साधारणतः पूर्वीच्या काळी ज्यांच्या घरी विनाइल रेकॉर्ड प्लेअर असायचे त्यांना खूप श्रीमंत मानलं जायचं. एक वेगळाच थाट असायचा अशा लोकांचा. सगळी काम आटोपून संध्याकाळी ग्रामोफोन वर गाणी ऐकणं म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवून देण्याचा मार्गच होता त्यांच्यासाठी आणि त्यात भर म्हणून जर पाऊस पडत असेल व हातात वाफाळलेल्या चहाचा कप जर असेल तर दुग्धशर्करायोगच म्हणायचा. १८७७ मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचा शोध लावला त्या दिवसाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विनाइल रेकॉर्ड डेची स्थापना केली.
श्रावण महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात अनेकांना मद्यपान-मांसाहार वर्ज्य असतो. त्यांच्यासाठी हा खास लेख…
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे.
सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी ‘ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सई ताह्मणकर, उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
१९४८ साली, गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या.
इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
लिथो पद्धतीने छपाई यशस्वी होऊ लागली पण तिचा वेग अत्यंत कमी होता. साधारण तीन दशकापूर्वीच लिथो छपाई नामशेष झाली. ऑफसेट छपाईत दगडाची जागा जस्ताच्या पत्र्याने घेतली. यंत्राच्या ठरलेल्या आकाराला, ठरलेल्या जाडीचा जस्ताचा पत्रा बसवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याच्या ऑफसेट फ्लेट्स तयार होऊ लागल्या.
संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
आजची तारीख ही सबंध भारतीयांच्या अभिमानास पात्र ठरत होती , आहे आणि नेहमीच राहिल. ह्या तारखेचा इतिहास कधीच विसरता येण्यासारखा नाही. इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला आहे.
“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti