एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
परदेशात १ ऑगस्ट हा National Mountain Climbing Day म्हणून साजरा केला जातो. ह्या मागचा इतिहासही काहीसा गमतीदार आहे.
जेन कॉम याने २४ फेब्रुवारी २००९ रोजी व्हॉट्सअप INC. या नावाने एक कंपनीची स्थापना केली. हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अप्प्लिकेशन आहे.
रुग्ण सेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे .रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना अनेक परिचारिकांची असते. १२ मे रोजी जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइंटिगेल यांची जयंती असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन याच दिवशी साजरा होतो.
मॉडर्न नर्सिगची सुरुवात आणि जडणघडण इस्पितळांच्या चौकटीतच झाली आहे. नव्या जमान्यात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता आणि वैयक्तिक देखभाल याचा विचार केला तर नर्सिग हा सर्वात मोठा समूह आहे. रुग्णाने लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करावी, हा सुश्रुषेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. जगभरातील परिचारिका रुग्णांची देखभाल करताना याच उद्देशाने रुग्णांची दैनंदिन सुश्रुषा करत असतात.
रुग्ण, परिवार आणि समाजाला दैनंदिन जीवनात आनंद लाभावा, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना रुग्णस्थितीतून बाहेर पडता यावे, यासाठी सृजनात्मक आणि नव नव्या उपायांचा परिचारिका प्रयोग करत असतात. अशा बदलांना मूर्त स्वरुप देताना परिचारिका आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील रुग्णांची सेवा करताना परिचारिकेला ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीची जोड अनिवार्य आहे. बेसिक बी.एस्सी. नर्सिग कार्यक्रमांतर्गत अनेक संस्था परिचारिकांना ज्ञान, कौशल्य, सेवावृत्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. नर्सिग हा सेवाभावी तसेच आरोग्य आणि लोकांच्या आरोग्यप्रती स्वत:चे योगदान देणारा व्यवसाय आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा केला गेला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ही तारीख नियुक्ती केली होती. २००८ हे साल आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचे होते.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती.
मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ”करेंगे या मरेंगे” हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले.
यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ”आता प्रत्येकजणच पुढारी होईल.”
ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.
बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.
नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.
जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.
सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
७ ऑक्टोबर १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे.
जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक अमेरिकन इंजिनिअर सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
युरोचा स्वीकार करण्याकडे जसा युरोपातील देशांचा कल वाढत जाईल तशी या चलनाचीही ताकद वाढत जाणार आहे. प्रामुख्याने ब्रिटनसारखा देश जर आपला अहंकार दूर सारून युरोत सहभागी झाला तर युरोची ताकद निश्चितच वाढेल. ब्रिटन सहभागी झाल्यास चित्र पालटू शकेल.
डॉ.सदानंद मोरे घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘तुकाराम दर्शन’ या त्यांच्या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार मिळाले होते. तसेच डॉ.सदानंद मोरे यांच्या’उजळल्या दिशा’ या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार मिळाले होते.
मुलींना टेडी बेअर खूपच आवडतात. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या ‘टेडी डे’ ला आपल्या स्वीटहार्टला एक चांगला गोंडस टेडी गिफ्ट द्यायला विसरू नका.
Copyright © 2025 | Marathisrushti