तीला जर तुमच्या बोलण्याचा अर्थच नसेल कळत,
तर शब्द उधळण्यात काय अर्थ ?
ओठांवर येणारी प्रत्येक भावना,
तिच्या मनापर्यंत पोहोचतच नसेल तर सगळं व्यर्थच ना?
ती जर समजूनही न समजल्यासारखी वागते,
खरे ऐकण्याऐवजी मौनाची भिंत उभी करते,
तर समजावण्याचा आटापिटा कशाला?
जेथे जाणीवच नाही, तेथे प्रयत्न तरी कशाला?
शब्द थकतात, आशा झिजते,
संवाद हळूहळू हरवून जातो,
आणि उरते ती फक्त शांतता.
जिथे समज नाही, तिथे बोलणं ही थांबते.
म्हणूनच कधी कधी मौन स्वीकारलेलं बरं,
ते किमान खोटं नसतं,
कारण न समजणाऱ्या मनासाठी
सर्वात ठळक उत्तर म्हणजेच शांतताच असते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
तीला जर तुमच्या बोलण्याचा अर्थच नसेल कळत,
तर शब्द उधळण्यात काय अर्थ ?
ओठांवर येणारी प्रत्येक भावना,
तिच्या मनापर्यंत पोहोचतच नसेल तर सगळं व्यर्थच ना?
ती जर समजूनही न समजल्यासारखी वागते,
खरे ऐकण्याऐवजी मौनाची भिंत उभी करते,
तर समजावण्याचा आटापिटा कशाला?
जेथे जाणीवच नाही, तेथे प्रयत्न तरी कशाला?
शब्द थकतात, आशा झिजते,
संवाद हळूहळू हरवून जातो,
आणि उरते ती फक्त शांतता.
जिथे समज नाही, तिथे बोलणं ही थांबते.
म्हणूनच कधी कधी मौन स्वीकारलेलं बरं,
ते किमान खोटं नसतं,
कारण न समजणाऱ्या मनासाठी
सर्वात ठळक उत्तर म्हणजेच शांतताच असते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Post Views: 6