एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जगभरातील सिंह प्रेमी सिंहाच्या घटत्या लोकसंख्येस जागरूकता देण्यासाठी या दिवसाचा वापर करतात. याव्यतिरिक्त, ते सिंहांच्या वस्तीच्या संरक्षणास मदत कशी करता येईल त्या पद्धतींबद्दल शिकण्याचे सुचवितात.
August 10, 2020
२१ जून हा कर्क संक्रमणाचा दिवस खगोलशास्त्राप्रमाणं उन्हाळ्याची, उत्तर गोलार्धातली सुरवात मानण्यात येते. आज २१ मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटांनी सूर्य खगोलीय विषववृत्तावर येईल. यालाच "वसंत संपात" (इंग्रजीत March equinox,spring equinox, किंवा Vernal equinox) असे म्हणतात.
त्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. २३.५° उत्तर अक्षांशापर्यंत जाऊन दि. २१ जूनला त्याचा परत दक्षिणेकडील प्रवास सुरू होतो.(दक्षिणायन प्रारंभ) दि. २३ सप्टेंबरला तो पुन्हा विषववृत्तावर येतो , यालाच "शरद संपात" म्हणतात.इंग्रजीत Autumn equinox, September equinox असे म्हणतात.
खगोलशास्त्रानुसार उत्तर गोलार्धात उन्हाळ्याची सुरुवात २१ मार्चपासून समजण्यात येते. मात्र, मोसम विज्ञानानुसार उत्तर गोलार्धात त्याचा कालखंड जून, जुलै, ऑगस्ट असा मानण्यात येतो. त्यामुळं खगोलशास्त्रानुसार भारतात २१ जून हा ऋतुमध्ये दिवस असतो. २१ मार्च रोजी सूर्य जिथं असतो, त्या स्थितीला "वसंत संपात' आणि २१ सप्टेंबर रोजी तो जिथं असतो, त्यास "शरद संपात' म्हणतात. या दोन्ही दिवसांना विषुवदिन (इक्विनॉक्सअ) असं संबोधलं जातं.
२१ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडं जाऊ लागतो. २१ डिसेंबर या दिवशी तो त्याच्या दक्षिणतम मर्यादेपर्यंत म्हणजे मकरवृत्तावर येतो आणि त्यानंतर त्याचं पुन्हा एकदा उत्तरेकडं भ्रमण चालू होतं (उत्तरायण). भारतात या चक्राची विभागणी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंत केलेली आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 21, 2022
जागतिकीकरण तोंडावर आलं असताना आपलं प्रादेशिक वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने सार्कची ८ डिसेंबर १९८५ ला ढाका येथे स्थापना झाली. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सार्कच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचा उद्देश परस्पर सहकार्यातून भारतीय उपखंडाला शांतता आणि समृद्धी मिळवून देणं, हा आहे.
प्रारंभी सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीव असे सात देश सदस्य होते. २००७ मध्ये अफगाणिस्तानचा आठवा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह ९ देश व संघटनांना सार्कमध्ये ‘निरीक्षक दर्जा’ दिला आहे. दक्षिण आशियामध्ये सामूहिक बाजारपेठ निर्माण करणे या प्रमुख उद्देशाने सार्कची निर्मिती करण्यात आली. सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे.
सार्क देशांच्या राष्ट्रप्रमूखांनी दरवर्षी शिखर संमेलनात भाग घेऊन आपल्या अडीअडचणींविषयी चर्चा करावी, अशी कल्पना होती. पण सध्या आपापसातील इगो प्रॉब्लेममुळे काही देश या संमेलनावर बहिष्कार टाकतायत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाचा सार्कला मोठा फटका बसतोय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 8, 2021
मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो.
July 11, 2021
स्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले.
April 6, 2022
ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर संडे म्हणून हा सण साजरा केला जातो.
April 17, 2022
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “इंडियन पॅनोरमा” विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
November 12, 2021
सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.
March 26, 2022
१९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला.
June 21, 2022
सनम तू बेवफा से नाम ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), खुश रहे तू सदा ( मोहम्मद रफी), खिलौना जानकर तुम तो ( मोहम्मद रफी), मै शराबी नही ( मोहम्मद रफी आणि आशा भोसले), रोझ रोझ रोझी ( किशोरकुमार आणि आशा भोसले) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे.
April 8, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti