदाजीत यश मिळविले.
Copyright © 2025 | Marathisrushti