लेखसंग्रह

सत्याची कास अपेक्षित

Category:

 

गेली २२ वर्षे पत्रकारितेत कार्यरत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलन व अंगणवाडी सेविका, कामगार प्रश्न, वनविभाग, अन्न-औषध प्रशासन, महिला आर्थिक विकास ह्या विषयांवर विश्लेषणात्मक लेखन.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 7 : सुशीला दीदी

Category:

 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायाचे ठरविले. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने, ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचे इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नौकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होते, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घरा बाहेर पडल्या आणि दोन वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. दोनवर्षांनंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नौकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्रता चळवळीचे काम सुरू केले.

व्यक्ती-परिचय

गानगुरू पंडित विनायक केळकर

Category:

 

शिवराम वाशीकर यांनी नंतर प्रभातसाठी ‘ज्ञानेश्वर’, ‘गोपाळकृष्ण’, ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ या चित्रपटांच्या पटकथा व संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेले बहुतेक चित्रपट धार्मिक आणि पौराणिक आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना वाशीकर यांचा अभ्यास सखोल आणि चौफेर होता. चित्रपटाच्या संपूर्ण विषयाचाच ते अभ्यास करीत. त्यांची भाषा साधी पण ठाशीव होती. त्यांच्या पटकथेत संयत विनोदाचाही शिडकावा असे.

साहित्य - ललित

जाणती मुलं माझी

Category:

 

माझे विद्यार्थी खूपच समजूतदार होती म्हणून मला अजिबात त्रास झाला नाही. कुणी आलं की ऑफिसात जावे लागले तरी मुलं शांत बसून अभ्यास करायची. कधीच रागवाव लागलं नाही. जाणती होती ती. त्यांना शिवरायांचे चरित्र म्हणून एक विषय होता. आणि आवडीने मनापासून ऐकायची शिवाजी महाराजांचे चरित्र. आणि एकदा एक पालक बाई म्हणाल्या की बाई माझा मुलगा अबोल लाजाळू आहे पण त्याला तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नुसते उभे केले तरी चालेल पण मला एकदा डोळे भरून त्याला रंगपचावर पहायच आहे. दरम्यान मी मा. बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे पाहिले होते आणि विचार चक्र सुरु झाले. ठरविले माझी मुले पण जाणतीच आहेत याच्यातूनच जाणता राजा सादर करायचा.

व्यक्ती-परिचय

डॉ. अरुण निगवेकर

Category:

 

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.

व्यक्ती-परिचय

कथा-पटकथा-संवादलेखक शिवराम श्रीपाद वाशीकर

Category:

 

हरिभाऊ देशपांडे यांनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, आनंद भाटे हे त्यांपैकी काही.

लेखसंग्रह

रम्य ते बालपण : मोहन वर्दे

Category:

 

आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.

व्यक्ती-परिचय

ज्योत्स्ना देवधर

Category:

 

त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.

लेखसंग्रह

आखडतं आणि अनाकलनीयही !

Category:

 

आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं.