हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता.
मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.
७ डिसेंबर - आजच्या दिवशी १९४१ साली जपानने पर्ल हार्बर वर हल्ला केला.
७ डिसेंबर १९४१ रोजी सकाळी जपानी बॉम्बर्सनी पर्ल हार्बरमधील यूएस नेव्ही बेसवर कोणताही इशारा न देता कार्पेट बॉम्बिंग केली होती. जपानच्या एअरफोर्सने अचानक अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यात अमेरिकेचे सुमारे २,५०० नागरिक मारले गेले होते. तसेच नेव्हीची १८ जहाजेही उध्वस्त झाली होती. हल्ल्यात अमेरिकेच्या आठपैकी सहा युद्धनौका, क्रूझर, डिस्ट्रॉयरसह एकूण २०० हून अधिक एअरक्राफ्ट उध्वस्त झाले होते. जपानच्या एअरफोर्सकडून अचानक झालेल्या या हल्ल्यात अमेरिकेचे २,४०३ सैनिक मारले गेले होते. तर १,१७८ जखमी झाले होते.
७ डिसेंबरचा हवाई बेटांवरचा सूर्योदय नेहमीप्रमाणेच निसर्गरम्य होता.रविवारीच्या सुट्टीच्या रम्य स्वप्नात बहुतेक सर्वजण अंथरुणात पहुडले होते. थोड्याच क्षणात तेथे वेगवेगळ्या आवाजांचा कोलाहल माजला. गोळ्यांचे सु..सु आवाज, फुटणाऱ्या बाँबचे आवाज, जाग्या झालेल्या अमेरिकन तोफांच्या गर्जना आणि या सर्वांच्या आगीत जळण्याचा एक विशिष्ट वास याने युद्धाचा तो रंगमंच व्यापून गेला. त्या रंगमंचाचा थोड्याच वेळात नरक झाला. पर्ल हार्बरवरील अमेरिकेचे सैनिक या अचानक हल्ल्याने थिजले. त्यांची विचारशक्ती काम करेनाशी झाली. ॲडमिरल किमेलचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने कसेबसे स्वत:ला सावरले. फोर्ड बेटांचा ऑपरेशन ऑफिसर कमांडर लोगन रामसेने जपानने पर्ल हार्बरवर हल्ला चढविला आहे ही बातमी प्रथम जगाला जाहीर केली.
जपानने दोन फेजमध्ये हल्ले केले होते. त्यासाठी त्यांनी फायटर जेट्स बॉम्बर्स आणि टारपीडो मिसाइल्सचा वापर केला होता. कमांडर मिस्तुओ फुचिदा यांच्या नेतृत्त्वात १८३ फायटर जेट्सद्वारे ओहियोच्या पूर्वेला तैनात असलेल्या जपानच्या सहा लढाऊ विमानांनी उड्डाण घेतले होते. या माणसाला देव मानणारे वैमानिक त्याच्या तुकडीत होते. पण त्याची खरी ताकद होती ते वैमानिक व पंखात असलेल्या २० मि. मी. तोफा व दोन मशिनगन. त्याची एकदम वर चढायची क्षमता व चपळपणा बघून अमेरिकेच्या भल्या भल्या वैमानिकांनी तोंडात बोटे घातली. या सगळ्यात विमानात भयंकर होती ती त्यांची टॉरपेडो डागणारी विमाने. या विमानांच्या तुकड्यांचा प्रमुख होता ले. कमांडर शिगेचारु मुराटा. याचे वय त्यावेळी ३२ होते व त्याला चीनच्या युद्धाचा चांगलाच अनुभव होता.
विमान उडाविण्याची त्याच्याकडे नैसर्गिक क्षमता किंवा कला होती असे म्हटले तरी चालेल. एक विमान पेटले की तेथे आगीचा डोंब उसळत असे. त्या ज्वाळांचा स्पर्श शेजारच्या विमानाला झाला की त्याचीही तीच गत होत असे. असे भीषण हल्ले चालू असताना आश्चर्यचकित झालेल्या अमेरिकन सैनिकांनी मोठ्या शौर्याने प्रतिकार केला, परंतु सगळी परिस्थितीच त्यांच्या विरुद्ध होती. चांगली विमाने बाजूला काढत असताना समुद्रातून काळ्या धुरांचे काळे ढग आकाशात चढत होते. त्यांच्यासमोर आता विमानांचे भंगार पडले होते. जपानी विमानांनी तीस टक्क्याहून विमाने नष्ट केली होती व उरलेली विमाने उडण्याच्या परिस्थितीत नव्हती. इकडे हिकॅम विमानतळावर काही वेगळे घडत नव्हते. तेथे ७० बाँबर विमाने अशीच एकत्र उभी केली गेली होती. त्यांचीही अशीच कत्तल झाली. या विमानांमधे प्रसिद्ध बी-१७ विमानेही होती. या विमानांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. ती इतकी अभेद्य होती की त्यांना ‘फ्लाईंग फोर्ट्रेस’ असे म्हणत. या विमानांचा धसका जपानी वैमानिकांनीही घेतला होता. फोर्ड आयलंडवर ॲडमिरल बेलिंगरची टेहळणी करणारी फक्त दोन तीनच विमानेच उड्डाण करण्याच्या परिस्थितीत होती.
तंत्रज्ञ जिवावर उदार हो़ऊन विमाने दुरुस्त करायची पराकाष्ठा करत होते पण त्यांच्या कामात नियमांचा व कार्यप्रणालीचा प्रचंड अडथळा येत होता. हल्ल्याच्या दुसऱ्या फेरीत "बॅटलशिप रो" वर हल्ला चढविण्यात आला. हा हल्ला बाँबर, उंचावरुन हल्ला करण्यार्याि विमानांनी व लढाऊ विमानांनीच केला कारण सावध झालेल्या शत्रूवर टॉरपेडो डागणार्यां विमानांनी हल्ला चढविणे आता मुष्कील होते. या हल्ल्यात जपानी विमानांचे लक्ष्य होते तोडमोड झालेल्या युद्धनौकांचा पुरता नाश करणे. इतका की त्यांची दुरुस्ती नजिकच्या काळात हो़ऊ शकणार नाही. जपानच्या वैमानिकांच्या दुर्दैवाने काळ्या धुराचा इतका जाड थर तयार झाला होता की त्यांना खालचे काही दिसेनासे झाले होते. त्यांनी नाईलाजाने त्यांचे लक्ष मग इतर नौकांकडे वळविले. याच हल्ल्यादरम्यान जपानी वैमानिकांच्या नजरेस पळून जाणारी नेव्हाडा नावाची २९००० टनी युद्धनौका पडली. एखाद्या कोकरावर वाघ झडप घालतो त्याप्रमाणे जपानी विमानांनी नेव्हाडाला घेरले व तिची लंगडतोड चालवली. ९ वाजून ४५ मिनिटांनी दुसरा हल्ला संपुष्टात आला. हा हल्लाही यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या हल्ल्यात अमेरिकेच्या विमानतळांचा नाश करण्यात जपानला जास्त यश मिळाले. दोन्ही हल्ल्यात जास्त परिणामकारक कुठला झाला हे सांगणे तसे कठीण आहे. पहिल्यात नौका नष्ट झाल्या तर दुसर्याजत अमेरिकेचे हवाई सामर्थ्य खच्ची करण्यात जपानला यश मिळाले.
थोड्याच वेळात त्या दोन हल्ल्यांमधे झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होत गेले. फारच मोठा विध्वंस घडवून आणला होता त्या हल्ल्यांनी! कल्पनेच्या पलिकडे! एका तासाच्या आत अमेरिकेतील सर्व वृत्तपत्रातील रकाने या बातमीने भरुन गेले. ‘नौकांचे प्रचंड नुकसान’ ‘जपानच्या नौदलाचा हल्ला’ ‘फोर्ड आयलंडवर आगीचे थैमान’ ‘प्रतिकार झाला नाही’ ‘पर्ल हार्बरच्या सर्व नौकांचे पलायन’ अशा अनेक खर्याम खोट्या बातम्या छापून आल्या.
आठच महिन्यापूर्वी (३१ मार्च १९४१) त्या दोघांनी म्हणजे बेलिंगर व मार्टीन यांनी एक गोपनीय अहवाल वर पाठवला होता., त्यात त्यांनी जपान हवाईपासून ३०० मैलाच्या आत आपल्या विमानवाहू नौका उभ्या करुन पर्ल हार्बरवर हल्ला चढवू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर त्यांनीच एक उपायही सुचवला होता. त्यांच्या मते लांब पल्ल्याची विमाने वापरुन समुद्रात खोलवर टेहळणी केल्यास हा धोका टळू शकत होता. दुर्दैवाने त्यासाठी लागणाऱ्या विमानांची संख्या जास्त होती व जी काही थोडीफार होती ती या कामासाठी उपलब्धही करुन देण्यात आली नव्हती. हा अहवाल इतका अचूक होता की जणू काही त्या दोघांनी भविष्यच वर्तवले होते. त्यांचे नशीब की ते दोघे त्याच योजनेच्या तडाख्यात सापडले.
जपानने यूएस पॅसिफिक फ्लीटचा प्रभाव कमी करण्यासाठी पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. या बॉम्ब हल्ल्याद्वारेच जपानने अमेरिका आणि ब्रिटनच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्क्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर १९४१ हा काळा दिवस असल्याचे म्हटले होते. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच अमेरिकाही दुसऱ्या महायुद्धात उतरला होता. त्यांनीही जपानच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. जपानला हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याच्या रुपात या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले.
-- जयंत कुलकर्णी
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले.
१५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा केला गेला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ही तारीख नियुक्ती केली होती. २००८ हे साल आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचे होते.
या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला.
आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे.
आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो.
आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सैन्याने केलेले बलिदान महत्त्वाचे आहे. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेताजींनी एक लढाऊ सेना उभी केली आणि या सैन्याने इंग्रजांच्या सैन्याला चांगले तोंड दिले. त्यामुळे इंग्रज सरकारने ज्यावेळी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले सुरु केले, त्यावेळी संपूर्ण देशभर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोक रस्त्यावर आले.
आज फिरोजखान यांची पुण्यतिथी व आजच विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची जागा कधीच भरून निघू शकणार नाही. १९६८ साली चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी १४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहकलाकार म्हणून जास्तीत जास्त भूमिका साकारल्या होत्या. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ते स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाहीत. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुर्बानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे कुर्बानी, दयावान सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ गाजले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते दोघे खऱ्या आय़ुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि विशेष म्हणजे विनोद खन्ना यांचे निधन २७ एप्रिल २०१७ ला झाले तर फिरोज खान यांचे निधन बरोबर आठ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल २००९ ला झाले होते. कुर्बानी या चित्रपटातील ईश्वर का दुसरा नाम दोस्ती है हा संवाद आज त्यांच्यासाठी तंतोतत खरा ठरला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti