(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

  • ‘रविवार’ च्या साप्ताहिक सुटीची १२९ वर्षे

    १८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी त्यांनी दहा हजार कामगारांची सभा घेतली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला.

  • गोडाचा वरचष्मा

    कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्‍या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्‍या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं.

  • ६ मे – आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस

    पहीला नो डाएट दिवस इग्लंड मध्ये मैरी इवांस यांनी ६ मे १९९२ रोजी साजरा केला. १९९८ सालापासून ६ मे रोजी पूर्ण जगात हा आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस पाळला जातो.

  • ऑफसेट पद्धतीने छपाई

    लिथो पद्धतीने छपाई यशस्वी होऊ लागली पण तिचा वेग अत्यंत कमी होता. साधारण तीन दशकापूर्वीच लिथो छपाई नामशेष झाली. ऑफसेट छपाईत दगडाची जागा जस्ताच्या पत्र्याने घेतली. यंत्राच्या ठरलेल्या आकाराला, ठरलेल्या जाडीचा जस्ताचा पत्रा बसवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याच्या ऑफसेट फ्लेट्स तयार होऊ लागल्या.

  • रामनवमी

    चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.

  • जागतिक कावीळ दिवस (वर्ल्ड हिपेटायटिस डे)

    याला वैद्यकीय भाषेत ‘हिपेटायटीस’ असे संबोधतात तर मराठीत त्याला ‘यकृतदाह’ असे म्हणतात. हिपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती पाहायला मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधं म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचं समोर आलं आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधं वापरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो. पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. जसे की, माळ बांधणे आणि कावीळ उतरणे या गैरसमजुतींचा या रोगाशी काहीही संबंध नाही. या अंधश्रद्धेतूनही अनेकदा लोकांचा जीव जातो. कावीळ आपणास अनोळखी नाही. डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळा होणे, त्वचा पिवळसर दिसणे आणि लघवी गडद पिवळी होणे ही काविळीची लक्षणेही आपल्याला माहिती असतात. मुळात कावीळ हा काही आजार नव्हे, ते एक लक्षणच आहे.

    कारण ते आपल्याला जाणवते, दिसून येते. कावीळ होण्याची कारणे अनेक आहेत. त्यांचा परिणाम यकृताच्या कार्यपद्धतीवर होत असतो. यात सर्वात महत्त्वाचे व नेहमी दिसून येणारे कारण म्हणजे यकृतावर झालेला विषाणूंचा हल्ला.

    कावीळबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून २८ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड हिपेटायटिस डे’ म्हणून साजरा केला जातो.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पारसी समाजाचे नववर्ष नवरोज

    ग्रेगरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला.

  • ग्रँड इंडियन सर्कस

    युरोपियन साहेबाने,’या एतद्देशीय भारतीय काळ्या लोकांना हे सर्कस काढणे, खेळ करणे कधीच शक्य होणार नाही!!’ असे उद्गार काढले!. हे ऐकताच विष्णुपंत छत्र्यांमधील अस्सल भारतीय जागा झाला. कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला.

  • ३३ वर्षं ‘अशी ही बनवाबनवी’ मराठी चित्रपटाची

    व्ही. शांताराम प्रॉडक्शन निर्मित ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर मराठी सिनेरसिकांच्या मनात कायमचं घर करून बसला आहे. अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत.

  • बॉम्बे’ ते मुंबई – २६ वर्षे

    ४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.