एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !
१४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले. सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली.
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल आहे. ४११ एकरांच्या या संकुलामधून विविध पदव्युत्तर विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील मुख्य इमारत ही समस्त पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक ठरते.
कडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.
संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ हे नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’ असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यठमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली.
साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकाना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुले जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ – दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली.
आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे.
९३ वर्षांचे मिकी माऊस जगातील सर्वात वयस्कर कार्टून कॅरेक्टर. फेलिक्स-द कॅट हे पहिले तर बोन्जो-द डॉग हे दुसरे कार्टून कॅरेक्टर आहे.
दरवर्षी ६ मे हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर २००९ पासून हा दिवस साजरा केला जातो परंतु भारतात २०११ पासून अॅ्कॉर्डियन दिन साजरा करण्यास सुरवात झाली. पहिला जागतिक अॅकॉर्डियन दिवस हा पहिला अॅकॉर्डियन १८२९ ला बनविला गेला व त्याचे पेटंट ६ मे १८२९ रोजी व्हिएन्ना येथे ख्रिस्तीफर डिमेनी यांनी घेतले, या गोष्टीला १८० वर्षे झाली म्हणून ६ मे २००९ पासून जागतिक अॅकॉर्डियन दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.
भारतात बॉलीवूडमध्ये केसी लॉर्ड इनॉक डॅनियल्स ही नावे अॅकॉर्डियन मध्ये अग्रगण्य मानले जातात. केसी लॉर्ड यांची अॅकॉर्डियन वाजवण्याची एक विशिष्ट शैली होती आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अॅकॉर्डियन वादनाचा अंतर्भाव आहे. रुप तेरा मस्ताना आणि शर्मिली सारख्या अजरामर गीतांमधील अॅकॉर्डियन वादन त्यांनी स्वत: केले होते. ‘आराधना’तल्या ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यातले धुंद वातावरण क्षणात् उभे करणारा सुरुवातीचा तो थरारून टाकणारा अॅाकॉर्डियन या वाद्याचा पीस आणि नंतर अॅ कॉर्डियन आणि सॅक्सेफोन यांची जुगलबंदी सुरू असावी असे वाटणारे एकाहून एक सरस पीसेस, ‘है अपना दिल’ आणि ‘आईये मेहरबाँ’ गाण्यांतले ठेका धरायला लावणारे चायनीज टेंपल ब्लॉक्स, ‘तस्वीर तेरी दिल में’, ‘मुझे दुनियावालों शराबी न समझो’ अशा शेकडो गाण्यांमध्ये अॅाकॉर्डियनच्या बेलोजचा परिणामकारक वापर करून घेतला होता. तसेच मा.इनॉक डॅनियल्स हे सुद्धा भारतीय चित्रपट संगीतातील एक महान अॅकॉर्डियन वादक. त्यांचा टेक दोन-तीन तासांतच ओके होत असे.
व्हायोलिनचा चाळीस वादकांचा ताफा त्यांच्याकडे होता. जयकिशन बॅकग्राऊंड म्युझिकचा सम्राट होता.. सलील चौधरी स्वत: संयोजक, पियानोवादक असूनही इनॉक डॅनियल्स यांना सन्मानपूर्वक बोलावत. त्यांना पाश्चात्त्य संगीताची फार चांगली समज होती. सर्व सिंफनी त्यांच्या आवडत्या होत्या. ‘छाया’च्या ‘इतना ना मुझसे तू प्यार’मध्ये त्यांनी मोझार्टच्या सिंफनीचे स्वर घेतले आहेत. त्यांच्या रचना पूर्ण मेलडीवर असल्या तरी हार्मनीकडे त्यांचा कल होता. त्यामुळे त्यांच्या रचना हार्मनी-ओरिएंटेड आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उदात्त होते. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे मा.इनॉक डॅनियल्स यांच्या अॅनकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. बॉलीवूड मध्ये गुडी सिरवाई, मा.धीरजकुमार,मा. सुमित मिश्रा यांसारखे अॅजकॉर्डियन वादक होऊन गेले. याशिवाय शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, वसंत देसाई, सी.रामचंद्र यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अनारी, श्री ४२०, काला पानी, छाया, प्रेम पत्र, चोरी चोरी या चित्रपटांतील गीतात अॅकॉर्डियनचा प्रभावी पणे वापरला गेला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti