या नाटकात बाळ धुरी, प्रभाकर पणशीकर या नावाजलेल्या नटांनी कामे केली होती. नंतरच्या काळात यशवंत दत्त व मोहन जोशी यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी ‘थँक यू मिस्टर ग्लाड ‘ हे नाटक गाजले.
मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्तातील दीर्घकालीन वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात.
२० ऑगस्ट ! १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ साली भारत नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालय (The Indian Ministry For New & Renewable Sources) ह्यांनी ह्या दिवसाची स्थापना केली.
हा दिवस २००० साली प्रथम साजरा करण्यात आला. याची सुरूवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन डॉइश हिरंटुमरहिलफ यांनी केली होती. या संघटनेची स्थापना १९९८ साली झाली. यामध्ये १४ देशांमधील ५०० हून अधिक सदस्य आहेत. याच असोसिएशनने ८ जूनला ब्रेन ट्यूमर डे जाहीर केला. तेव्हापासून या आजाराविषयी जागरुकता आणण्यासाठी ८ जूनला हा दिवस साजरा केला जातो.
बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले होते. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता.
सनम तू बेवफा से नाम ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), खुश रहे तू सदा ( मोहम्मद रफी), खिलौना जानकर तुम तो ( मोहम्मद रफी), मै शराबी नही ( मोहम्मद रफी आणि आशा भोसले), रोझ रोझ रोझी ( किशोरकुमार आणि आशा भोसले) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे.
नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले.
अमोल पालेकर या सिनेमात larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हता. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर हि ये ताला खोलुंगा पीटर” म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत तो कधी पडला नाही.
चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले.
Copyright © 2025 | Marathisrushti