राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.
March 1, 2024
मरिन ड्राइव्ह म्हणजे ‘क्वीन्स नेकलेस’ इतकीच बहुसंख्य मुंबईकरांना त्याची ओळख आहे. मात्र हा नेकलेस तयार होण्याच्या काही वर्ष आधी नेकलेससमोरच्या अरबी समुद्रात भराव टाकून समुद्र मागे हटवण्यात आला होता. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सध्या जिथं प्रेमीयुगुलं जिने-मरने की कसम खातात, तो समुद्रासमोरचा कठडा आणि पाथ-वे बांधण्यात आला, त्या घटनेला १८ डिसेंबरला तब्बल १०२ वर्षे पूर्ण झाली. ‘युनेस्को’ने वर्ल्ड हेरिटेज प्रथम श्रेणीचा मान या पाथ-वे आणि कठड्याला दिला आहे.
ब्रिटिशांच्या आमदानीत मुंबई हे दुसरं लंडन शहर वसविण्याचे स्वप्न पाहिलं जात होतं. त्यानुसार व्हिक्टोरिया टर्मिनस, जनरल पोस्ट ऑफिस, पश्चिम रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय अशा कलात्मक वास्तूशैलीचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू उभारण्यात आल्या. ब्रिटिशांची कलासक्त दृष्टी लंडनमधील वास्तूंसारखं बांधकाम मुंबईत व्हावं अशी होती. मरिन ड्राइव्ह पाहाण्याचा दृष्टिकोन तसाच होता. इंग्लंडमधून मुंबईत स्थलांतर केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होईना. त्यांनी समुद्राच्या ताज्या हवेत फेरफटका मारण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून पाथ-वे बांधण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर झाला.
सरकारने मागणी मंजूर केली, तरी समुद्र मागे हटविणे वाटतं तितकं सोपे नव्हतं. मरिन ड्राइव्ह ते नरिमन पॉइंट अशा मोठ्या पट्ट्यात भराव टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यावेळेस अरबी समुद्राची हद्द गिरगावच्या सध्याच्या केळेवाडी, चंदनवाडी स्मशानभूमीपर्यंत होती. तिथपर्यंतच्या चौपाटीवर भराव टाकण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या भागातून माती आणून टाकण्यात आली. भराव टाकण्याच्या कामासाठी स्थानिक मजुरांचा वापर करण्यात आला. मुंबईच्या नैसर्गिक कलात्मक सौंदर्यांत भर टाकणाऱ्या या पाथ-वेचे बांधकाम डिसेंबर, १९१५ मध्ये सुरू झाले आणि पाच वर्षांत म्हणजे १९२० मध्ये पूर्ण करण्यात आले. समुद्रात एकूण १६०० एकर भूभागावर भराव टाकण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र फसलेले नियोजन, दलदलीचा कमी झालेला उपसा आणि कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे प्रत्यक्षात फक्त ४४० एकर भूभागावर भराव टाकण्यात ब्रिटिश सरकार यशस्वी ठरले. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यालगत असलेला उलट्या ‘सी’ आद्याक्षरासारखा किंवा चंद्रकोर आकाराचा हा पाथ-वे ४.३ किमी इतका विस्तारला आहे.
ब्रिटिश बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुंबईतील अशा अनेक वास्तूंची बांधकामं क्रिसेन्ट (चंद्रकोर) पद्धतीने केली आहेत. या पाथ-वेचे बांधकाम सुरू झाल्याचे आणि कधी संपल्याची साक्ष देणारा फाऊंडेशन स्टोन आजही चौपाटीजवळच्या मफतलाल तरणतलावच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. मरिन ड्राइव्ह भागात ब्रिटिशांची मरिन बटालियन लाइन्स होती. त्या नावावरून मरिन लाइन्स तसेच बटालियन्सच्या परेडमुळे मरिन ड्राइव्ह हे नाव पडलं असल्याचं सांगितलं जातं. पुढे या बटालियन्सच्या जागी एअरफोर्स कर्मचारी वसाहती आल्या. ब्रिटिश राजवटीत केनेडी सी-फेस नावाने ओळखला जाणारा हा परिसर स्वातंत्र्योत्तर काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग नावाने ओळखला जाऊ लागला. मुंबईतील बेफाम आणि बेभान पाऊस पाहण्यासाठी मुंबईकरांसह परदेशी पर्यंटकांची पावलेही मरिन ड्राइव्हकडे वळतात. पहिल्याच पावसात पाणी तुंबून मुंबईकरांची दैना उडते. तसाच काहीसा प्रकार प्रकार मरिन ड्राइव्हबाबत पाथ-वे आणि कठडा बांधल्यानंतर झाला. पाथ-वेच्या भुपृष्ठातून अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी शिरकाव करू लागले. त्यामुळे हे बांधकाम केल्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच १९१६मध्ये पुन्हा पाथ-वेची डागडुजी ब्रिटिशांना करावी लागली. त्यानंतर तब्बल ८६ वर्षांनंतर पुन्हा पाथ-वेवर समुद्रातून पाणी शिरू लागल्याने २००६ मध्ये राज्य सरकारमार्फत दुरूस्ती करण्यात आली.
