वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या मालिकेत त्याने 16 झेल लपकले आणि फलंदाजांच्या सरासरीमध्ये त्याच्याहून सरस फक्त एकच जण होता ! नियमित (मान्यताप्राप्त) फलंदाज अपयशी झाल्यानंतर हमखास ‘चालणारा’ फलंदाज म्हणून किरणची क्षमता या पहिल्या मालिकेतच दिसून आली. त्यानंतर सुमारे सात वर्षे तो भारताचा नियमित यष्टीरक्षक राहिला.
विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही.
६ सप्टेंबर १८८० हा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या आरंभाचा दिवस ठरला. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांच्याकडून या दिवशीच शतक निघावे हा अनोखा योगायोग होता. केनिंग्टन ओवलवरील या कसोटीपूर्वी क्रिकेट जगतात केवळ तीनच कसोट्या खेळल्या गेल्या होत्या…रिचर्ड हटनच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी लेन हटन परलोकवासी झाले ही मात्र नक्कीच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. वाढीचा ठरलेला असा दिवस नसतो पण अर्थ समजावा म्हणून नाईलाजाने असे शब्द वापरावेच लागतात. असो
अश्रफउलच्या दोन जन्मतारखा सांगितल्या जातात पण कोणत्याही तारखेने तो मुश्ताक मोहम्मदच्या १७ वर्षे ८२ दिवस या वयापेक्षा सरसच ठरतो. १९६०-६१ च्या हंगामात पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मदने भारताविरुद्ध शतक केले होते. सुमारे ४० वर्षे मुश्ताकचा विक्रम टिकला.
कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते.
ब्रिटिश वर्चस्वाखालील हिंदुस्थानातील एका ‘काळ्या’ खेळाडूने सभ्य गृहस्थांच्या खेळात त्यांच्याचविरुद्ध शतक काढावे ही ताज्जुब की बात होती. खेळ संपल्यानंतर लालाजींभोवती प्रेक्षकांचा गराडा पडला. त्यांच्या गळ्यात पुष्पहार मावेनासे झाले. अनेक महिलांनी आपल्या अंगावरील दागदागिने काढून लालाजींना भेट म्हणून दिले. राजे-महाराजांनीही लालाजींना बक्षिसी दिली. भारतातर्फे पहिल्यांदाच शतक काढणारे लालाजी हे खरोखरीचे हिरो ठरले. भारतीय राष्ट्रवाद जिवंत झाल्याचा हा ढळढळीत पुरावा होता. लालाजींना पुन्हा मात्र कसोट्यांमध्ये कधीही शतक काढता आले नाही
राजेशाही थाटाची, पौर्वात्य किमयेची आणि उच्छृंखल अशी फलंदाजी रणजी करीत. लवचिक मनगट अनेकांजवळ असते, वेळही बरेच जण अचूक साधतात पण या दोन्ही गोष्टींसोबत उपजत नजाकत ज्या फार विरळा किमयागारांजवळ असते त्यात रणजींचा समावेश होतो. १९९७ च्या विश्वचषकातील एका सामन्यात बांद्र्याच्या मिडल इन्कम ग्रुप ग्राऊंडवर बेलिंडाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिले द्विशतक झळकावले. तोपर्यंतच काय, त्याच्यानंतरही सुमारे १३ वर्षे ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमली नाही.
उत्तर माहीत असूनही काही प्रश्न मुद्दाम विचारले जातात आणि अशा पृच्छांना शैली वगैरेंसारखी गोंडस नावे दिली जातात. कव्हर्समधून रॉबिन स्मिथपेक्षा जास्त जोरात कुणी चेंडू झोडला आहे का, हा असाच एक प्रश्न. १३ सप्टेंबर १९६३ रोजी दक्षिण आफ्रिकेत रॉबिन अर्नॉल्ड स्मिथचा जन्म झाला. रॉबिन स्मिथच्या जन्मानंतर बरोब्बर ६ वर्षांनी व्हिक्टोरियातील अप्पर फर्नट्री गलीत कीथ वॉर्न यांना पुत्रप्राप्ती झाली. हा पुत्र एक नामी फिरकगुंडा बनला. वॉर्नी, हॉलिवूड आणि चिपमंक ही त्याची काही लाडनावे.
कसोटी इतिहासात आजवर फक्त एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांकडून शतके काढण्याचा आणि १,००० धावा जमविण्याचा पराक्रम केला आहे. १४ सप्टेंबर १९५७ रोजी ब्लोमफौंटनमध्ये केप्लर वेसल्सचा जन्म झाला. वेस्ट इंडिजमध्ये जन्मून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या रामनारायण सिंग-पुत्राचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद बेटांवर झाला. रबींद्र हे त्याचे अधिकृत वापरासाठीचे नाव पण ‘रॉबिन सिंग’ या नावानेच तो सुपरिचित आहे.
क्रिकेटच्या इतिहासातील दाढ्या – किंवा त्या दाढ्यांचे मालक – हा एक मनोरंजक विषय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti