(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

Sort By:

  • पिंगपाँग डिप्लोमसीची ५२ वर्षे

    १९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा.

  • कारगिल विजय दिवस

    हा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते.

  • कसोटी क्रिकेट’ ची सुरुवात

    पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते.

  • मुंबई मराठी साहित्य संघ

    महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले.

  • जागतिक व्याघ्र दिवस

    वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. फेलिडी या मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे.

  • सिलसिला चित्रपटाची ४० वर्षे

    सिलसिला चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी ४० वर्षे पूर्ण होत आहेत.

    १४ ऑगस्ट १९८१ रोजी हा चित्रपट प्रक्षेपित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊस होते, तेथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटाचे लेखन यश चोप्रा, प्रीती बेदी, सागर सरहादी आणि रोमेश शर्मा यांचे आहे.

    या चित्रपटाचे कथानक संजीवकुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हरिवंशराय बच्चन यांच्या 'रंग बरसे ' या काव्याचे गीत रुपांतर आहे. या चित्रपटाची गीते जावेद अख्तर, हसन कमाल आणि राजेंद्र कृष्ण यांची असून संगीत शिव हरी यांचे आहे. या चित्रपटातील देखा एक ख्वाब मै ये सिलसिले हुये, ये कहा आ गये हम, लडकी है या शोला, सर से सर के, नीला आसमा खो गया, जब तुम तोडो पिया, खुद जो वादा किया ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

    या चित्रपटाचे छायाचित्रण के. जी. यांचे आहे. या चित्रपटासाठी सुरुवातीला स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांची निवड करण्यात येणार होती. इतकेच नव्हे तर रेखाने साकारलेल्या 'चांदनी ' या व्यक्तिरेखेसाठी अगोदर आपणास ऑफर होती, असे पद्मिनी कोल्हापूरेने एका मुलाखतीत म्हटले होते. पण जया बच्चन आणि रेखा एकाच चित्रपटात एकत्र आल्याने या चित्रपटाची घोषणेपासूनच दणदणीत पूर्वप्रसिध्दी झाली.

    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पोस्टकार्ड दिवस

    भारतात सुरु झालेल्या पहिल्या पोस्ट कार्डची किंमत फक्त ३पैसे होती, त्यावेळी पहिल्या तिमाहित रु. ७.५० लाख पोस्टकार्डांचा खप झाला होता पहिल्या पोस्टकार्डवर डिझाईन आणि छपाईचे काम मेसर्स थाॕमस डी ला रयू या लंडनच्या कंपनीने केले होते

  • शर्मिली चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव !

    समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.

  • विश्वकर्मा जयंती

    माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूकला तज्ज्ञ म्हणून केली जाते. या दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. निर्मिती, बांधकाम, शिल्पकला, सोनेकाम करणाऱ्या व्यक्तींसाठी विश्वकर्मा जयंती महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विश्वकर्मांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

    ब्रह्मदेवाच्या दक्षिण वक्ष भागातून विश्वकर्मा उत्पन्न झाला असे महाभारतात म्हटले आहे. सृष्टीच्या प्रारंभी केवळ हाच अस्तित्वात होता. प्रारंभी विश्वकर्मा हा सौरदेवतेची उपाधी म्हणून मानला जात होता, पण नंतरच्या काळात तो समस्त प्राणीसृष्टीचा जनक मानला गेला. एक वैदिक देवता असाही उल्लेख आढळतो. ऋग्वेदाच्या एका सुक्तात त्याला पृथ्वी, जल व सर्व प्राणी यांचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ देव म्हटले आहे. सर्व देवांचे नामकरणही यानेच केले. हा सर्वद्रष्टा असून, याला असंख्य मुखे, नेत्र, भुजा, पाय इत्यादी अवयव आणि पंखही होते, असे रूपवर्णन पौराणिक साहित्यात केले आहे. याला सर्वद्रष्टा प्रजापती / विधाता प्रजापती म्हटले आहे.

    पुराणे व महाभारत यात विश्वकम्र्याला देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. याने इंद्रासाठी इंद्रलोक निर्माण केला. सुतलनामक पाताळलोक यानेच निर्माण केला. श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही नगरे यानेच निर्माण केली. एक विख्यात शिल्पशास्त्रकार या नात्याने गरूड भवनाची निर्मितीदेखील विश्वकर्मा यानेच केली. विश्वकर्मा वास्तुशास्त्र हा ग्रंथ विश्वकर्मा यांच्या नावावर आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • शिवसेना स्थापना दिवस

    शिवसेना या संघटनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने स्थापन झालेल्या संघटनेचे मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना असे नामकरण केले.

    मा.प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली होती. मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली होती. या शपथेचा मसुदा होता आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा. शिवसेनेची स्थापना झाल्यावर २६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते ‘शिवसेना’!

    शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तब्बल चार लाख लोक जमले होते. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरले होते. विशेष म्हणजे, दादर रेल्वे स्थानकावरून शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते फुलून गेले होते. शाहीर साबळे यांच्या गाण्याने मेळाव्याची सुरुवात झाली. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार म्हणाले, ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला, या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे!

    शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याची मार्मिकमधील जाहिरात.

    मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा भव्य मेळावा.

    मार्मिक कचेरी :
    ७७- ए रानडे रोड, शिवाजी पार्क,
    मुंबई-२८, डीडी
    फोन ‌: ४५२८९२
    दि. २७ आक्टोबर १९६६
    जय महाराष्ट्र वि. वि.
    महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतीक्षेचा माथा ठेवून महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा मेळावा रविवार दि. ३० आक्टोबर १९६६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, शिवाजी पार्क, दादर येथे.
    भरणार आहे. आपण महाराष्ट्राचे निष्ठावंत अभिमानी. आपण या मेळाव्याला जातीने हजर राहावे, अशी शिवसैनिकांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे.
    आपला नम्र, महाराष्ट्रसेवक
    - बाळ ठाकरे

    शिवसेनेचा इतिहास अनेक प्रकारे लिहिला जाईल. पण त्यातील दोन गोष्टी इतिहासाला ठामपणे लिहाव्याच लागतील. त्या दोन गोष्टी म्हणजे शेवट पर्यत एका पक्षाचा एकच नेता आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात राहून जात न माणणारा आणि मित्रता कायम जपणारा नेता. असा माणूस राजकारणात आता होणे नाही. दिलेला शब्द न मोडणारा, ‘तुझी जात कोणती’ असे न विचारता निवडणुकीत तिकीट देणारा आणि १९९५चे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील सर्व छोटय़ा-मोठय़ा जातींचे तयार करून सामाजिक समतेच संदेश देणारा देशातील एकमेव नेता म्हणजे मा.बाळासाहेब ठाकरे.

    शिवसेनेचे सामर्थ्य वाढले ते सामान्य माणसाला बाळासाहेबांनी ताकद देऊन मोठे केले आणि ते स्वत: सत्तेपासून दूर राहिले म्हणून. आपल्याभोवती जमलेल्या सवंगड्यांवर त्यांनी विश्वास टाकला. त्यांना मोठे केले. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांमुळे राजकारणात मोठी झालेली जी माणसे आपण पाहतो आहोत, ती माणसे मनमोकळेपणाने आपल्या यशाचे सर्व श्रेय बाळासाहेबांना देतात, त्यात संकोच करीत नाहीत.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.