कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते.
विद्यापीठाची एकूण ३७ वसतिगृहे असून त्यांपैकी सहा वसतिगृहांत मुलीच राहतात. विद्यापीठीय आवारात २८ वसतिगृहे आहेत. विद्यपीठाचे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय वसतिगृह असून तेथे पन्नास विदेशी विद्यार्थी राहण्याची सोय आहे.
पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम होते. पडिंत नेहरू यांनी लहानमुलांच्या शिक्षणावर आणि संभाळावर अधिक भर दिला होता. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य असे ते म्हणत.
आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते.
१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.
१९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.
आज पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस.
सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १९३२ रोजी सुरू केले.
१९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आहे. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.
नव्या-जुन्या पिढीतील वाचकांचे "सकाळ'ला भरभरून प्रेम मिळत आहे. दैनिक किंवा साप्ताहिकच नव्हे, तर "साम वाहिनी', "ई-सकाळ' आणि इतर "सोशल मीडिया'च्या माध्यमातूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचक "सकाळ'शी जोडला गेलेला आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळेच "सकाळ' ही वाटचाल करत आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे.
ऋषिपंचमीला विशिष्ट पद्धतीने आहार सेवनाविषयी काही नियम आहेत. या दिवशी नांगरणी न झालेल्या शेतातून सहज उगवून येणाऱ्या रानभाज्यांचे व धान्यांचे सेवन केले जाते.
यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’हा अविस्मरणीय चित्रपट २७ फेब्रुवारी १९७६ रोजी प्रदर्शित झाला होता.अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात राखी, शशी कपूर, ऋषी कपूर,वहिदा रहमान,नीतू सिंग यांच्या भूमिका होत्या.
Copyright © 2025 | Marathisrushti