व्यक्ती-परिचय

नर्गिसबानू चिखलीकर

Category:

 

नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्‍या नगिर्स यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं.

लेखसंग्रह

मुंबईचे शांघाय करण्याआधी !

Category:

 

आज सरकार मुंबईचे शांघाय करण्याचा घाट घालीत आहे पण मुंबईत राहणाऱ्या काही नागरिकांच्या व सतत येणाऱ्या लोंढ्यांच्या नसानसात भिनलेला अस्वच्छतेचा निचरा कोण करणार? नागरिकांच्या मानसिकतेवर रत्यांची तसेच सार्वजनीक वाहानांची व ठिकाणांची स्वच्छता अवलंबून असते. स्वतंत्र भारताचे मंत्री, पुढारी व सुजाण नागरिक देशाच्या प्रमुख कार्यक्रमांच्या वेळेस सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या आणि कश्याकश्याच्या शपथा घेतात. समारंभ झाल्याझाल्या मंत्रीच रस्त्याच्या बाजूला पण तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी मारून शपथेला हरताळ फसताना आपण बघतो. निवडणुकींच्या वेळी शपथेवर दिलेली आश्वासने जशी सोईस्कररीत्या विसरली जातात तसेच हे. “गरज सरो आणि वैद्य मरो”.

लेखसंग्रह

मुंबईत घर मिळेल का घर?

Category:

 

घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.

अवर्गिकृत

जनकल्याण समिती, अलिबाग, रायगड

Category:

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती गेले १२ वर्षे अविरतपणे आदिवासींच्या जीवनात सौख्याचे व आशेचे रंग उधळण्यासाठी झटत आहे व आज इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर व साधनेनंतर या समितीने रायगड जिल्हयात २५० सशक्त आरोग्य रक्षकांची भक्कम फळी उभी केली आहे. हे आरोग्य रक्षक अगदी दुरवरच्या आदिवासी पाडयांमध्ये जातात, भाषेचा अडथळा असून सुध्दा तिथल्या कुटूंबांशी संपर्क साधतात, त्यांच्या अडचणी, समस्या, वेदना, दुःख व त्यांच्या जीवनाचे जळजळीत वास्तव समजावून घेतात, त्यांना आरोग्य विषयक व वैयक्तिक शारिरीक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतात.

अवर्गिकृत

दिव्य औषधी- पांढरी मुसळी

Category:

 

जगातील एकूण उत्पादनाच्या सहा ते सात पट जास्त मागणी असलेली आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी होय. पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव – Chlorophytum borivillanum , कुळ- Liliaceae , मराठी नाव- पांढरी मुसळी,सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली संस्कृत नाव- मुसला असे आहेत.

पांढऱ्या मुसळी मध्ये कार्बोहायड्रेडस , प्रोटीन, स्यापोजेनीन, स्यापोनीन, तसेच अनेक खनिज आढळतात.शारीरिक दुर्बलता तसेच ताकतीसाठी, पौष्टिक व बलवर्धक, स्तनदा मातांचे दुध वाढविण्यासाठी, प्रसवोत्तर होणारे स्त्रीरोगांवर उपयोगी, मधुमेह, वंधत्व कमी करण्यासाठी, शुक्रजंतू वाढीसाठी अशा अनेक आजारांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होतो.

अवर्गिकृत

श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम, अलिबाग

Category:

 

वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे.

व्यक्ती-परिचय

डॉ. वसंत पवार

Category:

 

एकच व्यक्ती मनात आणेल तितक्या क्षेत्रांमध्ये किती लीलया संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंत पवार. ते ‘समाजासाठी वाहून घेणे’ या वाक्प्रचाराचे मूर्तीमंत प्रतिक होते. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच त्यांच्या जीवनाची अखेर झाली.

निफाडसारख्या बागायती भागातल्या ‘ओणे’ नावाच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ रोजी डॉ. पवार यांचा जन्म झाला.

व्यक्ती-परिचय

कॉ. वसंत गुप्ते

Category:

 

मुंबईतली कामगार चळवळ जवळपास नामशेष होण्याची चिन्हे दिसत असताना या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी बजावणा-या कामगार कार्यकर्त्यांच्या पिढीचे एक प्रतिनिधीत्व करणारे वसंत गुप्ते हे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी जॉर्ज फर्नान्डिस यांसारख्या दिग्गज कामगार पुढा-यांच्या पाठीशी वसंत गुप्तेंसारखे दुस-या फळीतले तितकेच समर्थ नेतृत्व असल्यानेच नव्वदीच्या दशकापर्यंत कामगार चळवळीचा दबदबा महाराष्ट्रात होता. आंदोलनाची रणनीती आणि एकंदर पुढारपण जितके महत्त्वाचे असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच विविध पातळ्यांवर समन्वय साधणारी, बारीकसारीक बाबींची खडा न् खडा माहिती असणारी निष्ठावंतांची दुसरी फळीही महत्त्वाची असते.

लेखसंग्रह

कालाय तस्मै नम: !

Category:

 

विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधामुळे सगळ्या गोष्टी सहज व विनाकष्ट उपलब्ध झाल्याने माणूस जसा सुखी झाला तसा तो आळशी व ऐतोबा होऊन सवईचा गुलाम झाला. सवय ही काळ, वेळ व कारणांनी बदलत जाते. आज आपण पहातो सर्वच स्त्री व पुरुषांचे जीवन सवईमुळे बदलल्याने शारीरिक व्याधीत वाढ होताना दिसते. पूर्वी पैसा कमाविण्यासाठी घाम गाळायला लागायचा आता घाम गाळायला पैसा खर्च करावा लागतो यातच सर्वकाही आलं.