भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
कुठलंच कारण न लागावं.
मनात आलं, हसू उमटलं,
आणि दार आपोआप उघडावं.
न सांगताही सगळं कळावं,
नात्यात शब्दांची गरज नसावी.
हक्क नको, अटी नको,
फक्त आपुलकीची ओढ असावी.
ना अपेक्षांचा ओझं असावं,
ना गैरसमजांची भिंत.
भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
नातं इतकं साधं… सरळ… नितांत सुंदर असावं.
* कीर्तिराज आगलावे
Author
Post Views: 6