विसरणं शक्यच नाही”

तू गेल्यावर माझ्यात मी उरलोच नाही,
श्वास चालू आहेत,
पण जिवंतपणाच नाही.

तुझ्या पावलांच्या खुणा अजून दाराशी आहेत,
घर रिकामं आहे,
तरीही एकटेपणाच नाही.

रात्र विचारते मला,
“किती रडशील अजून?”
अश्रू सुकलेत आता,
पण कोरडेपणाच नाही.

तुझं नाव घेताच वेळ थांबतो क्षणभर,
घड्याळ पुढे सरकतं,
पण काळ सरतच नाही.

आरशात पाहतो तेव्हा चेहरा तसाच दिसतो,
डोळ्यांत मात्र पूर्वीसारखा उजेडच नाही.

जखमा झाकून ठेवतो हसऱ्या शब्दांनी,
कोणी ओळखत नाही,
पण दुखणं कमीच नाही.

प्रेम इतकं खोल होतं, की विरहही पवित्र झाला,
तू नसणं स्वीकारलं,
पण विसरणं शक्यच नाही.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे



तू गेल्यावर माझ्यात मी उरलोच नाही,
श्वास चालू आहेत,
पण जिवंतपणाच नाही.

तुझ्या पावलांच्या खुणा अजून दाराशी आहेत,
घर रिकामं आहे,
तरीही एकटेपणाच नाही.

रात्र विचारते मला,
“किती रडशील अजून?”
अश्रू सुकलेत आता,
पण कोरडेपणाच नाही.

तुझं नाव घेताच वेळ थांबतो क्षणभर,
घड्याळ पुढे सरकतं,
पण काळ सरतच नाही.

आरशात पाहतो तेव्हा चेहरा तसाच दिसतो,
डोळ्यांत मात्र पूर्वीसारखा उजेडच नाही.

जखमा झाकून ठेवतो हसऱ्या शब्दांनी,
कोणी ओळखत नाही,
पण दुखणं कमीच नाही.

प्रेम इतकं खोल होतं, की विरहही पवित्र झाला,
तू नसणं स्वीकारलं,
पण विसरणं शक्यच नाही.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author