अलीकडे म्हणजे १९८० पर्यंत चर्नी रोडवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून उसळता अरबी समुद्र सहज दिसत असे. मात्र समुद्रासमोरच्या वास्तूंच्या वाढत्या आकारामुळे मुंबईकरांना समुद्र आणि दिसणं बंद झालं आहे. मुंबईत जागेला आलेल्या सोन्याचा भाव दक्षिण मुंबईसाठी फलदायी ठरला आहे. ब्रिटिश राजवटीत एक रुपयाच्या भाडेपट्टयावर घेतलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारतीतील घरे चार-पाच कोटीपर्यंत सहज विकली जातात. मरिन ड्राइव्ह ते कफ परेडचा घरांचा दर तब्बल एक लाख रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. म्हणजे जमीनमालकांच्या सात पिढ्या बसून खातील इतकं मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं आहे. अर्थात हा चमत्कार समोरच्या अरबी समुद्राच्या बे-व्ह्यूमुळे झाला आहे.
क्वीन्स नेकलेसचा उल्लेख केला नाही, तर मरिन ड्राइव्हच्या इतिहासावर अन्याय केल्यासारखे होईल. मरिन ड्राइव्हसमोर असलेला इंग्रजी अक्षर ‘सी’सारख्या रचनेचा रस्ता रात्रीच्या वेळी पिवळ्या दिव्यांनी उजळला की त्याला पाहून राणीच्या गळ्यातला रत्नहारासारखा दिसतो, त्यामुळेच क्वीन्स नेकलेस म्हणून तो देश-परदेशातही प्रसिद्ध पावला. दुसर्या महायुद्धापूर्वी म्हणजे १९३५च्या सुमारास मरिन ड्राइव्हच्या पाथ-वेला जोडून असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९४० मध्ये हे काम पूर्ण झाले. रस्त्याच्या पलिकडे पश्चिम रेल्वेचे चर्नी रोड, मरिन लाइन्स स्टेशन आणि आताचा महर्षी कर्वे रोड बांधण्यात आला. त्यानंतर या भागात निवासी इमारतींच्या बांधकामांच्या हालचाली सुरू झाल्या. १९३० साली जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मरिन ड्राइव्ह रोडसमोरच्या भागात कलात्मक रचना असलेल्या घरांचे डिझाइन तत्कालीन जमीन मालकांना करून दिली. समुद्रासमोर असलेल्या या घरांचे दर त्यावेळेसही प्रचंड महाग होते. पारसी आणि इंग्रज वगळता मुंबईतील सामान्य वर्गाला ही घरे परवडणारी नव्हती. त्यावेळी बर्यापैकी गर्दी आटोक्यात असतानाही मुंबईत घरे भाड्याने घेणं लोक पसंत करीत. दरम्यान १९४५च्या सुमारास भारत-पाकिस्तान फाळणीच्या चर्चा होऊ लागल्या. त्याचा लाभ जमीनमालकांनी उठवला. फाळणीनंतर हजारो श्रीमंत हिंदू कुटुंबीयांनी मुंबईत मरिन ड्राइव्हला स्थलांतर केले.
या कुटुंबीयांचे नातलग आजही या भागात वास्तव्यास आहेत. मरिन ड्राइव्हच्या जुन्या इमारती जवळपास दादरच्या शिवाजी पार्क किंवा हिंदू कॉलनीतील इमारतींसारख्या दुमजली ठेंगण्या-ठुसक्या आहेत. कमी मजल्यांमुळे इमारतींना कलात्मक टच देणे शक्य झाले आहे. या बांधकामांचे वैशिष्ट्य म्हणजे मरिन ड्राइव्ह सी-फेस मोकळा सोडून गिरगाव चौपाटीसमोरच्या भागात या इमारती बांधण्यात आल्या आहेत. सी-व्ह्यू स्पष्ट दिसावा असा यामागचा उद्देश असावा. काही वषानंतर चर्नी रोड आणि मरिन ड्राइव्ह समुद्राच्या भागात क्लब, जिमखाने उभे राहिले आहेत. योग शिक्षण देणारी कैवल्यधाम ही वास्तू मरिन ड्राइव्हच्या समुद्रासमोर १९३९ला बांधण्यात आल्याचा उल्लेख संस्थेत पाहायला मिळाला. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी मुद्रणालय, मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, तारापोरवाला मत्स्यालय, जवाहर बालभवन या वास्तू उभ्या राहिल्या. पुढे नरिमन पॉइंट ते कफ परेडपर्यंत हजारो इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यातील बहुसंख्य बांधकामे ७० नंतर उभी राहिली आहेत.
समुद्राकडून येणाऱ्या भन्नाट वारा आणि मरिन ड्राइव्हचा कठडा प्रेमीयुगलं आणि मुंबईत येणाऱ्या हौशा-गवशांचे आकर्षण आहे. पावसाळ्यातली मुंबई पाहणं एक नेत्रसुखद अनुभव आहे. तो घेण्यासाठी परदेशी पर्यटक पावसाळ्यात मरिन ड्राइव्हला हटकून भेट देतात. तसेच मुंबईकरांची पावलं या दिवसांत कठड्याकडे वळलेली असतात.
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 18, 2017
६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला.
March 6, 2022
टाकोज हा मेक्सिकन पदार्थ असून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टाकोज दिवस साजरा केला जातो.
October 4, 2021
१९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.
October 25, 2021
त्या काळात, दिल्ली केंद्र वेगवेगळ्या बातम्या आणि राजकीय/राष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्रम यांचे प्रमुख स्थान मानले जायचे. पण मुंबई ही मनोरंजनाची खाण आहे. या बॉलीवुड नगरीची गैरहजेरी दूरदर्शनमध्ये होती, म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, घराघरात, डीडी सह्याद्री हे नाव पोचले.
October 2, 2021
आपल्याकडील पदार्थ खूपच व्यंजन मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात. इडली हा पदार्थ मूळचा दक्षिण भारतीय म्हणून ओळखला जात असला तरी, इडली हा प्रकार इंडोनेशियातून भारतात आला आहे. तेथे त्याला किडली/ केडली असे म्हटले जाते. भारतात पदार्थांवरूनही श्रेयवाद आहेत. इडलीचे वर्णन कर्नाटकात ९२० जुलिअन कालगणनेत आढळते. तर तमिळ प्रांतात म्हणे इडली १७ व्या शतकात आली. गुजराथ प्रांत यातही मागे नाही. त्यांच्या मते ढोकळा हा पदार्थ दक्षिणेला १०- १२ व्या शतकात तेथे गेला. कारण त्याकाळी सौराष्ट्र प्रांतातील रेशीम व्यापारी महाराष्ट्रमार्गे तेथे जात असत आणि तेव्हाच ढोकळ्याचे इडली या प्रकारात परिवर्तन झाले. अशी इडलीची ही गाथा.
इडलीवरची कविता
एक होती इडली
ती खूप चिडली
तरातरा धावली
सांबारात जाऊन पडली
सांबार होते गरम
इडली झाली नरम
चमचा आला खुशीत
बसला बशीच्या कुशीत
चमच्याने पाहिले इकडेतिकडे
इडलीचे केले तुकडेतुकडे
मुलांनी केली इडली फस्त
इडली झाली होती मस्त!
कवी माहित नाही.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 30, 2022
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.
July 9, 2021
पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात.
March 21, 2022
कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.
November 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti