लेखसंग्रह

।। मनाचे श्लोक-एक दृष्टिक्षेप ।।

Category:

 

“जगी सर्वसुखी असा कोण आहे? ” आपल्याच पूर्वकर्मांनी आपणच तयार केलेल्या संचिताची मूळच्या सुखदुःखरूप फळे जीवाला भोगावीच लागतात. सुखरुप असलेल्या पण दुःखाच्या कचाट्यात खितपत पडलेल्या अभागी जीवाचे वर्णन संतश्री प. पू. डॉक्टरकाका (डॉ. श्री. द. देशमुख) करतात.

लेखसंग्रह

श्री गुरुदेव रानडे प्रणित श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र

Category:

 

श्रीगुरुदेव रानडे यांनी रामदास वचनामृत’ हा ग्रंथ संपादित/ संग्रहित करून त्यातील निवडक ओवीवेचे काढून त्यावर सूत्रभाष्य वजा शीर्षक देऊन, तसेच त्यास विवेचक प्रस्तावना लिहून निंबरगी संप्रदायाचा आध्यात्मिक दृष्टीकोनही उलगडून दाखविला आहे. त्यामुळे ‘श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र’ कळून यायला मदत होते. दासबोधातील एक अध्यात्मानिरूपणाचा ओवीबंध विशद करून दाखविला.

लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सातवा – ज्ञानविज्ञानयोग

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय.

लेखसंग्रह

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग १

Category:

 

भाविकांच्या मते, भगवान शंकराचे माहात्म्य व साधेपणा सांगणारे, शिवमहिम्न स्तोत्र हे अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे. त्याच्या कालासंदर्भत विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत.

लेखसंग्रह

श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

Category:

 

देवी भागवतात उल्लेखिल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. याला १०८ कल्पे झाली असे पुराणाचे मत आहे. कोल्हापुरला दक्षिणकाशी असे गौरवाने म्हटले जाते. येथे सतीचे तिन्ही नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले.

लेखसंग्रह

श्रीगुरुस्तवन

Category:

 

ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे.