(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आंतरराष्ट्रीय रंग दिवस

    १ मार्च ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जातो व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. आजचा दिवस व रात्र समान असतो. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र आहे.

  • चॉकलेट डे

    नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो. आपले प्रेम किंवा व्हॅलेंटाईनकडे आपले प्रेम आणि आकर्षणाला प्रदर्शित करण्यासाठी चॉकलेट दिली जाते. मैत्रीच्या स्तराला वाढवण्यासाठी किंवा प्रेम प्रस्ताव देण्यासाठी आपली महिला मित्रांना तरुणांद्वारे चॉकलेट दिली जाते.

  • भारत छोडो चा ठराव पास – ८ ऑगस्ट १९४२

    आजच्या दिवशी १९४२ साली भारत छोडो चा ठराव पास करण्यात आला.
    ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे गवालिया टँक (क्रांती मदान) येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरूवात ९ ऑगस्ट १९४२ ला सुरू झाली.

    चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा १२ कलमी होता. ८ ऑगस्ट, १९४२ च्या रात्री महात्मा गांधी, मिराबेन, कस्तुरबा गांधी यांना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले, तसेच पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोिवद वल्लभपंत यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुस्लिम लीगने सरकारशी हातमिळवणी केली होती. चळवळीच्या काळात राष्ट्रसभा बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. राष्ट्रसभेचे बँक खाते गोठविण्यात आले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन

    हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.

  • राष्ट्रीय पेंग्विन दिवस

    पेंग्विन हे पक्ष्यांच्या जुन्या गटातील पक्षी आहेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यापांसून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतींमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एके काळी तेल आणि त्वचा यांसाठी पेंग्विनाची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे.

  • त्रिपुरारी पौर्णिमा

    या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.

  • रत्नागिरी शहरातील शतकमहोत्सवी फाटक हायस्कूल

    १ मार्च १९२२ रोजी स्थापन झालेली रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूल ही रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण देणारी एक नाविन्यपूर्ण संस्था आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटी ही संस्था १९४० मध्ये स्थापन केली गेली असली तरी ही शाळा १९२२ पासून अस्तित्वात आहे.

  • औष्णिक तंत्रज्ञ दिन

    औष्णिक तंत्रज्ञ दिन

    २४ जुलै हा दिवस औष्णिक तंत्रज्ञांसाठी खूप खास आहे , कारण हा दिवस  जगभरात औष्णिक तंत्रज्ञ दिन (National Thermal Engineer Day) साजरा केला जातो.

  • १८ एप्रिल १९७५ – मराठी चित्रपट सामना प्रदर्शित

    १८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्‍हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.

    सामना १९७५ सामाजिक
    ३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू

    निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
    निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
    दिग्दर्शक :जब्बार पटेल
    कथा :विजय तेंडुलकर
    पटकथा :विजय तेंडुलकर
    संवाद :विजय तेंडुलकर
    संगीत :भास्कर चंदावरकर
    छायालेखन :सूर्यकांत लवंदे
    संकलक :शा. वैद्य
    गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
    कला :दिनानाथ चव्हाण
    रंगभूषा :निवृत्त दळवी
    वेषभूषा :पांडुरंग खटावकर
    नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
    स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
    गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
    ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
    निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
    रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज

    कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा

    पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू

    गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
    कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.

    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo

    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

  • राष्ट्रीय टाकोज दिवस

    टाकोज हा मेक्सिकन पदार्थ असून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टाकोज दिवस साजरा केला जातो.